शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
4
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
5
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
6
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
7
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
8
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
9
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
10
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
11
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
12
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
13
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
14
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
15
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
16
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
17
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
18
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
19
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
20
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!

उजणी धरणात गतवर्षीपेक्षा यंदा सात टक्के जादा पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2022 10:59 IST

'पुढील दोन महिने सोलापूरला पाण्याची कमतरता भासणार नाही...'

इंदापूर: उजणी धरणातील (ujani dam reservoir) सध्याची पाणीपातळी मागील वर्षीच्या तुलनेत ७ टक्क्यांनी जास्त आहे. सोलापूरला पिण्यासाठीच्या पाण्याचे एक आवर्तन मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्ण झाले आहे. तरीही उजणी धरणात अजून ६६.९३ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पुढील दोन महिने सोलापूरला पाण्याची कमतरता भासणार नसल्याची माहिती उजणी धरण पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता आर. पी. मोरे यांनी दिली.

धरणाचे पाणी पंढरपूर, मंगळवेढा व सोलापूरसह आजूबाजूच्या गावाला पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरासाठी उपयोगात आणले जाते. या परिसरामध्ये जवळजवळ ३० ते ४० साखर कारखाने हे उजनीच्या पाण्यावर अवलंबून आहेत. धरणातील सध्याची पाणीपातळी ४९५.२३० मीटर आहे. एकूण ३५.८६ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या उजनीतून सीना-माढा बोगदा २२२ क्युसेक, दहीगाव एल- आयएस ८४ क्युसेक, बोगदा १०० क्युसेक, व मुख्य कॅनाल ३०० क्युसेक असा एकूण ७०६ क्युसेकने पाणी विसर्ग सुरू आहे.

उजनी धरणाची पाणीसाठवण क्षमता ११७ टीएमसी इतकी आहे. चालू हंगामात उजनी धरण परिसर व भीमा खोऱ्यात पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तर धरण परिसरात अवकाळी पावसाचे प्रमाण या वर्षी जास्त झाल्याने उजनीच्या खालच्या भागातील शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्याची कमतरता फारच कमी भासली. त्यामुळे या वर्षी चालू हंगामात उजनीतून शेतीसाठी पाण्याच्या आवर्तनाची मागणी झाली नाही. परिणामी धरणात पाणीसाठा मुबलक शिल्लक राहिल्याने या पाण्याचा फायदा पुणे, सोलापूर व अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व नागरिकांना जास्त होणार आहे.

उजनी धरणात मुबलक प्रमाणात उपयुक्त असलेला पाणीसाठा

२८०३२०२२-बारामती-१५

टॅग्स :PuneपुणेWaterपाणीSummer Specialसमर स्पेशलRainपाऊसSolapurसोलापूरIndapurइंदापूर