शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

देशाच्या नेतृत्वाने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवले नाहीत; शरद पवारांची सरकारवर टीका

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 19:12 IST

पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत, चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे

पुणे: पंडित नेहरू यांच्या काळात आपले शेजारी देशांबरोबर अतिशय चांगले संबध होते. तसे ते आता राहिलेले नाहीत, सुसंवाद आहे असे म्हणण्याची स्थिती नाही. देशाच्या नेतृत्वाने ते ठेवले नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्र सरकारवर केली.

पवार म्हणाले, “पहेलगाम हल्ला झाला त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. देशाच्या नागरिकांवर हल्ला केला जातो, त्याला उत्तर देण्यासाठी सरकारने कोणताही कृती केली तरी आम्ही बरोबर राहिलो. पण तुम्ही देशाचा नकाशा समोर ठेवा. काश्मिर अशांत आहे. त्याशिवाय ज्या बांगलादेशाची निर्मिती आपण केली तो बांगलादेशही आपल्याबरोबर चांगला राहिलेला नाही. तसेच पाकिस्तान, श्रीलंका यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत. चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे.”

देशाच्या भल्यासाठी काही स्पष्ट भूमिका घ्यावी लागते असे मत व्यक्त करून पवार म्हणाले, “समाजाच्या सर्व थरामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. हातात हात घालुन काम करण्याचा हा काळ आहे. सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेत व्हायला हवेत.”

पुन्हा सत्ता मिळेल

पक्षात फुट पडली मात्र मी चिंता करत नाही, आपण एकसंध राहिलो, जनतेच्या कामाशी बांधिलकी ठेवली तर सत्ता आपोआप येईल. राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देऊ. यातून नव्या नेतृत्वाची फळी उभी राहील आणि राज्यात पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपा