शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
2
"भारतात घरं जाळण्याच्या धमक्या..."; शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला, इरफान पठाणचीही उडवली खिल्ली
3
सोलापूर भाजपात नाराजीचं सत्र सुरूच; नव्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे, ५० जणांनी सोडले पद, कारण...
4
रशियात ७.४ तीव्रतेच्या भूकंपाच्या धक्क्यानं पुन्हा हादरली जमीन; त्सुनामीचा धोका, यंत्रणा अलर्ट
5
मोदी सरकार देतेय क्रेडिट कार्ड, ५ लाख रुपयांपर्यंत लिमिट; 'या' लोकांसाठी आनंदाची बातमी
6
Elphinstone Bridge: एल्फिस्टन पूल बंद होताच एसटीचे भाडे वाढले, आता तिकीट किती रुपयांनी महागले?
7
"भारताच्या 'टीम' बद्दल बोला..."; 'त्या' खेळाडूचं नाव ऐकताच कपिल देवने पत्रकारांना सुनावलं
8
प्रियाने निधनाच्या आदल्या रात्रीच शंतनुची मालिका पाहिली अन्...बहिणीविषयी बोलताना सुबोध भावुक
9
"लढली ती...पण शेवटी कॅन्सरने तिचा घास घेतला", सुबोध भावेने सांगितल्या प्रिया मराठेच्या आठवणी
10
Rohit Godara : कोण आहे रोहित गोदारा? दिशा पाटनीच्या घरावरील हल्ल्याची व्हॉइस मेसेज पाठवून घेतली जबाबदारी
11
Tarot Card: यशाचे शिखर गाठले तरी पाय जमिनीवर ठेवा, हे शिकवणार पुढचा आठवडा; वाचा टॅरो भविष्य!
12
Ind vs Pak Asia Cup 2025 Live: मोबाइलवर मोफत पाहू शकता मॅच; 'या' रिचार्ज प्लान्ससह मिळतेय संधी
13
दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमच युरोपावर युद्धाचे ढग; पोलंडने सीमेवर तैनात केले ४० हजार सैनिक
14
पत्नीला पळवून नेल्याचा राग अनावर झाला; कोल्हापुरात पतीने घरात घुसून तरुणाला संपवला
15
कुजबुज: मोहित कंबोज यांचा संन्यास, सरनाईकांची टेस्ला खरेदी अन् बरंच काही...
16
Elphinstone Bridge: प्रभादेवी रेल्वेस्थानकावरील पुलावर अखेर 'हातोडा', पाडकामास प्रचंड बंदोबस्तात सुरूवात
17
अरे बापरे! घरात २ जण अन् १.६५ लाख लीटर पाण्याचं आलं बिल; भाडेकरूने मांडली व्यथा
18
अमेरिकन शेअर मार्केटला येणारे 'हॉर्ट अटॅक'; एक्सपर्टनं ३ कारणं देत दिला इशारा; कोणता दिला सल्ला?
19
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
20
Asia Cup 2025 IND vs PAK: भारत-पाक सामना टीव्हीवर दाखवू नका, फिल्म संबंधित संघटनेची मागणी

देशाच्या नेतृत्वाने शेजारी देशांबरोबर चांगले संबंध ठेवले नाहीत; शरद पवारांची सरकारवर टीका

By राजू इनामदार | Updated: June 10, 2025 19:12 IST

पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत, चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे

पुणे: पंडित नेहरू यांच्या काळात आपले शेजारी देशांबरोबर अतिशय चांगले संबध होते. तसे ते आता राहिलेले नाहीत, सुसंवाद आहे असे म्हणण्याची स्थिती नाही. देशाच्या नेतृत्वाने ते ठेवले नाहीत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे अध्यक्ष पक्षाच्या २६ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात केंद्र सरकारवर केली.

पवार म्हणाले, “पहेलगाम हल्ला झाला त्यावेळी आम्ही सरकारवर टीका केली नाही. देशाच्या नागरिकांवर हल्ला केला जातो, त्याला उत्तर देण्यासाठी सरकारने कोणताही कृती केली तरी आम्ही बरोबर राहिलो. पण तुम्ही देशाचा नकाशा समोर ठेवा. काश्मिर अशांत आहे. त्याशिवाय ज्या बांगलादेशाची निर्मिती आपण केली तो बांगलादेशही आपल्याबरोबर चांगला राहिलेला नाही. तसेच पाकिस्तान, श्रीलंका यांच्याबरोबरही आपले संबध आता नीट नाहीत. चीनचा आक्रमकपणा चिंता करण्यासारखा आहे.”

देशाच्या भल्यासाठी काही स्पष्ट भूमिका घ्यावी लागते असे मत व्यक्त करून पवार म्हणाले, “समाजाच्या सर्व थरामध्ये विश्वास निर्माण करण्याची गरज आहे. हातात हात घालुन काम करण्याचा हा काळ आहे. सर्वांना बरोबर घेऊन निर्णय घेत व्हायला हवेत.”

पुन्हा सत्ता मिळेल

पक्षात फुट पडली मात्र मी चिंता करत नाही, आपण एकसंध राहिलो, जनतेच्या कामाशी बांधिलकी ठेवली तर सत्ता आपोआप येईल. राज्याची, देशाची स्थिती चिंताजनक आहे. अशा वेळी सर्वांना बरोबर घेत काम करण्याची आपली जबाबदारी आहे. त्यासाठी कर्तृत्ववान चेहऱ्यांना संधी देऊ. यातून नव्या नेतृत्वाची फळी उभी राहील आणि राज्यात पुन्हा सत्ता मिळेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. 

टॅग्स :PuneपुणेSharad Pawarशरद पवारCentral Governmentकेंद्र सरकारPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसMahayutiमहायुतीBJPभाजपा