शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

शिरूर तालुक्यात तलाठ्याचा मृत्यू; पाय घसरून विहिरीत पडले असावेत, कुटुंबियांचा अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 14:53 IST

भावाच्या सांगण्यावरून विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले

शिरूर/शिक्रापूर : तालुक्यातील करडे येथील तलाठी यांचा पाय घसरून विहिरीत पडल्याने व त्यांना पोहता येत नसल्यानेच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. पवन अशोक बांदल (३१, रा. करडे, ता. शिरूर, जि. पुणे) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तलाठ्याचे नाव आहे.

शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा मृतदेह मंगळवारी (दि. २९) सकाळी त्यांच्याच करडे येथील शेतातील विहिरीत आढळून आला होता. या प्रकरणी मृत पवन बांदल यांचे बंधू श्रीनिवास अशोक बांदल यांनी शिरूर पोलिसांना खबर दिली होती. यानंतर पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने त्यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याबाबत शिरूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

बांदल हे गेल्या सात महिन्यांपासून पाबळ येथे गावकामगार तलाठी म्हणून कार्यरत होते. पवन बांदल हे नेहमीप्रमाणे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून पाबळ येथे जाण्यास निघाले असता त्यांचे भाऊ श्रीनिवास यांनी ‘जाताना आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत पंप चालू करून जा’, असे सांगितले. त्यास होकार देऊन ते निघून होते. दरम्यान, श्रीनिवास हे बारा वाजण्याच्या सुमारास शेतात काम करण्यासाठी गेले असता शेतात पाणी न आल्याने ते स्वत: विहिरीकडे गेले. तेव्हा विहिरीच्या कडेला पवन यांची दुचाकी लावलेली होती व दुचाकीवर त्यांच्या लॅपटॉपची बॅगदेखील ठेवलेली आढळून आली. विहिरीत पाहिले असता त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसून आला. विहिरीवरील विद्युत पंप चालू करण्यासाठी गेले असता ते पाय घसरून विहिरीत पडले असावेत व पोहता येत नसल्याने त्यांचा मृत्यू झाला असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितले. शवविच्छेदनानंतर त्यांचा मृत्यू पाण्यात बुडून झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकारी सरोदे यांनी व्यक्त केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस हवालदार राजेंद्र बनकर करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेShirurशिरुरPoliceपोलिसFarmerशेतकरीDeathमृत्यूAccidentअपघात