शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

पाणी, वाहतुकीचा प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा

By admin | Updated: June 24, 2014 23:05 IST

माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे.

पुणो : माझा मतदारसंघ हीच माझी ओळख आहे. या मतदारसंघामध्ये शिक्षण, आरोग्य आणि विजेचा तीव्र प्रश्न नाही; मात्र पाण्याचे मोठे संकट आहे. पाणी आणि वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी मला जे करता येईल, ते सर्व करणार आहे. कारण, तोच प्रश्न सर्वाधिक महत्त्वाचा आहे, असे मत  राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.
सुळे यांनी आज लोकमत कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्या म्हणाल्या, ‘‘बारामतीमधील 19 गावांमध्ये पाण्याचे तीव्र संकट आहे. त्याला वेगवेगळी कारणो आहेत. मात्र, हे प्रश्न लवकर सुटले पाहिजेत. बारामतीमध्ये एमआयडीसी आल्यास पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होईल. पुण्यातील वाहतूक, कचरा, रुग्णालयातील कचरा यांचाही मोठा प्रश्न आहे. तो सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू करण्याचा प्रयत्न राहील. खडकवासल्याच्या पाणीसाठय़ानजीक लोकवस्ती वाढल्याने पाण्यामध्ये सांडपाणी मिसळत आहे. भविष्यात हा प्रश्न भयंकर रूप धारण करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. 
नागरिकांचा आमच्या सरकारवरच राग होता. त्याचबरोबर लोकांना या असंतोषाचा फायदा घेणारे नेतृत्व हवे होते. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमचा पराभव झाला. भाजपाने जेवढा पैसा खर्च केला, तेवढे बजेट आमच्याकडे नव्हते. माध्यमातील प्रसिद्धीवरून त्यांना मते मिळाली. आमची कामे लोकांपुढे मांडण्यात आम्ही कमी पडलो. माङो वडील शरद पवार हे सत्तेपेक्षा विरोधी पक्षात अधिक काळ होते. त्यामुळे आम्ही विरोधात बसून काम करू, असे सुळे म्हणाल्या. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांमध्ये अरेरावी आहे, असा आरोप होतो. तो खरा असेल तर, नेत्यांनी बदलले पाहिजे. हा बदल घेऊन आम्ही नागरिकांशी कनेक्ट होऊ. त्यामुळे विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे असेल, असे सुळे म्हणाल्या.
मुलगी वाचवा अभियानातून मी राज्यात महिलांना संघटित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलींना राजकारणात येण्यास आणखी वेळ लागेल. कारण, सुरक्षा, करिअर, लग्न यानंतरच मुली राजकारणाचा विचार करतात, असे त्या म्हणाल्या.(प्रतिनिधी)
 
भाजपाने उत्तर द्यावे
केंद्र सरकारने रेल्वेची दरवाढ केली. मुंबईसह अनेक ठिकाणी सर्वसामान्यांना ही दरवाढ परवडणारी नाही. सुषमा स्वराज विरोधी पक्षामध्ये होत्या तेव्हा ‘प्रणवदा, आकडों से पेट नही भरता’, असे म्हणाल्या होत्या. आम्हालाही आज भाजपाला हाच प्रश्न विचारायचा आहे. भाडेवाढीसाठी आम्ही जी कारणो देत होतो, तीच आज भाजपा देत आहे, अशी टीका सुळे यांनी केली.
 
काँग्रेसला टोला
 काँग्रेस-राष्ट्रवादीतील वाद विधानसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर पूरक नाही. त्याला दोन्ही पक्षांतील नेते खतपाणी घालत आहेत. त्यामुळे नेत्यांनी आपल्या तोंडाला पट्टी लावून घेण्याची गरज आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणताही वाद नाही, मुख्यमंत्र्यांचे पाय ओढण्याचे काम त्यांच्या पक्षातून होत आहे, असा टोला सुळे यांनी लगावला.
 
फुरसुंगीने महापालिकेत यावे
कचरा डेपोचा प्रश्न सोडविण्यासाठी अन्य चार ठिकाणो निश्चित करण्यात आली आहेत. त्यातील दोन जागांचा ताबा मिळाला आहे. फुरसुंगी गावाचा प्रश्न सुटण्यासाठी त्याचा महापालिकेत समावेश होण्याची गरज आहे.
 
खासगी जीवन सर्वासारखेच
नोकरी किंवा शेती करणारी महिला यांना खूप कष्ट आहेत. त्यामुळे मी माझी जबाबदारी फार मोठी मानत नाही, असे सुळे म्हणाल्या.