शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

काश्मीर मध्ये भीती नाही.. पण आजबाजूचीच माणसं मनात भय पेरतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 06:00 IST

‘श्रीनगरला जाते,’ असे घरी जेव्हा सांगितले, तेव्हा ते खूप चिंतेत पडले होते.

ठळक मुद्देडॉक्टरांशी बोलून फिजिओथेरपीतून स्थानिक रुग्णांवर उपाय करण्याचा निर्णय

- दीपक कुलकर्णी-  लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या अवतीभवतीचे लोकच काश्मीरबाबत खूप नकारात्मक आहेत. खरंतर काश्मीर मध्ये काम करण्यासारखा दुसरा आनंद नाही. त्या प्रांतातली संस्कृती ,निसर्ग सौंदर्य, माणसे, वातावरण असे सगळे काही तुम्हाला आपलेसे करतात. तिथल्या माणसांना सुध्दा आपण हवे आहोत. परंतु, काश्मीरमधल्या दुर्गम भागातील वैद्यकीय सुविधांची कमतरता, दुरवस्था चिंताजनक आहे...हे निरीक्षणे आहेत पुण्यातील तरुणीची....‘तिने’ स्वत:च्या वैद्यकीय शिक्षणाला व्यवसायाच्या कक्षेत उभे न करता माणुसकीचा सेतू भरभक्कम करण्याकरिता हे शिक्षण उपयोगात आणण्याचा निश्चय केला आहे. डॉ.मानसी पवार हे तिचे नाव.  

औंध येथील रुग्णालयात मानसी फिजिओथेरपिस्ट म्हणून काम करते. आपल्या वैद्यकीय ज्ञानाचा उपयोग काश्मीरी नागरिकांना व्हावा, या हेतूने ती महिन्यातून एकदा श्रीनगरमधला बाह्य रुग्ण विभाग चालवते.मानसी म्हणाली, ‘‘माझ्या मनात काश्मीरविषयी प्रचंड कुतुहल होते. त्यातूनच काश्मीरमध्ये काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांशी माझा जवळून संबंध आला. प्रत्यक्ष तिथे जाऊन काम करण्याची इच्छा निर्माण झाली. ‘श्रीनगरला जाते,’ असे घरी जेव्हा सांगितले, तेव्हा ते खूप चिंतेत पडले होते. माझ्याही मनात थोडी धाकधूक होतीच. पण तिथे गेल्यावर स्थानिक व्यक्तींशी झालेल्या संवादातून काश्मिरी लोकांच्या मनात देखील परप्रांतीयांबद्दल आत्मीयता असल्याचे जाणवले. आपल्या मनात काश्मीरींविषयी जी भीती निर्माण केली गेली ती निरर्थक असल्याचेही समजले. माझा तिथे काम करण्याचा अनुभव खूपच समाधानकारक, आनंददायी आहे. तसेच तेथील स्थानिक आणि इतर राज्यांमधील नागरिकांमध्ये परकेपणा, विसंवाद आणि गैरसमजांची दरी असल्याचं वास्तव नाकारता येत नाही.’’ आजूबाजूचे लोक जेव्हा म्हणतात, तू जे काम करते आहे ते अगदी छान आहे. पण तो भाग सुरक्षित नाही. तिथे मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात आहे. तेथील परिस्थिती केव्हाही चिघळू  शकते. जीवाला कधीही धोका निर्माण होऊ शकतो. या सगळ््या शंका अगदी कालपर्यंतच्या. यामुळे कुठेतरी मनात नकारात्मकता डोकावते. पण तेथील दुरवस्था, वैद्यकीय सेवांबद्दलचे अज्ञान माझ्या समोर उभे ठाकते आणि मनातील भीती दूर होते. तिथे पायाभूत वैद्यकीय सुविधा आहेत, पण पुण्या-मुंबई सारख्या आधुनिक सुविधांची उणीव आहे. त्या आधुनिक उपचारांसाठी त़्यांना श्रीनगरमध्ये यावे लागते. म्हणून विनामोबदला सेवा करून तेथील रुग्णांना बरे करण्याचा माझा मानस आहे.  चौकट ‘‘फिजिओथेरपिस्ट म्हणजे काय हे देखील तेथील लोकांना माहिती नाही. यातच माझ्या तिथे जाण्यासंबंधीच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. तेथील डॉक्टरांशी बोलून मी फिजिओथेरपीतून स्थानिक रुग्णांवर उपाय करण्याचा निर्णय घेतला. श्रीनगर येथील एका क्लिनिकमध्ये मी महिन्यातले काही दिवस फिजिओथेरपी विभाग चालवणार आहे. दुर्गम भागातील रुग्णांना पायाभूत व आधुनिक वैद्यकीय सेवा पुरविण्याचा माझा माझा मानस आहे. प्राथमिक स्तरावर हे काम विनाशुल्क आहे.’’ - डॉ. मानसी पवार, फिजिओथेरपिस्ट...................

टॅग्स :PuneपुणेJammu Kashmirजम्मू-काश्मीरdoctorडॉक्टरHealthआरोग्य