शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
4
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
5
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
6
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
7
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
8
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
9
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
10
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
11
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
12
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
13
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
14
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
15
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
16
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
17
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
18
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
19
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
20
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वेध विलिनीकरणाचे : नऱ्हे १

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:19 IST

नऱ्हे ग्रामस्थांचा सवाल दीपक मुनोत लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : कचऱ्याच्या प्रश्नाबरोबरच अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा आणि वाढती झोपडपट्टी अशा ...

नऱ्हे ग्रामस्थांचा सवाल

दीपक मुनोत

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : कचऱ्याच्या प्रश्नाबरोबरच अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा आणि वाढती झोपडपट्टी अशा समस्यांचा सामना करणाऱ्या नऱ्हे गावातील रहिवाशांना विलिनीकरणानंतर या समस्या सुटतीलच, यावर विश्वास ठेवणे कठीण जातेय. चांगल्या सुविधा उपलब्ध न झाल्याने ग्रामस्थ नाराज आहेत. नव्या रचनेत या समस्यांचे काय, असा त्यांचा सवाल आहे.

पुणे शहरालगतच्या अन्य गावांमध्ये कचरा निर्मूलन होत असले, तरीही सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या नऱ्हे गावात कचरा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गावात वाढत असलेली झोपडपट्टी आणि अंतर्गत रस्ते या विषयांना ग्रामस्थ तोंड देत आहेत.

सुमारे दीड लाख लोकसंख्येच्या नऱ्हे गावात दररोज २० टन कचरा निर्माण होतो. तो उचलण्यासाठीची ग्रामपंचायतीची यंत्रणा तोकडी असल्याने कॅनॉल परिसर आणि गावाला जोडणाऱ्या शिवणे-नऱ्हे पुलाजवळ कचऱ्याचे ढिगारे साचलेले आहेत. त्यावर भटक्या जनावरांचा वावर असतो, मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण मिळते. त्यामुळे लवकरात लवकर हा प्रश्न निकाली काढावा, अशी गावकऱ्यांची अपेक्षा आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू असताना या कचऱ्यामुळे साथरोगाने थैमान घातले तर जबाबदार कोण, असाही प्रश्न नागरिक विचारतात. ग्रामपंचायतीची वार्षिक उलाढाल १५ कोटींची असूनही मूलभूत सुविधा उपलब्ध झाल्या नसल्याबाबतही तीव्र नाराजी आहे. मुख्य रस्त्यावर मोठी रहादारी असते. नेमका तोच रस्ता अजूनही अपूर्ण असल्याने अपघाताची भीती नागरिकांना आहे. पुणे महानगर प्रादेशिक विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) माध्यमातून गावात सव्वातीन कोटी रुपयांची रस्त्यांची कामे सुरू आहेत. गावात झोपडपट्टीवासीयांचे प्रमाण लक्षणीय आहे. या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधांची वाणवा आहे. सरकार पुनर्वसन करणार की नाही, अशा चिंतेत झोपडपट्टीवासीय दिवस पुढे ढकलत आहेत.

*कोट*

याआधी जी अकरा गावे महानगरपालिकेत समाविष्ट झाली त्यांची परिस्थिती आजतागायत सुधारलेली नाही. त्यामुळे सरकारने आमच्या गावाचे विलिनीकरण करुन दुर्दशा करु नये. ग्रामपंचायतीमार्फत गावात अनेक विकासकामे सुरू आहेत.

-सागर भूमकर, उपसरपंच

---------

रस्त्यांवर अवजड वाहनांची संख्या वाढल्याने मोठ्या प्रमाणात धूळ उडते. गाड्यांचे कसेही पार्किंग केले जाते. संध्याकाळी नवले पूल आणि गणपती चौकात वाहतूककोंडी होत असल्याने ही दररोजची डोकेदुखी ठरत आहे.

-संतोष खाडे, स्थानिक