शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
2
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
3
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
4
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
5
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
6
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
7
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
8
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
9
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
10
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
11
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
12
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
13
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
14
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
15
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
16
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
17
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
18
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
19
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
20
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 

पुण्याच्या पाणी प्रश्नात स्वाभिमानीची उडी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2019 3:40 PM

जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे.

पुणे: जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिका यांच्यात पाण्यावरून वाद सुरू असून पालिका प्रशासनाने पाण्याचा वापर कमी केला नाही तर उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी सोडण्यास अडचण निर्माण होऊ शकते,असे जलसंपदा विभागाच्या अधिका-यांकडून सांगितले जात आहे. मात्र, शेतक-यांना त्यांच्या वाट्याचे पाणी मिळाले नाही तर जलसंपदा विभागाला शेतक-यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल,असा इशारा स्वाभिमानी शेतकरी            संघटनेने दिला आहे.त्यामुळे पुण्याच्या पाणी प्रश्नात आता ‘स्वाभिमानी’ने उडी घतली आहे.                   गेल्या काही महिन्यांपासून पुण्याचे पाणी चांगलेच पेटले आहे. बुधवारी जलसंपदा विभागाच्या अधिका-यांनी पालिकेला पाणी पुरवठा करणारे दोन पंप बंद अचानक बंद केले.त्यामुळे यात आणखीच भर पडली.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याला पाणी कमी पडू देणार नाही,सांगूनही जलसंपदा विभागाचे अधिकारी ऐकत नाहीत.त्यामुळे त्यांना जाब विचारण्यासाठी सिंचन भवन येथे जाणार असल्याची भूमिका पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यानी घेतली.त्यात शेतक-यांसाठी उन्हाळी आवर्तन सोडण्यात अडचणी येतील,अशी चर्चा सुरू असल्याने शेतक-यांमध्ये रोष निर्माण होत आहे,असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रवक्ता योगेश पांडे यांनी कळविले आहे.                 पांडे म्हणाले, पाण्याच्या काटेकोर नियोजनात पुणे महापालिका व संबंधित विभाग अपयशी ठरत आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांना व ग्रामीण भागातील शेतक-यांनाही पाण्याच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे. तसेच सध्या शहरातील बहुतांश भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे पुण्याचे पाणी नेमके कुठे मुरते ? तसेच शहराच्या भोवती हजारो टँकर इमारतींसाठी पाणी पुरवठा करताना दिसत आहेत.त्यामुळे शेतक-यांच्या वाट्याचे पाणी टँकर माफियांकडून पळवले जात आहे का? तसे असेल तर प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून झोपले आहे का? असा सवाल उपस्थित होतो.

टॅग्स :WaterपाणीSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाFarmerशेतकरी