शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

जिरायती भागाला निरा - कऱ्हा उपसा योजना राबवणार; तालुक्यातील ३३ गावांना होणार लाभ - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2024 12:25 IST

जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले

सुपे : बारामती तालुक्यातील ३३ गावांचा जिरायती शिक्का कायमचा घालवण्यासाठी १ हजार २५ कोटी खर्चाची  नीरा - कऱ्हा उपसा जलसिंचन योजना राबवणार असुन यामुळे ४५ हजार एकर क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.  बोरकरवाडी ( ता. बारामती ) येथील तलावापर्यंत टीसीएस फाऊंडेशनच्यावतीने सीएसआर फंडातुन सुमारे २ कोटी ८८ लाख खर्चाच्या बंदिस्त पाईप लाईनच्या कामाचे भुमिपुजन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी येथील विठ्ठल मंदीरातील सभामंडपात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

 पवार पुढे म्हणाले की, जनाई, शिरसाई आणि पुरंधर या उपसा योजनेमुळे तालुक्यातील बराचसा भाग ओलीताखाली आला आहे. मात्र राहिलेल्या मोरगाव, बाबुर्डी, शेरेचीवाडी, काऱ्हाटी, जळगाव क. प. आणि अंजनगाव या नदी काठचा भाग तसेच चौधरवाडी वाकी पासुन ढाकाळे, भिलारवाडी पर्यंतची गावे या नीरा - कऱ्हा नदी जोड प्रकल्पांतर्गत ओलीताखाली येणार आहे. यावर्षी वीर धरण दोनदा भरेल ऐवढे पाणी नदीद्वारे वाहुन गेले आहे. हेच वाहुन जाणारे पाणी तेलंगणाच्या धर्तीवर मोठे वीज पंप टाकुन सात फुटी पाईप लाईनद्वारे दोन टप्यात पाणी उचलणार आहे. त्यामुळे जिरायती भागाला पाणी मिळाल्यास शेती ओलीताखाली येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील जिरायती असणाऱ्या ३३ गावांच्या शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. या भागावर पुर्वीपासुन असलेला जिरायती शिक्का पुसण्यासही मदत होणार आहे. त्यामुळे या भागाची आर्थिक सुबत्ता वाढुन राहणीमानही उंचवण्यास मदत होईल. याबाबत मंत्रिमंडळात लवकर मंजुरी घेत असल्याचे पवार यांनी सांगितले.           जनाईच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची बंद पाईप लाईनद्वारे तलावात पाणी सोडण्याची मागणी होती. त्यानुसार बोरकरवाडी तलावापर्यंत बंद पाईप लाईन करण्यात येणार आहे. यासाठी सीएसआर फंडातुन सुमारे २ कोटी ८८ लाख खर्चाच्या कामाचे भुमिपुजन केले. ही पाईप लाईन ३ फुट व्यासाची असुन शेतकऱ्यांच्या शेतातुन जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अडथळा न आणता सहकार्य करावे. त्यामुळे टेलपर्यंत पाणी जाईल असे पवार यांनी सांगितले. तसेच दंडवाडी, खोपवाडी या गावांचा अपवाद वगळता बंद पाईप लाईनला कुणाचा विरोध नाही. या दुरुस्तीसाठी जनाईसाठी २५३ कोटी तर शिरसाईसाठी १७६ कोटी मिळुन सुमारे ४२९ कोटी आणि पुरंदरसाठी ५६ कोटीची तरतुद करण्यात आली आहे. तर कऱ्हा नदीवरील बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ११० कोटी निधीची तरतुद करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच शेतकऱ्यांना कांद्यातुन दोन पैसे मिळतात, त्यामुळे कांद्याची निर्यात बंदी करु नका असेही केंद्रस्तरावर बोलणे झाल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारBaramatiबारामतीSocialसामाजिकPurandarपुरंदरFarmerशेतकरी