शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
‘राहुल गांधी ग्रेट पॉलिटिकल सायंटिस्ट’! हिमंता बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल, पण असं का म्हणाले?
3
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
4
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
5
झटणाऱ्या हातांना मदतीचा 'हात'! लहानग्याचा VIDEO पाहून आनंद महिंद्रांची मोठी घोषणा
6
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
7
मुंबई इंडियन्सच्या संघात अंशुल कंबोजची एन्ट्री! टॉस जिंकून २३ वर्षीय ऑल राऊंडरला दिली संधी, जाणून घ्या कोण आहे तो
8
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
9
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
10
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
11
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
12
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
13
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
14
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
15
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
16
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
17
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
18
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
19
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
20
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  

...तर पुणे कॅँटोन्मेंट बोर्ड बंद करावे लागेल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 4:07 AM

राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट

- श्रीकिशन काळे पुणे : राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून निधी मिळत नसल्याने पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाची आर्थिक स्थिती बिकट बनली असून, येत्या वर्षभरात ही स्थिती सावरली नाही, तर बोर्डाचे कार्यालयाच बंद करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे येत्या वर्षासाठी आर्थिक उत्पन्नासाठी आणि बोर्ड चालविण्यासाठी ठोस पावले उचलण्याची गरज आहे. बोर्डाचे सीईओ डी. एन. यादव यांनी ही स्थिती सांगितली असून, बोर्डाचे अध्यक्ष नवनीत कुमार यांनी मात्र बोर्डानेच ही स्थिती ओढावली असून, त्यासाठी त्यांनीच ठोस उपाययोजना करणे आवश्यक असल्याची सूचना संबंधितांना केली.पुणे कॅँटोन्मेंट बोर्डाच्या सर्वसाधारण सभेत या प्रश्नावर जोरदार चर्चा झाली. बोर्डाचा निधी मिळविण्यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयात खेटे मारावे लागत असल्याने बोर्ड प्रशासन आणि सदस्य परेशान झाले आहेत. सरकारने जीएसटी लागू केल्यानंतर, बोर्डाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर कमी झाले; तसेच संरक्षण मंत्रालयाकडून येणारा निधीदेखील अद्याप देण्यात आलेला नाही. त्यामुळे थकबाकी कोट्यवधी रुपयांवर गेली आहे. परिणामी, बोर्ड डबघाईला आले असून, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यासाठीही कसरत करावी लागत आहे. बोर्डाच्या या सर्व स्थितीवर सीईओ यादव आता देशभरातील सर्व कॅँटोन्मेंट बोर्डांना एकत्र करून न्यायालयाचा दरवाजा ठोठावणार आहेत. सुमारे २५ कॅँटोन्मेंट बोर्ड सोबत येतील, अशी आशा यादव यांना आहे.बोर्डाचे अध्यक्ष नवनीत कुमार यांनी मात्र बोर्डावर ठपका ठेवून तुम्ही कोणाकडून निधीची अपेक्षा न ठेवता उत्पन्न कसे वाढवता येईल, यावर भर द्यावा आणि इतर खर्च कमी करावा, अशी सूचना केली. जर खिशात पैैसे नसतील, तर खर्च करायचा विचारही करू नये, असा टोलाही लगावला.३६ कोटी रुपयांची तूट कशी भरून काढणार?येत्या वर्षात बोर्डाचा खर्च ९४. ३८ कोटी रुपये प्रस्तावित आहे. परंतु, येणारे उत्पन्न हे केवळ ५८.३५ कोटी रुपये आहे. त्यामुळे ३६ कोटी रुपयांची तूट कोठून भरायची, असा प्रश्न बोर्डासमोर उभा ठाकला आहे.सध्या बोर्डाकडे कॅशबुकमध्ये ४.३६ कोटी रुपये असून, फिक्स डिपॉझिटमध्ये २८ कोटी रुपये आहेत. जर केंद्र, राज्याकडून निधी आला नाही, तर बोर्डाला फिक्स डिपॉझिट तोडावे लागण्याची शक्यता आहे....तर बोर्ड श्रीमंत होईलकेंद्राला आणि राज्याच्या प्रतिनिधींना बोर्डाच्या सदस्यांनी वेळोवेळी भेटून निधी देण्याची मागणी केली आहे; परंतु त्यावर केवळ आश्वासनेच मिळत आहेत. यावर बोर्डाच्या सदस्यांनी रस्त्यावर येऊन आंदोलनच करावे लागेल, असा इशारा या वेळी दिला आहे. जर थकीत ७५० कोटींचा निधी बोर्डाला मिळाला, तर बोर्ड श्रीमंत होईल; परंतु केंद्र, राज्याकडून निधीच मिळेत नसल्याची खंत उपाध्यक्ष प्रियांका श्रीगिरी यांनी व्यक्त केली.संरक्षण विभागाच्या सर्वांना पत्रबोर्डाचे सीईओ डी. एन. यादव म्हणाले, ‘‘बोर्डाकडे पैसेच नाहीत. त्यामुळे हे कार्यालयच बंद करायची परवानगी दिली पाहिजे. कारण, ते चालविण्यासाठी सरकार आणि संरक्षण मंत्रालय उपाययोजना करीत नाही. सध्याची स्थिती अशीच राहिली तर येत्या वर्षात बोर्ड बंद करावे लागेल. बोर्डाला निधी मिळावा, यासाठी संरक्षण विभागाच्या सर्व अधिकाºयांना मी पत्र पाठवून बोर्डाची स्थिती सांगितली आहे. परंतु, त्याला काहीही उत्तर मिळालेले नाही.’’ 

टॅग्स :pune cantonment boardपुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड