शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 17:12 IST

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा

भोर : भाटघर धरणातीलपाणीसाठा कमी झाल्यामुळे उद्यापासून (दि. १३) मेपासून भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची महिती मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी दिली.

भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला भोर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. धरणाच्या भिंतीपासून चारी खोदून विहिरीत पाणी घेतलेले आहे. मात्र धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा असल्यामुळे चारीतून पाहिजे त्या प्रमाणात पाणी विहिरीत येत नाही. शिवाय धरणावरील वीजनिर्मिती केंद्रही बंद आहे.त्यामुळे विहिरीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भोर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमता असलेल्या दोन मोटारी आहेत. मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फक्त ६० एचपीची मोटारच सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भोर शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, भोर शहरातील लोकांना चांगले स्वच्छ पाणी मिळावे यासाठी दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे. अशा आशयाचे निवेदन नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले असून, शहरातून दवंडी पिटविण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी मे महिन्यात धरणातील पाणीसाठा कमी झाला की भोर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळे दिवासाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे .मात्र भोर, नगरपलिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भोर नगरपलिकेकडून पाटबंधारे विभागाला भाटघर धरणातील पाण्यासाठी सुमारे २५ लाख रुपये पाणीपट्टी दरवर्षी दिली जाते. मात्र नगरपलिकेकडून तीन लाख रुपये पाणीपट्टी थकलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणीपट्टी नगरपलिकेकडून दिली जाते; मात्र दर मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवते यामुळे भोर शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत

नियोजनाच्या अभावामुळे ओढवले संकट

भोर शहराला भाटघर धरणाखाली विहीर काढली असून, पावर हाऊसमधून बाहेर पडणारे पाणी त्या विहिरीत जाते आणि भोर शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावर हाऊस बंद झाल्याने धरणातील पाणी बाहेर पडत नाही. केवळ धरणातून लिक होणारे थोडेफार पाणी नगरपालिकेने चारी काढून विहिरीत सोडले आहे, मात्र हे पाणी पुरेसे नाही. धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाही नगरपलिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे यामुळे ऐन उन्हाळ्यात भोर शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरणRainपाऊसTemperatureतापमानSocialसामाजिकenvironmentपर्यावरण