शहरं
Join us  
Trending Stories
1
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
2
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
3
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
4
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
5
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
6
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
7
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
8
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
9
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
10
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
11
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
12
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
13
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
14
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
15
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
16
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
17
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
18
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
19
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
20
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
Daily Top 2Weekly Top 5

कुकडी प्रकल्पातील पाणी पेटणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 02:53 IST

धरणांनी गाठला तळ, प्रकल्पात केवळ ४० टक्के पाणी शिल्लक

- लक्ष्मण शेरकर ओझर : कुकडी प्रकल्पातून रब्बीच्या आवर्तनासाठी २५ आॅक्टोबरपासून आवर्तन सुरू आहे. ४९ दिवस झाले, तरी अजून ते बंद न झाल्यामुळे कुकडी प्रकल्पातील पाणीपातळी वेगाने घटत आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व चार धरणांत फक्त ४.७५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे, तर आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात सर्वाधिक ७.५१९ टीएमसी पाणी शिल्लक असल्यामुळे येत्या काळात दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुकडीचे पाणी पेटणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.जुन्नर, आंबेगाव तालुक्यांतील शेतकरी व पारनेर, श्रीगोंदा, कर्जत, शिरूर व करमाळा तालुक्यांतील शेतकऱ्यांमध्ये कुकडीचे पाणी सोडण्यावरून संघर्ष पेटण्याची स्थिती निर्माण झाली आहे. पहिलेच रब्बीचे आवर्तन एवढ्या मोठ्या प्रमाणात सुरू आहे. कालवा सल्लागार समितीत झालेल्या नियोजनापेक्षा अतिरिक्त पाणी नगर जिल्ह्याला दिले जात असल्याने जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय पक्ष याकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे डोळ्यादेखत धरणे रिकामी होत असल्यामुळे जुन्नर तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाले आहेत.कुकडी प्रकल्पात एडगाव, मणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगा, डिंभे ही धरणे येतात. कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १ चे कार्यकारी अभियंता के. आर. कानडे व शाखाधिकारी जयसिंग घळगे यांनी दिलेल्या माहितीनुसार कुकडी प्रकल्पाची एकूण पाणी साठवण क्षमता ३७.२५६ टीएमसी आहे, तर उपयुक्त पाणीसाठा ३०.५३६ टीएमसी आहे. यावर्षी पाऊस कमी झाल्यामुळे या प्रकल्पात २५.६८५ टीएमसी म्हणजेचे ८४.३१ टक्के पाणीसाठा १५ आॅक्टोबरपर्यंत झाला होता. एडगाव धरणात २.१३७ टीएमसी पाणी साठले होते. माणिकडोह धरणात ७.६२९ टीएमसी म्हणजेच, ७४.९७ टक्के पाणी साठले होते. वडज १.०७६ टीएमसी (९२ टक्के), पिंपळगाव जोगा २.२५६ टीएमसी (६५.७० टक्के) व डिंभे धरणात १२.२२८ टीएमसी (९८.३४ टक्के) पाणीसाठा होता. कालवा समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार रब्बीसाठी आवर्तन सुरू आहे. हे आवर्तन आजही सुरूच आहे. आतापर्यंत कुकडी डाव्या कालव्याद्वारे ५.८८८ टीएमसी, डिंभे उजवा कालवा ०.८३१ टीएमसी व पिंपळगाव जोगा डावा कालव्यातून ०.८६७ टीएमसी पाणी सोडले गेले. हे आवर्तन आजही सुरूच आहे. वडज व डिंभे धरणातून एडगाव धरणात पाणी सोडले जात आहे. यामुळे आज एडगाव धरणात ०.७५३ टीएमसी (३०.७५ टक्के), माणिकडोह धरणात १.९४३ टीएमसी (१९.०९टक्के) पाणी शिल्लक आहे. तर वडज धरणात ०.५६६ टीएमसी (४८.३६ टक्के), पिंपळगाव जोगे धरणात १.४८९ टीएमसी (३८.२८ टक्के) आणि डिंभे धरणात ७.५१९ टी एम सी (६०.१८ टक्के)पाणी शिल्लक राहिले आहे.संपूर्ण प्रकल्पात निम्म्यापेक्षाही कमी म्हणजेच १२.२७१ टी एम सी (४०.१८ टक्के) पाणी आज शिल्लक आहे. या पाण्यावर किमान पुढील सहा महिने काढावे लागणार आहे. जुन्नर तालुक्यातील सर्व चार धरणांत फक्त ४.७५१ टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून आंबेगाव तालुक्यातील डिंभा धरणात सर्वाधिक ७.५१९ टीएमसी इतका भरीव पाणीसाठा शिल्लक आहे.पाण्याची स्थिती पाहता जुन्नर तालुक्यातील सर्वच राजकीय नेते नगर व सोलापूर जिल्ह्यातील राजकीय हितसंबंधामुळे पाणीप्रश्नावर ठोस भूमिका घेताना दिसत नाहीत. या मंडळीची उदासीनता पाहता शेतकरीवर्गाला भविष्यात पाण्यासाठी स्वत:च संघर्ष करण्याची तयारी करावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे, आवर्तन कायम राहिले तर तालुक्याला शेतीबरोबर पिण्याच्या पाणीटंचाईला सामोरे जावे लागेल.दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर कुकडीच्या पाण्याचे जे नियोजन होणे अपेक्षित होते, ते झाले नसल्यामुळे तालुक्यातील शेतकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या लोकप्रतिनिधींनी पाण्याचे नियोजन केलेले नाही. कालवा सल्लागार समितीच्या पाणी वाटप बैठकीला लोकप्रतिनिधी हजर नसल्यामुळे हे पाणी पळविले जात आहे व जे पाणी खाली सोडले आहे- खालील लोकांनी ओढे भरून पाण्याचा दुरुपयोग केला आहे.-अतुल बेनके, राष्ट्रवादी काँगे्रस, माजी युवा प्रदेश उपाध्यक्षकुकडी प्रकल्पातून पारनेर, श्रीगोंदा, कर्जत व करमाळा या तालुक्यांसाठी पाणी सोडले असले, तरी दुष्काळाची पार्श्वभूमी पाहता जुन्नर तालुक्यातील शेतकºयांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही याचे नियोजन केले आहे. माणिकडोह धरणात जवळपास दोन टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे ते पाणी जुन्नर शहराला पिण्यासाठी, तालुक्यासाठी शेतकरीवर्गासाठी राहणार आहे. पिंपळगाव धरणातील पाणीसाठा व साडेचार टीएमसी मृतसाठा हा जुन्नर तालुक्यातील व पारनेर तालुक्यातील शेतकरी यांना त्याचा उपयोग होईल. डिंभेमधील पाणी कालव्याद्वारे एडगाव धरणात सोडले जाणार आहे. कुकडी प्रकल्पातून दुसरे उन्हाळी आवर्तन चांगले होऊनदेखील तालुक्यातील शेतकºयांना जून पर्र्यंत गरजेपेक्षा अधिक पाणी शिल्लक ठेवण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीतठरले आहे.- शरद सोनवणे, आमदारपारनेर, श्रीगोंदा, कर्जत; तसेच करमाळा तालुक्यातील शेतकºयांच्या हिताचा विचार करून कुकडीचे पाणी मोठ्या प्रमाणात वाहून नेण्याचा जो काही प्रयत्न चालू आहे, तो यशस्वी होऊ देणार नाही. वेळप्रसंगी जुन्नर तालुक्यातील शेतकºयांच्या हितासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आली, तर मागे-पुढे पाहणार नाही.- आशा बुचके, शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या गटनेत्या तालुक्यातील सर्व धरणांतील खालावणारी पाणीपातळी पाहता शेतकºयांच्या दृष्टीने पुढील सहा महिन्यांचा काळ हा शेतीसाठी, पिण्याच्या पाण्यासाठी खडतर असणार आहे. यापुढे सर्व धरणांतील पाणी हे तालुक्यातील शेतकºयांसाठी राखीव ठेवले पाहिजे, सध्या पाणी हे शेतकºयांच्या आर्थिक हिताशी निगडित असून पाणीप्रश्नावर विघ्नहर कारखाना शेतकºयांच्या मागे खंबीर उभा असून वेळप्रसंगी प्रत्येक धरणावर जाऊन गेट बंद आंदोलन करू, परंतु पाणी खाली सोडू दिले जाणार नाही.- सत्यशील शेरकर,अध्यक्ष, विघ्नहर साखर कारखाना

टॅग्स :DamधरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई