शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
3
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
4
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
5
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
6
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
7
हा सदोष मनुष्यवधच!
8
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
9
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
11
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
12
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
13
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
14
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
15
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
16
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
17
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
18
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
19
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर

पुणे महापालिकाच दररोज नदीत सोडते साडेचारशे एमएलडी सांडपाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2022 12:28 IST

प्रक्रिया करणाऱ्या प्लांटची कमतरता : जायका प्रकल्पातील केंद्रांसाठी वाट पाहावी लागणार

श्रीकिशन काळे

पुणे : शहरात दररोज ८८९ एमएलडी सांडपाणी तयार होत आहे. यामधील केवळ ४५० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया केली जाते, इतर ४३९ एमएलडी सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. त्यामुळेच नदीची गटारगंगा झाली आहे. हेच पाणी पुढे उजनीकडे जाते आणि तेथील शेतीवर, जनावरांवर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. लवकरात लवकर सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया केली, तरच नदी स्वच्छ पाण्याला घेऊन प्रवाही राहणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून पुणे शहरात नदीचे प्रदूषण ही मोठी गंभीर समस्या बनली आहे. मुठा नदीत दररोज कित्येक एमएलडी सांडपाणी आणि कचरा टाकला जात आहे. अनेक ठिकाणी रसायनमिश्रित पाणी नदीत जात असून, ते पुढे भीमा नदीत मिसळत आहे. ज्याचे परिणाम उजनी धरणात बघायला मिळत आहेत. हे रोखण्यासाठी पुणे शहरात निर्माण होणाऱ्या सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करूनच ते नदीत सोडले जाणे आवश्यक आहे; परंतु त्याकडे महापालिका दुर्लक्ष करत आहे.

पुणे शहर खूप वेगाने विस्तारत असून, त्याप्रमाणात पाण्याची मागणी वाढत आहे. आता मुबलक पाणी मिळत असले, तरी भविष्यात टंचाई निर्माण होऊ शकते. येत्या काही वर्षांत पुण्याची लोकसंख्या प्रचंड वाढेल आणि त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे.

आणखी २३ गावांचे सांडपाणी वाढणार

शहरात दररोज ७५० एमएलडी व अकरा गावांतील १३९ एमएलडी सांडपाणी तयार होते. त्यात आता २३ गावांचा समावेश पुण्यात झाला आहे. त्यामुळे त्यांचे सांडपाणी अद्याप किती निर्माण होते, त्याची आकडेवारी आलेली नाही. एकूणच पुण्याचा वाढता विस्तार पाहता सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे केंद्र वाढविणे हेच आवश्यक आहे.

मार्च २०२५ मध्ये हे प्लांट सुरू होतील

जायका प्रकल्पांतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी ११ एसटीपी प्लांट तयार करण्यात येत आहे. हे काम तीन वर्षे चालणार असून, मार्च २०२५ मध्ये हे प्लांट सुरू होतील. त्यातून ३९६ एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करता येणार आहे. - जगदीश खानोरे, जायका प्रकल्प, महापालिका

दररोज ७५० एमएलडी पुणे शहरात सांडपाणी निर्माण होते

दररोज ७५० एमएलडी पुणे शहरात सांडपाणी निर्माण होते. त्यापैकी ४५० वर प्रक्रिया केली जाते. सध्या १० प्लांटमध्ये हे काम सुरू आहे. त्यातील नायडू रुग्णालयातील जुना प्लांट पाडण्यात येत आहे. त्यामुळे तेथील पाणी नव्या नायडूच्या प्लांटमध्ये वळविण्यात आले आहे. - प्रमोद उंडे, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग, महापालिका

नदीत सांडपाण्यातून पेस्टीसाइड्स, हेवी मेटल्स

दररोज ४३९ एमएलडी सांडपाणी थेट नदीत जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषित बनली असून, त्याचा परिणाम पुढील गावांवर व उजनी धरणावर होत आहे. नदीत पेस्टीसाइड्स व हेवी मेटल्स जात आहेत. त्याचा भयंकर परिणाम होतो. जनावरे पाणी पीत असतील, तर ती घातक रसायने त्यांच्या दुधाद्वारे आपल्या पोटात जातात. त्यामुळे आपल्याला अनेक आजार होऊ शकतात. त्वचारोग, केस गळणे, गर्भावर परिणाम होणे आदी आजारांचे प्रमाण वाढते. - डाॅ. प्रमोद मोघे, माजी शास्त्रज्ञ, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा

उपाय काय ?

- दररोज सर्व सांडपाण्यावर प्रक्रिया करून नदीत सोडणे.- नागरिकांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारणे.- नदीत कचरा टाकणे बंद करणे.

टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाWaterपाणीriverनदीSocialसामाजिकbusinessव्यवसाय