शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:53 IST

भावाच्या सांगण्यावरून विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले

शिरूर/शिक्रापूर : तालुक्यातील करडे येथील तलाठी यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने व त्यांना पोहता येत नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पवन अशोक बांदल (३१, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह मंगळवारी (दि. २९) सकाळी त्यांच्याच करडे येथील शेतातील विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणी मृत पवन बांदल यांचे बंधू श्रीनिवास अशोक बांदल यांनी शिरूर पोलिसांना खबर दिली होती. यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बांदल हे गेल्या सात महिन्यांपासून पाबळ येथे गावकामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. पवन बांदल हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पाबळ येथे जाण्यास निघाले असता त्यांचे भाऊ श्रीनिवास यांनी ‘जाताना आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंप चालू करून जा’, असे सांगितले. त्यास होकार देऊन ते निघून होते. दरम्यान, श्रीनिवास हे बारा वाजण्याच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेले असता शेतात पाणी न आल्याने ते स्वत: विहिरीकडे गेले. तेव्हा विहिरीच्या कडेला पवन यांची दुचाकी लावलेली होती व दुचाकीवर त्यांच्या लॅपटॉपची बॅगदेखील ठेवलेली आढळून आली. विहिरीत पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी सरोदे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार राजेंद्र बनकर करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरPoliceपोलिसFarmerशेतकरीDeathमृत्यूAccidentअपघात