शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

चाकण एमआयडीसीत चोरट्यांचा सुळसुळाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:11 IST

चाकण : एमआयडीसीमधील छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील लाखो रुपयांचा माल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील बहुतांश चोरट्यांना मुद्देमालासह पकडले ...

चाकण : एमआयडीसीमधील छोट्या-मोठ्या कंपन्यांमधील लाखो रुपयांचा माल चोरी होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यातील बहुतांश चोरट्यांना मुद्देमालासह पकडले जात असूनही चोरीच्या घटनांमध्ये घट होण्याचे प्रमाण कमी होत नाही. यामुळे पोलिसांनी रात्रगस्त वाढवावी, अशी मागणी उद्योजकांनी केली आहे.

चाकण औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांत घडणाऱ्या चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाच्या अंतर्गत महाळुंगे पोलीस चौकीची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये एमआयडीसीमधील जवळपास दोन ते तीन हजार लहान-मोठ्या कंपन्यांसह परिसरातील गावे महाळुंगे पोलीस चौकीत येतात. पोलिसांचे रात्रीचे पेट्रोलिंग सुरू असूनही मागील काही दिवसांपासून औद्योगिक वसाहतीच्या कंपन्यांमधील स्पेअर पार्टच्या लहान मोठ्या चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामुळे कंपनी मालकांमध्ये असुरक्षेची भावना निर्माण झाली आहे.

मागील दोन महिन्यांच्या कालावधीत चोरट्यांनी चाकण एमआयडीसीमधील अनेक कंपन्यांमधून लोखंडी, ॲल्युमिनिअम, पितळ, तांब्याच्या पट्ट्या, प्लेट आदी लाखो रुपयांचा कच्चा माल चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत. यामध्ये कुरुळी येथील एका कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला धमकावून धाडसी दरोडा टाकण्यात आला होता. भांबोली येथील एटीएम केंद्राला बॉम्बसदृश वस्तूने उडवून मोठी रक्कम घेऊन चोरट्यांनी पोबारा केला आहे. रोजच घडणाऱ्या लहान मोठ्या चोरीच्या घटनांमुळे कंपनी मालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही चोरीच्या बहुतांश घटनांमधील चोरट्यांना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. परंतु रोजच घडणाऱ्या चोरीच्या घटना कमी झालेल्या दिसून येत नाही.

चोरी करणाऱ्यांमध्ये काम करणारे कामगारच जास्त संख्येने सहभागी असल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रत्येक सुरक्षारक्षक आणि कामगाराचे रेकॉर्ड ठेवणे, कंपनी आवारात सीसीटीव्ही कॅमेरे लावणे. पोलीस आणि कंपन्यांच्या सहकार्याने गस्ती पथके तयार करून रात्रीचे पेट्रोलिंग वाढवण्यात आले आहे.

-अरविंद पवार, पोलीस निरीक्षक महाळुंगे पोलीस चौकी

सततच्या लॉकडॉउनने अनेक लहान-मोठे उद्योजक मेटाकुटीला आले आहे. त्यात दररोजच्या घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे कंपनी मालकांमध्ये असुरक्षितेच वातावरण तयार झाले आहे. पोलिसांचे नाईट राउंड होऊनही चोऱ्या थांबत नाही. यासाठी पोलिसांनी आपले गोपनीय विभाग जास्त अलर्ट करणे गरजेचे आहे.

-दिलीप बटवाल, सचिव, इंडस्ट्रीयल फेडरेशन, चाकण