शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

खंडाळ्यातील एस वळणावर भीषण अपघात, दोन जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 2:45 PM

खंडाळ्यातील एस वळणावरील भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

ठळक मुद्देखंडाळ्यातील एस वळणावरील भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत.

शिरवळ - खंडाळा गावच्या हद्दीतील धोकादायक एस वळणावरील अपघाताची मालिका संपत नाही आहे. हे वळण काढण्यासाठी प्रशासनाकडून हालचाली सुरू असतानाच आणि भूमीपूजनाच्या आदल्या दिवशीच या वळणावर दोन तरुणांना जीव गमवावा लागला आहे.  शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली.

निलेश मानाजी भवर (32), लहुराज हणमंत चव्हाण (30) अशी अपघातातमृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. याबाबात अधिक माहिती अशी की, भवर आणि चव्हाण हे दोघे दुचाकीवरून सुरूरहून म्हावशी, ता. खंडाळा येथे निघाले होते. एस वळणावर पोहोचल्यानंतर पुढे निघालेल्या अज्ञात वाहनाला त्यांच्या दुचाकीची जोरदार धडक बसली. यात दोघेही जागीच ठार झाले. हा अपघात झाल्याचे समजताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. दोघांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले.

दरम्यान, या एस वळणावर आत्तापर्यंत 76 जणांचा बळी गेला होता. त्यामुळे हे वळण काढण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव टाकण्यात आला होता. अखेर हे वळण काढण्याचा शासन पातळीवर निर्णय झाल्यानंतर त्याचे भूमिपूजन रविवार 23 रोजी होणार आहे. असे असताना या एस वळणाच्या भूमीपूजनाच्या आदल्या दिवशीच  या वळणाने दोघांचे बळी घेतल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. शासनाने केवळ भूमीपूजन करून न थांबता तत्काळ एस वळण काढण्याचे काम हाती घ्यावे, अशी मागणी यानिमित्ताने नागरिकांमधून होत आहे.

टॅग्स :AccidentअपघातPuneपुणेDeathमृत्यू