शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Maharashtra Rain Update: आता विश्रांती संपली...! महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार, पुण्यात मात्र हलक्या सारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2024 13:39 IST

रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज

पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती; पण आता शुक्रवारपासून (दि.१२) पुन्हा पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने दिला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

हवामान विभागाच्या माहितीनुसार शुक्रवारपासून (दि.१२) रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रातील सातारा, पुणे जिल्ह्यातील काही भागांत जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, नाशिक आणि विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतदेखील बहुतांश भागात जोरदार पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. शनिवारी (दि.१३) कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल. तसेच रविवारी आणि सोमवारी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट दिला आहे.

मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये १३ ते १५ जुलैदरम्यान काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने दिला. विदर्भामध्ये १३ जुलै रोजी सर्व जिल्ह्यांमध्ये काही भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे.

पुण्यात हलक्या सरी

पुणे शहरात दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली. त्यानंतर गुरुवारी दुपारी मात्र हलक्या सरी कोसळल्या. सकाळपासून उन्हाचा चटका जाणवत होता. त्यानंतर सायंकाळी ढगाळ वातावरण निर्माण झाले. पुढील दाेन दिवस पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

राज्यातील पाऊस

पुणे : ०.७ मिमी

कोल्हापूर : २ मिमीमहाबळेश्वर : ४ मिमी

सातारा : ०.५ मिमीमुंबई : २९ मिमी

अलिबाग : ७ मिमीचंद्रपूर : ३७ मिमी

गोंदिया : १४ मिमी

टॅग्स :PuneपुणेVidarbhaविदर्भMarathwadaमराठवाडाkonkanकोकणRainपाऊसWaterपाणी