शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
2
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
3
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
4
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
5
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
6
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
7
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
8
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
9
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
10
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
11
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
12
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
13
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
14
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
15
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
16
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
17
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
18
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
19
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
20
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी

भोर शहरावर पाण्याचे संकट; ऐन उन्हाळ्यात उद्यापासून दिवसाआड पाणीपुरवठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2024 17:12 IST

भोरच्या भाटघर धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा

भोर : भाटघर धरणातीलपाणीसाठा कमी झाल्यामुळे उद्यापासून (दि. १३) मेपासून भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याची महिती मुख्याधिकारी श्रीराम पवार यांनी दिली.

भोर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या भाटघर धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला भोर शहराला पाणीपुरवठा करणारी विहीर आहे. धरणाच्या भिंतीपासून चारी खोदून विहिरीत पाणी घेतलेले आहे. मात्र धरणात केवळ १० टक्के पाणीसाठा असल्यामुळे चारीतून पाहिजे त्या प्रमाणात पाणी विहिरीत येत नाही. शिवाय धरणावरील वीजनिर्मिती केंद्रही बंद आहे.त्यामुळे विहिरीत येणाऱ्या पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे. भोर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी ९० एचपी आणि ६० एचपी क्षमता असलेल्या दोन मोटारी आहेत. मात्र पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे फक्त ६० एचपीची मोटारच सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे भोर शहराला कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून, भोर शहरातील लोकांना चांगले स्वच्छ पाणी मिळावे यासाठी दिवसाआड पाणी सोडण्याचा निर्णय नगरपालिका प्रशासनाने घेतलेला आहे. अशा आशयाचे निवेदन नगरपालिकेच्या वतीने देण्यात आले असून, शहरातून दवंडी पिटविण्यास सुरुवात केली आहे.

दरवर्षी मे महिन्यात धरणातील पाणीसाठा कमी झाला की भोर शहरात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवते त्यामुळे दिवासाआड पाणीपुरवठा करावा लागत आहे .मात्र भोर, नगरपलिकेकडून तात्पुरती मलमपट्टी केली जाते. कोणत्याही प्रकारच्या ठोस उपाययोजना केल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. भोर नगरपलिकेकडून पाटबंधारे विभागाला भाटघर धरणातील पाण्यासाठी सुमारे २५ लाख रुपये पाणीपट्टी दरवर्षी दिली जाते. मात्र नगरपलिकेकडून तीन लाख रुपये पाणीपट्टी थकलेली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात दरवर्षी पाणीपट्टी नगरपलिकेकडून दिली जाते; मात्र दर मे महिन्यात पाण्याची टंचाई जाणवते यामुळे भोर शहरातील नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत

नियोजनाच्या अभावामुळे ओढवले संकट

भोर शहराला भाटघर धरणाखाली विहीर काढली असून, पावर हाऊसमधून बाहेर पडणारे पाणी त्या विहिरीत जाते आणि भोर शहराला पाणीपुरवठा केला जातो. मात्र पावर हाऊस बंद झाल्याने धरणातील पाणी बाहेर पडत नाही. केवळ धरणातून लिक होणारे थोडेफार पाणी नगरपालिकेने चारी काढून विहिरीत सोडले आहे, मात्र हे पाणी पुरेसे नाही. धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक असतानाही नगरपलिकेच्या नियोजनाच्या अभावामुळे भोर शहराला दिवसाआड पाणीपुरवठा केला जाणार आहे यामुळे ऐन उन्हाळ्यात भोर शहरातील नागरिकांचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल होणार आहेत.

 

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीDamधरणRainपाऊसTemperatureतापमानSocialसामाजिकenvironmentपर्यावरण