शहरं
Join us  
Trending Stories
1
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
2
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
3
रक्षाविसर्जनावेळी मयताचा सावत्र मुलगा आल्याने वाद; दोन गटांत हाणामारी 
4
सौदी बस अग्निकांडाला जबाबदार कोण? एकाच कुटुंबातील १८ जणांचा जळून मृत्यू, क्षणात ३ पिढ्यांतील लोकांचा अंत!
5
कसली महायुती अन् कोणती आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार...
6
ईव्हीएममध्ये २५,००० मते आधीच होती, तरीही आमच्या पक्षाचे २५ उमेदवार जिंकले; 'RJD'च्या जगदानंद यांचा मोठा दावा
7
लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान!
8
थंडी सुरु झाली...! रात्री झोपण्यापूर्वी बेंबीमध्ये या तेलाचे दोन थेंब टाका, मिळतील ७ आरोग्यदायी फायदे...
9
'फिदायीन' उमरनं घातला होता 'बूट बॉम्ब'; यात असं काय होतं? ज्याला म्हटलं जातं 'शैतान की मां'!
10
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षणाच्या ५० टक्के मर्यादेचे उल्लंघन, सुप्रीम कोर्टात १९ नोव्हेंबरला सुनावणी
11
कागलमध्ये हसन मुश्रीफ-समरजित घाटगेंची युती, मुश्रीफांनी संजयबाबांची मागितली माफी; म्हणाले...
12
'या' बँकेच्या शेअरनं लोकांना केलं मालामाल, १५ वर्षांच्या उच्चांकावर पोहोचला भाव; किंमतही खिशाला परवडणारी! झुनझुनवालांचा मोठा डाव
13
IND vs SA : "सगळे घाबरुन खेळत आहेत..." डावललेल्या खेळाडूचं नाव घेत कैफ थेट 'गंभीर' मुद्यावर बोलला
14
शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा
15
दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणात आणखी एक अटक; हमास स्टाईल हल्ला करण्याची होती योजना
16
भाजपने पहिला गुलाल उधळला! अख्खे पॅनल बिनविरोध विजयी; नगराध्यक्ष निवडणुकीकडे लक्ष
17
तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले
18
Travel : परिकथेत रमणाऱ्यांनी आयुष्यात एकदा तरी 'या' ठिकाणांना भेट द्यायलाच हवी! आताच करून ठेवा यादी
19
ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले...
20
शेख हसीना यांना तात्काळ परत पाठवा; 'या' कराराचा हवाला बांगलादेशची भारताला विनंती
Daily Top 2Weekly Top 5

किस्सा निवडणुकीचा! वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी नवी ओळख कशी मिळाली?

By राजू इनामदार | Updated: November 7, 2024 15:37 IST

राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं तेव्हा नाईक यांनी 'महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल' असं वक्तव्य जाहीर सभेत केलं होत

पुणे: महाराष्ट्राचे सलगपणे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले म्हणून वसंतराव नाईक यांना ओळखतात. पाईप ओढणारे ( धुम्रपानातील पाईप) त्यांचे छायाचित्र अजूनही प्रसिद्ध होत असते. ते पट्टीचे शिकारी. सावज टप्प्यात आल्याशिवाय मी निशाणा साधत नाही असे ते नेहमी सांगत. असे वसंतराव नाईक पुण्यात कायम येत असत. काँग्रेसशिवाय त्यांचा बराच मोठा निकटचा मित्र परिवार पुण्यात होता.

राज्यातील हरित क्रांतीचे जनक म्हणून नंतर त्यांची ओळख प्रस्थापित झाली. त्याची सुरूवात पुण्यातील एका प्रचारसभेतून झाली असे माजी आमदार उल्हास पवार यांनी सांगितले. पवार त्यावेळी युवक काँग्रेसचे काम करत. त्यानिमित्ताने त्यांचे सतत मुंबईत जाणेयेणे होत असे. त्यातूनच त्यांची वसंतराव नाईक यांच्याबरोबर चांगली ओळख झाली. पवार यांनी सांगितले की नाईक यांना शेतीबद्दल प्रचंड प्रेम होते. मंत्रालयात असताना मुंबईत पहिला पाऊस झाला की लगेच खिशातून १०० रूपये काढत व शिपायाला देत, पेढे आणा व वाटा असे सांगत. मुख्यमंत्री झाल्यानंतरही त्यांनी ही पद्धत कायम ठेवली.

एका विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला ते आले होते. त्यावेळी मोठ्या नेत्यांच्या प्रचारसभांसाठी शनिवारवाड्याचे पटांगण हेच एकमेव ठिकाण होते. सगळ्याच नेत्यांच्या सभा तिथे होत. वसंतराव नाईकांचीही सभा तिथे झाली. त्यावेळी राज्यातील अन्नधान्याचं उत्पादन घटलं होतं. दुसऱ्या राज्यावर अवलंबून रहावं लागत होतं. वसंतराव नाईकांना याची खंत होती. त्या सभेत बोलताना अचानक त्यांनी सांगितले की महाराष्ट्र अन्न धान्यात स्वयंपूर्ण झाला नाही तर मी याच शनिवारवाड्यावर जाहीर फाशी घेईल.

प्रचारात बोललेले वाक्य म्हणून काही दिवसांनी सगळे ते विसरूनही गेले. नाईक मात्र ते विसरले नव्हते. त्यानंतर शेतीशी संबधित सर्वच विषयांवर त्यांनी अतिशय बारकाईने लक्ष दिले. शेतकऱ्यांसाठी अनेक योजना सुरू केल्या. सिंचनाची जास्तीतजास्त व्यवस्था कशी होईल याकडे लक्ष दिले. शेतीतज्ञांचा सल्ला थेट शेतकऱ्यापर्यंत पोहचेल अशा सुचना शेतीखात्याला दिल्या. त्यासाठी तज्ञ उपलब्ध करून दिले. आधुनिक शेतीची माहिती थेट शेतकऱ्यांना मिळेल याची काळजी घेतली.

या सगळ्या मोहिमेचा परिणाम म्हणून पुढच्या काही वर्षातच राज्याचे शेतीचे उत्पादन वाढले. सिंचनाखालील शेतीक्षेत्र वाढले. आधुनिक शेतीचा वापर ग्रामीण भागातील शेतकऱ्यांकडून होऊ लागला व महाराष्ट्र खरोखरच अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालाच, शिवाय इतर राज्यांना मदतही करू लागला. त्यातूनच वसंतराव नाईक यांना हरित क्रांतीचे जनक अशी नवी ओळख मिळाली.

टॅग्स :Puneपुणेmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chief Ministerमुख्यमंत्रीPoliticsराजकारणcongressकाँग्रेसFarmerशेतकरी