शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

दा-याघाटास लवकरच चालना देणार - विनोद तावडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2018 07:21 IST

जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.

आपटाळे : जुन्नर तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून लवकरच घोषित करण्यात येईल, त्याचप्रमाणे दाºयाघाटास चालना देण्यात येईल, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी जुन्नर येथे व्यक्त केले.किल्ले शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने आयोजित केलेल्या शिवप्रेमीच्या मेळाव्यात ते बोलत होते.यावेळी राज्याचे ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, मुंबईचे भाजपा अध्यक्ष आशिष शेलार, जुन्नरचे आमदार शरद सोनवणे व पुणे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.यावेळी जुन्नर तालुक्यातील १३ जणांना ‘शिवनेरभूषण पुरस्कार’ शालेय शिक्षणमंत्री व अन्य मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन हे सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक किल्ल्यांची डागडुजी करण्यात येत आहे, त्याकरिता १२८ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सिंहगड किल्ल्याप्रमाणे शिवनेरीवरही दृकश्राव्य माध्यमातून माहिती दिली जाईल. यावर्षापासून जुन्नरला शिवनेरी महोत्सव सुरु केला आहे. सांस्कृतिक विभागाने याबाबतीत छान काम केले.शिक्षण विभागात जुन्नर तालुक्याचे काम चांगले आहे. राज्यात इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात २५ हजार विद्यार्थी आले. यांचे श्रेय जिल्हा परिषद शिक्षकांना जाते. मातृभाषेतून शिक्षण घेतले पाहिजे. मराठी भाषा डोळे आहे, तर इंग्रजी भाषा चष्मा आहे.जर डोळेच नसतील तर चष्म्याचा काय उपयोग? असे ही यावेळी तावडे म्हणाले .ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, गोपीनाथराव मुंडे यांनी संघर्ष यात्रा जुन्नरमधून काढली. त्यामुळे शिवशाही आली होती. आम्ही छत्रपती शिवाजीमहाराजांच्या विचाराने काम करत आहोत. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविणारच.यावेळी समाजकल्याण मंत्री दिलीप कांबळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पर्यटन मंत्री जयकुमार रावळ यांनी जुन्नर तालुका पर्यटन तालुका घोषित करण्याची जबाबदारी पंकजाताई मुंडे यांच्यावर टाकली आहे.खासदार शिवाजीराव आढळराव यांनी याभागातील प्रश्नांना चालना देण्याची मागणी केली. जुन्नरचे आमदार शरददादा सोनवणे यांनी पर्यटनास चालना व दाºयाघाटाचा प्रश्न सोडविण्याची मागणी केली .त्याचप्रमाणे शिवनेर महोत्सव सुरू केल्याबद्दल शासनास धन्यवाद दिले.२0१६-१७- भरत अवचट, राजश्री बोरकर, सुंदरताई कुºहाडे, तात्यासाहेब गुंजाळ, विष्णुपंत महाराज ढमाले, गणेश वाळुंज, मुरलीधर काळे, जे. एल. वाबळे, प्रमोद महाबरे (मरणोत्तर)२0१७-१८ बाजीराव दांगट, प्रकाश खांडगे, रमेश खरमाळे, दत्ता म्हसकर, अनिलतात्या मेहेर, माऊली वाबळे, केरुशेठ वेठेकर, महादेव वाघ, वैभव गायकवाड, (मरणोत्तर पुरस्कार निवृत्तीशेठ शेरकर, शिवाजीराव काळे, विलास तांबे )

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे