शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

खेडमधील शेतकऱ्यांची व्यथा; तालुक्यात तीन धरणे असूनही पाण्यासाठी कायमच संघर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 09:37 IST

शासनाने आमच्या जमिनींवर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के लवकरात लवकर कमी करून सदरचे क्षेत्र मुळ शेतकऱ्यांचे नावे करावे

भानुदास पऱ्हाड

शेलपिंपळगाव : खेड तालुक्यातील भामा आसखेड, चासकमान व कळमोडी धरणासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःच्या मालकीच्या जमिनी दिल्या आहेत. मात्र पाण्याचे वितरण करताना तालुक्यातील लाभार्थी शेतकऱ्यांच्या पदरी कायमच निराशा येत असल्याचे चित्र आहे. भामा - आसखेड हे धरण खेड तालुक्यात आहे. मात्र त्यातील पाणीसाठा पुणे व पिंपरी चिंचवड शहरात पिण्याच्या पाण्यासाठी वापरला जात आहे. तर चासकमानचे पाणी शिरूरला पाठवले जाते. त्यामुळे 'धरण उशाला अन कोरड घशाला' अशीच परिस्थिती तालुक्यात अनुभवायला मिळत आहे. 

एकीकडे प्रकल्प उभारणीसाठी तालुक्यातील जमिनी संपादित केल्या असताना स्थानिक शेतकऱ्यांना हक्काच्या पाण्यासाठी कायमच संघर्ष करावा लागत आहे. यापार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशनात खेडचे आमदार दिलीप मोहिते - पाटील यांनी तालुक्यातील धरणांमधील 'पाणी पळवा पळवी' संदर्भात आवाज उठवला. विशेषतः भामा - आसखेड धरण प्रकल्पातील पुनर्वसनासाठी संपादित केलेल्या क्षेत्रातील तसेच इतर अधिकारातील सातबारा वरील पुनर्वसन शिक्के / शेरे उठविण्याबाबत उपस्थित केलेल्या तारांकित प्रश्नाप्रसंगी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

 भामा आसखेड धरण प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी तालुक्यातील नाणेकरवाडी, गोणवडी, रासे, कडाचीवाडी, खराबवाडी, चाकण, काळुस, मेदनकरवाडी आदि १८ गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी शासनाने संपादित केलेल्या केल्या आहेत. संपादित केलेल्या जमिनींच्या सातबारा उताऱ्यावर शासनाने पुनर्वसनचे शिक्के टाकले आहेत. मात्र  भामा आसखेड व चासकमान धरणातील पाण्याचा काही गावांना फायदा होत नसल्याचे चित्र आहे. भु - संपादन कार्यवाही करताना मौजे काळुस येथील उपरोक्त क्षेत्र हे चासकमान प्रकल्पाच्या लाभ क्षेत्राबाहेर येत आहे. चासकमान प्रकल्पातंर्गत उजवा कालवा सुरू होऊन सुमारे ३० वर्षे झाली आहेत. तर भामा आसखेड प्रकल्प सुरू होऊन वीस वर्षे झाली आहेत. मात्र काळुस गावच्या शेतजमीनींला या दोन्हीही सिंचनाचा लाभ मिळत नसून गावातील क्षेत्र लाभक्षेत्राबाहेर आहे. काळूस गावाप्रमाणेच भामा आसखेड लाभक्षेत्रातील इतर गावांची हीच गत आहे. त्यामुळे ''धरणाला जमीन दिली आम्ही अन्‌ आम्हीच उपाशी; मात्र भलतेच तुपाशी'' अशी बिकट अवस्था तालुक्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.

सदरचे क्षेत्र मुळ शेतकऱ्यांचे नावे करण्याची मागणी

मुंबईत शेतकऱ्यांनी केले उपोषण... भुमाफीया दलाल, महसुल अधिकारी हे प्रकल्पग्रस्त शेतकरी व लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची पिळवणुक करून लुटमार करत आहेत. याविरोधात काळूस गावातील शेतकऱ्यांनी दीड महिन्यांपूर्वी मुंबईत उपोषण केले आहे. शासनाने आमच्या जमिनींवर टाकलेले पुनर्वसनाचे शिक्के लवकरात लवकर कमी करून सदरचे क्षेत्र मुळ शेतकऱ्यांचे नावे करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे. 

शासन स्तरावर कार्यवाही 

खेड तालुक्यातील भामा - आसखेड  प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडून कार्यवाही सुरू असल्याची माहिती, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी पावसाळी अधिवेशनात दिली आहे. 

पाणी मिळवून देण्यासाठी राजकारणाचा त्याग करू          खेड तालुक्यातील कळमोडी धरणाचे पाणी आंबेगाव तालुक्याच्या पठार भागात देण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र कळमोडी धरणाच्या पुनर्वसनात आंबेगावची किंचितही जमीन नाही. योगदान नाही मग लाभ कसा ? खेडच्या कळमोडी किंवा चासकमान धरणग्रस्तांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळवून देण्यासाठी राजकारणाचा त्याग करू. मात्र मागे हटणार नाही.- दिलीप मोहिते - पाटील, आमदार खेड तालुका.

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीKhedखेडRainपाऊसAlandiआळंदीDamधरण