शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
2
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
3
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
4
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
5
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
6
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
7
Latest Marathi News LIVE Updates: राज्यातील सर्व बस स्थानकांवरील शौचालय सुविधा १ जूनपासून मोफत; प्रताप सरनाईक यांची घोषणा
8
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
9
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
10
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
11
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
12
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
13
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
15
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
16
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
17
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
18
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
19
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
20
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

‘तिघाडी’मुळे एकहाती सत्तेसाठी चुरस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:11 IST

सत्तेच्या चाव्या कोणाकडे? : पुणेकरांचा कौल कोणाला? लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत, ...

सत्तेच्या चाव्या कोणाकडे? : पुणेकरांचा कौल कोणाला?

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : महापालिकेच्या फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या पंचवार्षिक निवडणुकीत, तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे सर्वच राजकीय पक्षांची समीकरणे बदलली गेली आहेत. नवीन रचनेमुळे कोणत्याची एका पक्षाची महापालिकेत एकहाती सत्ता (स्पष्ट बहुमत) येईल, अशी शक्यता आता कमी झाली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

चार सदस्यीय प्रभाग रचना व ‘मोदी फॅक्टर’ यामुळे सन २०१७ मध्ये भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच महापालिकेत स्पष्ट बहुमत मिळवले. मात्र, सन २००२ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचना असताना, सन २००७ मध्ये एक सदस्यीय आणि सन २०१२ मध्ये दोन सदस्यीय प्रभाग रचना असताना भाजप सत्तेपासून दूरच राहिली होती. या तिन्ही निवडणुकांमध्ये कॉंग्रेस व नंतर राष्ट्रवादी काँग्रेसने पालिकेत आपले वर्चस्व राखले. ‘पुणे पॅॅटर्न’च्या निमित्ताने भाजपा आणि राष्ट्रवादीची आघाडीही अजित पवारांनी पुणे महापालिकेत अल्पकाळासाठी घडवून आणली.

या पार्श्वभूमीवर यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस दोन सदस्यीय प्रभागासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात होते. या पक्षाचे कार्यकर्ते दोन सदस्यीय प्रभाग होणारच असे छातीठोकपणे सांगत होते. दुसरीकडे एक सदस्य प्रभाग पद्धत आल्यास काँग्रेसनेही स्वबळावर लढण्याची तयारी चालू केली होती. पाच वर्षांत भरपूर विकासकामे केली असल्याचे सांगत भाजपा प्रभाग कितीचाही होवो पुणेकर आमच्याच पाठीशी राहील, असे सांगत होती. मात्र, तीन सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे सर्वच पक्षांमध्ये चलबिचल आहे. प्रभाग कसे तयार होणार? यावर अनेकांची गणिते अवलंबून आहेत.

भाजपा आणि आरपीआय (आठवले गट) यांच्यात तुलनेने जागावाटपाची अडचण फार येणार नाही, असे चित्र आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी राज्याच्या सत्तेतले वाटेकरी शिवसेना आणि कॉंग्रेस हे दोन पक्ष अडचण निर्माण करणारे आहेत. तिन्ही पक्षांची ताकद तर एकत्रित हवी पण जागावाटप कसे आणि त्याचा फायदा किती व तोटा किती? याबद्दल राष्ट्रवादी साशंक आहे. सन २०१४ च्या लोकसभा निवडणुकीपासून कॉंग्रेसची शहरातली ताकद सातत्याने घसरत आली आहे. शिवसेनेचे अस्तित्व ठरावीक प्रभागापुरतेच आहे. त्यामुळे एकहाती सत्ता घेण्याचे आव्हान भाजपा आणि राष्ट्रवादी या शहरातल्या प्रमुख दोन पक्षांपुढे आहे. तीन सदस्यीय प्रभाग रचनेमुळे भाजपमधील संभाव्य बंडखोरीला आळा बसण्याची शक्यता आहे.