शहरं
Join us  
Trending Stories
1
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
2
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
3
काय आहे शिमला करार? पाकिस्तान देतोय रद्द करण्याची धमकी; सोप्या भाषेत समजून घ्या...
4
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
5
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
6
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
7
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
8
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
9
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
10
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
11
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
12
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
13
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
14
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
15
टी२० क्रिकेटमध्ये ऋषभ पंत अपयशी का ठरतोय? चेतेश्वर पुजाराने सांगितलं त्यामागचं कारण!
16
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
19
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
20
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'

मुख्यमंत्री शिंदे प्रचारासाठी पुण्यातच; MPSC च्या विद्यार्थ्यांसह शरद पवारांसोबतची आजची बैठक रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 11:37 IST

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होतं.

एमपीएससीने (MPSC) नवीन पॅटर्ननुसार वर्णनात्मक पध्दत २०२५ पासून लागू करावी, या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी सोमवारपासून सुरू असलेले आंदोलन आजही म्हणजेच सलग चौथ्या दिवशीही सुरु आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची भेट घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणतो, असं आश्वासन दिलं होतं. त्याप्रमाणे आज आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांची एकनाथ शिंदेंसोबत भेट होणार होती. मात्र ही आजची भेट रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. 

एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ आज शरद पवारांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मुंबईतील सह्याद्री अतिथीगृहात भेट घेणार होतं. मागील चार दिवसांपासून पुण्यात सुरु असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर यातून तोडगा निघेल अशी अपेक्षा होती. मात्र ही बैठक अचानक रद्द करण्यात आली.  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईला न जाता कसबा आणि चिंचवडच्या पोटनिवडणुकीसाठी आज दिवसभर पुण्यातच थांबणार असल्यान ही बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मुख्यमंत्री दोन दिवस पुण्यात आहेत, मात्र तरीही ते विद्यार्थ्यांना भेटायला येत नाही, अशी चर्चाही आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये सुरु आहे.  

आंदाेलनाच्या दुसऱ्या दिवशी मंगळवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आंदाेलनस्थळी भेट दिली आणि आंदाेलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. हा प्रश्न सुटू शकताे असा विश्वास त्यांनी विद्यार्थ्यांना देत मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांसाेबत बैठक घेऊ आणि चर्चा करू असे आश्वासन दिले. मात्र, त्यानंतरही आंदाेलन सुरूच ठेवत जाेपर्यंत एमपीएससी नाेटिफिकेशन काढत नाही ताेपर्यंत उपाेषणावर ठाम असल्याचे आंदाेलक विद्यार्थ्यांनी सांगितले.

आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय?

एमपीएससीचा नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा. नव्या पद्धतीच्या अभ्यासासाठी किमान ५ ते ६ महिने वेळ मिळावा. आयोगानं घाईघाईनं नवी पद्धती अमलात आणू नये.तसेच नवा अभ्यासक्रम यूपीएससीच्या अभ्यासक्रमावर आधारित असल्यानं पुस्तकं उपलब्ध नाहीत. म्हणून ती उपलब्धता करुन द्यावी, अशा प्रमुख ४ मागण्या आंदोलकांच्या आहेत. आंदोलकांचा नव्या पद्धतीला विरोध नसून त्याच्या तातडीच्या अंमलबजावणीला आहे. साधारणपणे दर १० वर्षांनी परीक्षा पद्धतीत बदल होतो. याआधी २०१४पर्यंत एमपीएससीची परीक्षा ही वर्णनात्मक पद्धतीनंच होत होती. २०१४ ते २०२३ पर्यंत तीचं स्वरुप पर्यायवाचक झालं. आणि आता २०२३ मध्ये पुन्हा परीक्षेचं स्वरुप सविस्तर लेखी पद्धतीनं नियोजीत आहे.

विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणार- उपमुख्यमंत्री

कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. विद्यार्थ्यांमध्ये निराशा तयार होत आहे. त्यामुळे थोडासा वेळ दिला पाहिजे. कोणाचाही विरोध नवीन पॅटर्नला नाही. २०२५ पासून लागू करा हीच मागणी आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पुन्हा त्यांना सांगितले असून तुमचा निर्णय रीकन्सिडर करा. यासंदर्भात राज्य सरकार सातत्याने पाठपुरावा करत असून. त्यांनी जर री कन्सिडर केला नाही तर राज्य सरकारला न्यायालयात जाण्याचा विचार करावा लागेल. आम्हाला शेवटी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहावे लागेल. त्यांना निराश करून चालणार नाही ते उद्याचं भविष्य आहेत. त्यासाठी जे जे लागेल ते करू माझी फक्त एक विनंती आहे कोणीही यात राजकारण आणू नये. विद्यार्थी हिताचे निर्णय सर्वांना घ्यावे लागतील, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेSharad Pawarशरद पवारMPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPuneपुणे