शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

सीएमडीं’चा अस्थिर झुला

By admin | Updated: April 12, 2015 00:26 IST

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही.

पुणे : सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी स्थापन केलेल्या पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) गाडीला आठ वर्षांत पूर्णवेळ ‘चालक’च मिळालेला नाही. या काळात पीएमपीची धुरा खांद्यावर असलेले तब्बल १२ अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (सीएमडी) पुणेकरांनी पाहिले. कधी एक दिवस तर कधी चार महिन्यांसाठी भार खांद्यावर घेतलेल्या ‘सीएमडीं’चा अस्थिर झुला पीएमपीच्या सुधारणांना लटकवणारा ठरला आहे.पुणे व पिंपरी-चिंचवड पालिकांची स्वतंत्र सार्वजनिक वाहतूक सेवा २००७ मध्ये एकत्र करून ‘पीएमपी’ ही कंपनी स्थापन करण्यात आली. कंपनी तयार करताना कंपनीचे सर्वेसर्वा म्हणून अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पद निर्माण करण्यात आले. या पदावर ‘आयएएस’ दर्जाचा अधिकारी नेमण्याचे निश्चित केले. त्यानुसार १९ आॅगस्ट २००७ रोजी सुब्बराव पाटील यांच्या रूपाने ‘पीएमपी’ला पहिले सीएमडी मिळाले. पाटील यांना काम करण्यासाठी सुमारे १३ महिन्यांचाच कालावधी मिळाला. मात्र, या काळातही त्यांनी पीएमपी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यानंतर अश्वनीकुमार यांच्यावर केवळ एकच दिवस हा भार सोपविण्यात आला. त्यांची बदली झाल्यानंतर पुन्हा पाटील यांना दीड महिन्याची तर त्यानंतर पुन्हा अश्वनीकुमार यांना तीन महिन्यांसाठी संधी देण्यात आली.‘सीएमडी’ बदलाची ही मोहीम राज्य शासनाने पुढेही नित्यनेमाने सुरूच ठेवली. मागील आठ वर्षांत तब्बल १२ अधिकारी बदलण्यात आले. खाडे यांच्यानंतर आर. एन. जोशी यांचा अपवाद वगळता सीएमडी म्हणून आलेल्या सर्व अधिकाऱ्यांवर हा भार अतिरिक्त म्हणून सोपविण्यात आला. त्यांच्याकडे इतर विभागांची मुख्य जबाबदारी होती. त्यामध्ये महेश झगडे, शिरीष कारले, दिलीप बंड, राजीव जाधव, डॉ. श्रीकर परदेशी आणि काही दिवसांपूर्वीच आलेले ओमप्रकाश बकोरिया या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. आतापर्यंत केवळ जोशी यांनीच पूर्ण तीन वर्षे पीएमपी सांभाळली. मात्र, सुरुवातीपासून टप्प्याटप्याने नवीन अधिकारी मिळत गेल्याने पीएमपीच्या दुर्दशेला सुरुवात झाली. मागील दोन-तीन वर्षांत तर पीएमपीला जणू उतरती कळा लागली आहे. आतापर्यंत अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालकसुब्बराव पाटील (१९ आॅगस्ट २००७ ते २१ सप्टेंबर २००८), अश्वनीकुमार (२२ सप्टेंबर २००८ (एकच दिवस), सुब्बराव पाटील (२३ सप्टेबिंर ते ५ नोव्हेंबर २००८), अश्वनीकुमार (५ नोव्हेंबर २००८ ते ५ फेबु्रवारी २००९), नितीन खाडे (९ फेबु्रवारी ते २५ आॅगस्ट २००९), महेश झगडे (२५ आॅगस्ट ते ७ सप्टेंबर २००९ (अतिरिक्त पदभार), शिरीष कारले (७ सप्टेंबर २००९ ते २३ फेबु्रवारी २०१० (अतिरिक्त पदभार), दिलीप बंड (२३ फेब्रुवारी २०१० ते ३ जानेवारी २०११ (अतिरिक्त पदभार), आर. एन. जोशी (३ जानेवारी २०११ ते ३१ आॅक्टोबर २०१४), राजीव जाधव (१ नोव्हेंबर ते १३ डिसेंबर २०१४ (अतिरिक्त पदभार), डॉ. श्रीकर परदेशी (१४ डिसेंबर २०१४ ते ४ एप्रिल २०१५ (अतिरिक्त पदभार)