शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
2
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
3
Latest Marathi News LIVE Updates: हे महिला आरक्षण विधेयक नाही, तर मतदारसंघ पुर्नरचना विधेयक; राहुल गांधींचा घणाघात
4
"खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
5
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
6
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
7
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
8
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
9
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला तुळशीचे 'नवे' रोप लावल्याने इच्छापूर्ती होते? काय आहे कारण? वाचा!
11
पाकिस्तानला मालामाल करणार 'काळा खजिना'; सर्वात मोठ्या विहिरीत आढळला प्रचंड तेलसाठा, किती फायदा?
12
चीन, अमेरिका की सौदी... इराण युद्धात कोणाचं जास्त नुकसान? आयएमएफच्या नव्या रिपोर्टने जगात खळबळ
13
Sonali Jadhav : 'रील स्टार'सोबत भयंकर घडलं, अख्खं गाव हादरलं; बॉयफ्रेंडने वाढदिवशी गिफ्टसाठी बोलावलं अन्...
14
T20 वर्ल्ड कपच्या कोणत्या सामन्यात झाली मॅच फिक्सिंग? कसा घडला सगळा प्रकार? वाचा सविस्तर
15
Simple Ultra: एकदा चार्ज केल्यानंतर ४०० किलोमीटर धावणार! इलेक्ट्रीक स्कूटर सिंपल अल्ट्रा भारतात लॉन्च
16
LPG नंतर आता सोन्या-चांदीची टंचाई जाणवणार? भारतीय बँकांनी उचललं 'हे' मोठं पाऊल
17
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
18
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
19
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
20
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
Daily Top 2Weekly Top 5

तमाशा सम्राज्ञी विठाबार्इंच्या स्मारकाचे शासनाला विस्मरण!

By admin | Updated: January 15, 2015 00:01 IST

नारायणगाव येथे त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने केलेल्या स्मारकाच्या घोषणेला आज एक तप (१२ वर्षे) पूर्ण होत आहेत.

सचिन कांकरिया, नारायणगावजिवंतपणी अनेक हालअपेष्टा सहन करीत येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणा-या तमाशासाठी स्वत:ला झोकून देऊन स्वत:च्या आयुष्याचाच ‘तमाशा’करून घेणाऱ्या व अवघ्या महाराष्ट्राला आपल्या घुंगरांच्या तालावर डोलायला लावणा-या विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची मरणोत्तरही उपेक्षाच होत आाहे. नारायणगाव येथे त्यांच्या स्मरणार्थ राज्य सरकारने केलेल्या स्मारकाच्या घोषणेला आज एक तप (१२ वर्षे) पूर्ण होत आहेत. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांचा आज १२ वा स्मृतिदिन आहे.१५ जानेवारी २००२ मध्ये विठाबार्इंचा नारायणगावमध्ये निवासस्थानी मृत्यू झाला. एका लोककलेचा अस्त अशा शब्दांत अनेक मंत्र्यांनी व राजकारण्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. विठाबार्इंच्या स्मरणार्थ राज्य शासनाने १२ फेब्रुवारी २००६ ला नारायणगाव येथे पहिला तमाशा महोत्सव आयोजित केला होता़ या तमाशा महोत्सवात तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी विठाबाईंच्या स्मारकाबाबत जाहीर घोषणा केली होती; मात्र आजपर्यंत विठाबार्इंच्या स्मारकाबाबत राज्य शासनाने कोणतेही पाऊल न उचलल्याने या स्मारकाचे राज्य शासनाला विस्मरण झाले की काय....? असा प्रश्न तमाशा कलावंतांमधून व्यक्त केला जात आहे.१९३५ मध्ये विठाबार्इंचा जन्म पंढरपूर येथे झाला म्हणून त्यांच्या आई-वडिलांनी त्यांचे नाव ‘विठाई’ असे ठेवले़ तमाशामध्ये पदार्पण केल्यानंतर रसिकांनीच विठाईचे रूपांतर विठाबाई असे केले. वयाच्या अवघ्या ९ व्या वर्षी खेळणाऱ्या कोवळ्या पायात ५ किलो वजनाचे घुंगरांचे चाळ बांधून तमाशासृष्टीत विठाबाईंनी पदार्पण केले़ आयुष्यात पहिल्यांदा विठाबाईंनी वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे रॉकेलचे टेंभे लावून झालेल्या तमाशात लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विठाबार्इंच्या तमाशामय आयुष्याला सुरुवात झाली.तमाशाची कला जोपासत असताना विठाबार्इंचे स्वत:चा संसार, मुलाबाळांकडे दुर्लक्ष झाले़ पर्यायाने कुटुंबाची वाताहात झाली़ मात्र, या लोककलेवर त्यांनी निष्णात प्रेम केले. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटांत काम करण्यासाठी स्वत:हून अनेक आॅफर दिल्या होत्या; मात्र तमाशावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठाबाईंनी केवळ तमाशासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे नाकारले.समाजात घडणाऱ्या ताज्या घडामोडी त्यांनी तमाशाच्या मंचावरून अत्यंत प्रभावी व सहजपणे मांडून विविध विषयांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान विठाबार्इंनी नेफा आघाडीवर जाऊन जवानांचे मनोरंजन केले होते. १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते विठाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते.विठाबाईंचे स्मारक हे तमाशाक्षेत्रातील इतर कलावंतांसाठी प्रेरणास्रोत ठरणार आहे़ मात्र, विठाबार्इंसारख्या एका महान कलावंताचं हे स्मारक १२ वर्षे पूर्ण होऊनही होत नसेल, तर आपल्यासारख्याची काय गत....? हा प्रश्न निश्चितच इतर कलावंतांना भेडसावणारा आहे.