शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात हल्ल्याची तयारी, पाकिस्तानी कनेक्शन उघड; दहशतवादी बिलालच्या चौकशीतून धक्कादायक खुलासे
2
Operation Pimple : सैन्याला मोठं यश! कुपवाडामध्ये घुसखोरी करणाऱ्या २ दहशतवाद्यांचा खात्मा
3
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
4
अजबच...! नकळत लग्न झालं...! अमेरिकन पॉप स्टारचा मलेशियन सुलतानशी 'निकाह', आता 'तलाक'ची मागणी; नेमकं प्रकरण काय?
5
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
6
७ वर्षांनंतर अनुष्का शर्मा करणार कमबॅक! 'चकदा एक्सप्रेस' OTTवर होणार रिलीज?
7
एका चपातीमध्ये किती कॅलरीज असतात, वजन कमी करण्यासाठी रात्री किती खाव्यात?
8
Crime:  "काका वारले, मुलंही सारखी आजारी पडतात", जादूटोण्याचा संशयातून जन्मदात्या आईची हत्या!
9
IND vs AUS:"कभी शेर को घास खाते हुए देखा है क्या?" सूर्या भाऊनं केली अभिषेकची थट्टा; व्हिडिओ व्हायरल
10
कतरिना कैफने ४२ व्या वर्षी दिला मुलाला जन्म, कशी आहे तब्येत? रुग्णालयाने शेअर केलं अपडेट
11
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
12
Video: मराठी अभिनेत्रींनी केलं सोहम बांदेकरचं केळवण; आदेश-सुचित्रा बांदेकरांची होणारी सून कोण?
13
Gardening Tips: बटाट्याची सालं फेकू नका, रोपांसाठी ठरते सुपरफूड; वापर कसा करायचा ते पाहा 
14
'ती' फाइल आधी ३ वेळा माझ्याकडे आली होती; मी ती नाकारली- माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात
15
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
16
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
17
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
18
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
19
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
20
अजितदादांना शह देण्यासाठी पार्थ पवार प्रकरण काढलं गेलं का?; चंद्रकांत पाटील म्हणाले...

देशाच्या नेतृत्वाने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवले नाहीत; शरद पवारांची सरकारवर टीका

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 19:12 IST

पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत, चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे

पुणे: पंडित नेहरू यांच्या काळात आपले शेजारी देशांबरोबर अतिशय चांगले संबध होते. तसे ते आता राहिलेले नाहीत, सुसंवाद आहे असे म्हणण्याची स्थिती नाही. देशाच्या नेतृत्वाने ते ठेवले नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्र सरकारवर केली.

पवार म्हणाले, “पहेलगाम हल्ला झाला त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. देशाच्या नागरिकांवर हल्ला केला जातो, त्याला उत्तर देण्यासाठी सरकारने कोणताही कृती केली तरी आम्ही बरोबर राहिलो. पण तुम्ही देशाचा नकाशा समोर ठेवा. काश्मिर अशांत आहे. त्याशिवाय ज्या बांगलादेशाची निर्मिती आपण केली तो बांगलादेशही आपल्याबरोबर चांगला राहिलेला नाही. तसेच पाकिस्तान, श्रीलंका यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत. चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे.”

देशाच्या भल्यासाठी काही स्पष्ट भूमिका घ्यावी लागते असे मत व्यक्त करून पवार म्हणाले, “समाजाच्या सर्व थरामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. हातात हात घालुन काम करण्याचा हा काळ आहे. सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेत व्हायला हवेत.”

पुन्हा सत्ता मिळेल

पक्षात फुट पडली मात्र मी चिंता करत नाही, आपण एकसंध राहिलो, जनतेच्या कामाशी बांधिलकी ठेवली तर सत्ता आपोआप येईल. राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देऊ. यातून नव्या नेतृत्वाची फळी उभी राहील आणि राज्यात पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपा