शहरं
Join us  
Trending Stories
1
'दक्षिणेतील लोक आफ्रिकन दिसतात'; सॅम पित्रोदांच्या विधानावर काँग्रेस म्हणतं, 'त्यांनी दिलेली उपमा...'
2
४ जूनच्या निकालानंतर सगळं स्पष्ट होईल; शरद पवारांच्या विधानावर पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
सॅम पित्रोदांनी ईशान्य आणि दक्षिण भारतातील लोकांच्या रंगावरून केलेल्या टिप्पणीला मोदींचं प्रत्युत्तर, म्हणाले...   
4
Sachin Pilot : "काँग्रेसला भाजपापेक्षा जास्त जागा मिळतील; जे खूप वर जातात ते एक ना एक दिवस खाली येतात"
5
उत्तर मुंबईतील सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रीत करणार; पीयूष गोयल यांनी दिली ग्वाही
6
पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका जाहीर; ४ जागांसाठी 'या' तारखेला मतदान
7
Ajit Pawar : श्रीनिवास पवारांनी मला साथ देणार असल्याचं सांगितलं होतं, पण....' अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट
8
परशुराम जन्मोत्सव: विष्णूंचा सहावा अवतार, शस्त्र-शास्त्रात पारंगत चिरंजीव; वाचा, महात्म्य
9
अरे देवा! ब्युटी पार्लरमध्ये भेटल्या, एकमेकींच्या प्रेमात पडल्या अन् घरातून पळाल्या; कोर्ट म्हणतं...
10
...अन् सुरेश रैनाने सिद्धार्थ जाधवला मारली मिठी, अभिनेता म्हणाला- "तुम्ही माझं कौतुक केलं..."
11
टोल नाकेवाल्यांनी पैसे घेतले, NHAI ला महागात पडले; परदेशी वाहनमालक नडला, 25000 चा दंड
12
30 वर्ष सहन केला नवऱ्याचा अत्याचार; बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्रीचे लग्नानंतर झाले अतोनात हाल
13
Babar Azam म्हणजे बिन कामाचा भाऊ; पाकिस्तानातील अभिनेत्रींनी कर्णधाराची उडवली खिल्ली
14
केरळमध्ये वेस्ट नाईल तापाचा प्रादुर्भाव; 'या' धोकादायक आजाराची लक्षणे काय आहेत? जाणून घ्या...
15
Smriti Irani Tax Saving Funds : स्मृती इराणींनी ज्या टॅक्स सेव्हिंग फंडात गुंतवणूक केली, माहितीये त्यांची कामगिरी कशीये?
16
रश्मिका मंदानाला विसरा, आता ही साऊथ अभिनेत्री बनली 'नॅशनल क्रश'; दुप्पट केलं मानधन
17
मनीष सिसोदियांना दिलासा नाहीच! जामीन याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली
18
उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला दिलासा! औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवच
19
अक्षय्य तृतीयेला पंचमहायोग: लक्ष्मीकृपा मिळण्यासाठी ‘हे’ उपाय करा, लाभ मिळवा; शुभच होईल!
20
‘अदानी, अंबानींकडून किती माल उचलला, त्यांना शिव्या देणं अचानक कसं काय बंद केलं?’, मोदींचा काँग्रेसला सवाल  

आम्ही काँग्रेसचा २२१ जागांचा विक्रम मोडू : प्रकाश जावडेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 9:00 PM

घराणेशाही, भ्रष्टाचार, राष्ट्रविरोधी भूमिकांना पाठिंबा व नेतृत्व यामुळे काँग्रेस दिवाळखोरीत गेली.

ठळक मुद्देसगळे विरोधी पक्ष दिवाळखोरमोजक्याच जागा लढवणारे विरोधी पक्षाची भूमिका मतदारांकडे मागत आहेत.

पुणे: देशात व राज्यातही सलग ५ वर्षे काम करून नरेंद्र मोदी, देवेंद्र मोदी यांनी जनतेचा विश्वास मिळवला आहे. त्यामुळेच देशात पुन्हा भारतीय जनता पार्टीची सत्ता आली. आता महाराष्ट्रातही तेच होणार असून काँग्रेसने राज्यात कधीकाळी केलेला २२१ जागांचा विक्रम मोडू, असे मत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केले.

निवडणूक प्रचारासाठी म्हणून जावडेकर पुण्यात आले होते. खासदार गिरीश बापट यावेळी उपस्थित होते. जावडेकर म्हणाले, घराणेशाही, भ्रष्टाचार, राष्ट्रविरोधी भूमिकांना पाठिंबा व नेतृत्व यामुळे काँग्रेस दिवाळखोरीत गेली. राष्ट्रवादीची अवस्था वेगळी नाही. कोणत्याही विरोधी पक्षात ताकद नाही. मोजक्याच जागा लढवणारे विरोधी पक्षाची भूमिका मतदारांकडे मागत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाने देशात व महाराष्ट्रात ५ वर्षे काम केले. तेच जनतेच्या मनात आहे. काही डावे पक्ष भाजपाला पाशवी बहुमत मिळाले म्हणतात, मात्र हे लोकांनी विश्वास ठेवून निवडून दिलेले सरकार आहे. त्या लोकांच्या विश्वासाचा अपमान डावे पक्ष करत आहेत.जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील राष्ट्रविरोधी घोषणांना काँग्रसने पाठिंबा दिला. ३७० कलम रद्द केले तर राहूल गांधींना तिथे गोळीबार सुरू असल्याचे स्वप्न पडले. कलम रद्द केल्यापासून ७५ दिवसात तिथेही एकही गोळी झाडली गेली नाही. राहूल यांच्या वक्तव्याचा फायदा पाकिस्ताननेघेतला. अशा राष्ट्रविरोधी भुमिकांमुळेच तो पक्ष दिवाळखोरीत गेला. अशा पक्षातील नेत्यांनाच भाजपाने प्रवेश दिला आहे याकडे लक्ष वेधले असता जावडेकर म्हणाले, पक्ष भरकटला असे ज्या काही चांगल्या लोकांना वाटले तेच आमच्या पक्षात आले आहेत. राज्याच्या प्रचारात ३७० कलम रद्द केल्याचा मुद्दा कशासाठी यावर जावडेकर यांनी राष्ट्रवाद हा निवडणुकीतील मुद्दा असू नये का असा प्रतिप्रश्न केला. विकासाच्या कामांचाही मुद्दा प्रचारात आहेच असे ते म्हणाले.रार्ष्टीय नागरिकत्वाचा मुद्दा (एनआरसी) काँग्रेसचाच होता, आता तो राबवला जातो आहे तर त्यावर टिका होते. जीएसटी लागू केला, त्यावेळी काँग्रेसचे तब्बल ७ माजी मंत्री त्याविषयीच्या समितीमध्ये होते. त्यांच्या सुचनांवरूच दर वगैरे ठरवण्यात आले. आता तेच विरोध करत आहेत. काश्मिरच्या मुद्द्यावर काँग्रेसने सभागृहात बाजूने मतदान केले व आता त्याविरोधात बोलत आहेत. त्यांचा हा दुटप्पीपणा जनतेच्या आता लक्षात आला आहे अशी टीका जावडेकरांनी केली. भाजपाचे उज्वल केसकर, आरपीआयचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे, अ‍ॅड. मंदार जोशी, परशूराम वाडेकर, नगरसेवक महेश लडकत आदी यावेळी उपस्थित होते. 

टॅग्स :PuneपुणेBJPभाजपाcongressकाँग्रेसPrakash Javadekarप्रकाश जावडेकरElectionनिवडणूकPoliticsराजकारण