शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
5
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
6
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
7
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
8
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
9
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
10
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
11
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
12
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
13
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
14
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
15
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
16
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
17
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
18
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
19
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
20
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वये श्रीरामप्रभू ऐकती...’!

By admin | Updated: March 27, 2015 00:30 IST

‘काव्य नव्हे अमृतसंचय...’ अशा विशेषणांनी पिढ्यानपिढ्या रसिकमनावर संस्कारक्षम बीजांची पेरणी करणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण.’ ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ ,

पुणे : ‘काव्य नव्हे अमृतसंचय...’ अशा विशेषणांनी पिढ्यानपिढ्या रसिकमनावर संस्कारक्षम बीजांची पेरणी करणारी अजरामर कलाकृती म्हणजे ‘गीतरामायण.’ ‘स्वये श्री रामप्रभू ऐकती’ , ‘सरयू तीरावरी या, दशरथा घे हे पायसदान’ आणि ‘राम जन्मला ग सखे,’ अशा गीतांच्या सुरेल गुंफणीतून गीतरामायणाचा सुरेल काळ रसिकांच्या नजरेसमोर तरळला. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव म्हणून घराघरांत लोकप्रिय झालेल्या ‘गीतरामायणा’ स यंदाच्या रामनवमीस साठ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भारतीय शिक्षण मंडळातर्फे गरवारे महाविद्यालयाच्या पटांगणावर आयोजित गीतरामायणाच्या खास हीरकमहोत्सवी सोहळ्याचे. हजारो रसिकांच्या उपस्थितीत ‘गदिमा’ यांचे लेखन आणि बाबूजी ऊर्फ सुधीर फडके यांच्या अद्वितीय संगीतातून साकार झालेल्या गीतरामायणाच्या सोहळ्यास या प्रतिभावंत द्वयीबरोबर काम केलेल्या ज्येष्ठ संगीतकार प्रभाकर जोग, पुण्याचे महापौर दत्ता धनकवडे, बाबूजींचे चिरंजीव आणि गायक व संगीतकार श्रीधर फडके, गदिमांचे चिरंजीव श्रीधर माडगूळकर, ज्येष्ठ साहित्यिक द. मा. मिरासदार, यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून प्रारंभ झाला. याप्रसंगी अभय केले, निरामय वेलनेसचे योगेश आणि अमृता चांदोरकर, संतोष पोतदार, धनंजय कुलकर्णी व भारतीय शिक्षण मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. गीतरामायणातील प्रत्येक गीत हे दृश्य आणि कडवं हे उपदृश्य आहे. बाबूजींनी गीतरामायण रचले ते शास्त्रीय संगीतावर. जवळपास ३३ रागांचा त्यात समावेश त्यांनी केला होता, अशा गीतरामायणातील प्रत्येक गीतरचनेचे सौंदर्य उलगडत संगीतकार श्रीधर फडके यांनी, ‘सरयू तीरावरी दशरथा घे हे पायसदान’ आणि ‘राम जन्मला ग सखे,’ ‘सावळा ग राम ज्येष्ठ तुझा पुत्र’, ‘चला राघव’, ‘रामा चरण तुझे’, ‘आकाशाशी जडले नाते’ ‘निरोप कसला माझा घेता,’ ‘थांब सुमंता’, ‘नकोस नौके परत फिरु’, अशा गीतरामायणातील गीतांचे सादरीकरण करून रसिकांच्या मनात गीतरामायणाच्या स्मृती जागृत केल्या. या वेळी त्यांना तुषार आंग्रे (तबला), उद्धव कुंभार ( तालवाद्य), किमया काणे व विनय चेउलकर (सिंथेसायझर ) यांनी साथसंगत केली. गीतरामायणाचे ओघवत्या शैलीत अत्यंत रसाळ निवेदन धनश्री लेले त्यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले. संस्कृत पंडित सी. भा. दातार यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केलेली गीतरामायणातील चार गाणी नूपुर देसाई, तन्वी केळकर, मिताली जोशी आणि रोहित गुळवणी या सांगलीच्या बालकलावंतांनी सादर केली. कार्यक्रमाचे निवेदन दीपक पाटणकर यांनी केले. या वेळी टाळ्यांच्या प्रचंड गजरात श्रोत्यांनी या बालकलावंतांचे कौतुक केले. (प्रतिनिधी)