शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:21 IST

जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.

आपटाळे : जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.किल्ले शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शिवप्रेमीच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी जुन्नर तालुक्यातील १३ जणांना ‘शिवनेरभूषण पुरस्कार’ शालेय शिक्षणमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन हे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक किल्ल्यांची डागडुजी करण्यात येत आहे, त्याकरिता १२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिंहगड किल्ल्याप्रमाणे शिवनेरीवरही दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली जाईल. यावर्षापासून जुन्नरला शिवनेरी महोत्सव सुरु केला आहे. सांस्कृतिक विभागाने याबाबतीत छान काम केले.शिक्षण विभागात जुन्नर तालुक्याचे काम चांगले आहे. राज्यात इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात २५ हजार विद्यार्थी आले. यांचे श्रेय जिल्हा परिषद शिक्षकांना जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे. मराठी भाषा डोळे आहे, तर इंग्रजी भाषा चष्मा आहे.जर डोळेच नसतील तर चष्म्याचा काय उपयोग? असे ही यावेळी तावडे म्हणाले .ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष यात्रा जुन्नरमधून काढली. त्यामुळे शिवशाही आली होती. आम्ही छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचाराने काम करत आहोत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणारच.यावेळी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्याची जबाबदारी पंकजाताई मुंडे यांच्यावर टाकली आहे.खासदार शिवाजीराव आढळराव यांनी याभागातील प्रश्नांना चालना देण्याची मागणी केली. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी पर्यटनास चालना व दाºयाघाटाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली .त्याचप्रमाणे शिवनेर महोत्सव सुरू केल्याबद्दल शासनास धन्यवाद दिले.२0१६-१७- भरत अवचट, राजश्री बोरकर, सुंदरताई कुºहाडे, तात्यासाहेब गुंजाळ, विष्णुपंत महाराज ढमाले, गणेश वाळुंज, मुरलीधर काळे, जे. एल. वाबळे, प्रमोद महाबरे (मरणोत्तर)२0१७-१८ बाजीराव दांगट, प्रकाश खांडगे, रमेश खरमाळे, दत्ता म्हसकर, अनिलतात्या मेहेर, माऊली वाबळे, केरुशेठ वेठेकर, महादेव वाघ, वैभव गायकवाड, (मरणोत्तर पुरस्कार निवृत्तीशेठ शेरकर, शिवाजीराव काळे, विलास तांबे )

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे