शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग योजनांचे फाईलमध्येच कल्याण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:22 IST

विशाल शिर्के लोकमत न्यूज नेटवर्क पिंपरी : दिव्यांग-सदृढ विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाखांचे अनुदान....दिव्यांगांना स्वयंरोजगार देण्यासाठी फिरते हरित वाहन ...

विशाल शिर्के

लोकमत न्यूज नेटवर्क

पिंपरी : दिव्यांग-सदृढ विवाहांना प्रोत्साहन देण्यासाठी अडीच लाखांचे अनुदान....दिव्यांगांना स्वयंरोजगार देण्यासाठी फिरते हरित वाहन उपलब्ध करुन देणे... दिव्यांगांना पदव्युत्तर शिक्षणासाठी अनुदान देणे...या आहेत आयुक्तालयाच्या वतीने प्रस्तावित कल्याणकारी योजना. मात्र, या योजनेची अंमलबजावणी आणि त्यासाठी आवश्यक पाठपुरावा नसल्याने या योजना सरकारी कागदपत्रात धुळखात पडून आहेत. दिव्यांग (पूर्वीचा अपंग शब्द) व्यक्तींना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी १९९५चा कायद्याद्वारे अपंगांना हक्क आणि सवलती देऊ केल्या. तर, केंद्र सरकारने २०१६ रोजी अपंग हक्क कायदा पारित केला. अनेक चांगल्या सवलती देऊ केल्या. त्या अंतर्गत अनेक योजना आणल्या जातात. त्याची घोषणा होते. मात्र, या योजनांची पुढे अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

सदृढ आणि दिव्यांग विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी अर्थसहाय्य योजना सरकारने सुरु केली. त्यासाठी पूर्वी पन्नास हजार रुपये देण्यात येत होते. त्यात २५ हजार रुपयांचा बचतपत्रे, वीस हजार रोख, साडेचार हजार रुपयांची संसारोपयोगी साहित्य आणि पाचेश रुपये स्वागत समारंभासाठी. त्यात अडीच लाखापर्यंत वाढ करण्याचा प्रस्ताव सरकारला दिला होता. त्यात सदृढ आणि दिव्यांगांना दीड लाख आणि वधु-वर दिव्यांग असल्यास अडीच लाखा देण्याचा प्रस्ताव होता. सामाजिक न्याय विभागाने २०१८मध्ये त्यास अनुकुलता दर्शविली होती.

त्याच बरोबर दिव्यांग व्यक्तींना स्वालंबी बनविण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणारी फिरती वाहने देण्याची घोषणा २०१८-१९च्या अर्थसंकल्पीय भाषणात केली होती. दिव्यांग व्यक्तींना प्रादेशिक परिवहन विभागाचा परवाना देण्यापासून सर्व सहाय्य करणार होते. योजनेसाठी २५ कोटी उपलब्ध करुन देण्याची मागणी होती. मंत्री समितीने देखील त्यास मान्यता दिली होती. नाश्ता, सँडविच, बर्गर अथवा फिरते किराणा मालाचे दुकान उघडता आले असते.

---

अपंग कायदा १९९५ समजायला वीस वर्षे लागली. त्यानंतर २०१६ सालचा दिव्यांग हक्क कायदा आला. त्यात चांगल्या तरतुदीही केल्या गेल्या. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी झाली नाही. दिव्यांग कल्याण कर्यालयामार्फत योजना जाहीर केल्या जातात. कधी सरकार काही घोषणा करते. मात्र, त्या योजना प्रत्यक्षात येत नसल्याचे दिसून येत आहे.

- हरिदास शिंदे, अध्यक्ष, अपंग हक्क सुरक्षा समिती