शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

डुग्गु सुखरूप घरी; मात्र पोलिसांना त्याचा शोध का लागला नाही? सुटकेनंतरचे अनेक प्रश्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 3:11 PM

अपहरणकर्त्यानेच पुनावळे येथील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याला सोडल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत

पुणे : बाणेर परिसरातून चार वर्षांच्या मुलाची आठ दिवसांनंतर आज सुटका झाली. अपहरणकर्त्यानेच पुनावळे येथील एका बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी त्याला सोडून दिले. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. इतक्या जवळ असूनही पोलिसांनाअपहरणकर्त्यांचा शोध कसा लागला नाही, अपहरणकर्त्यांनी इतके दिवस मुलाला कसे ठेवले, त्यानंतर अचानक कसे सोडून दिले, असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. केवळ १० किलोमीटरच्या परिसरात मुलगा असतानाही पोलिसांना त्याचा शोध लागू शकला नाही.

बाणेर येथील बालेवाडी पोलीस ठाण्याच्या जवळून ११ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास या मुलाचे अपहरण झाले होते. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. चतुश्रुंगी पोलीस, गुन्हे शाखेची विविध पथके यांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज गोळा केले. त्या परिसराबरोबर तेथून जेथे जेथे रस्ते जातात, त्या सर्व परिसरातील सीसीटीव्ही, तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील फुटेज तपासण्यात आले. अगदी प्रत्येक इंच न् इंच तपासला. अपहरणकर्त्यांविषयीच्या सर्व शक्यता तपासून पाहिल्या जात होत्या. परंतु, अपहरणकर्त्यांविषयी काहीही माहिती मिळाली नाही.

अपहरणकर्त्यांनी अपहरण का केले? 

शेवटी अपहरणकर्त्यांनीच त्याची स्वत: हून सुटका केली. आजवरच्या अपहरणाच्या घटनांमध्ये खंडणीसाठी अपहरण केले जाते. मात्र, या प्रकरणात खंडणी मागितली गेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्यामुळेच एकूण सर्व प्रकरणातील गूढ वाढले आहे. जर खंडणी मागितली गेली नाही तर अपहरणकर्त्यांनी अपहरण का केले, नेमके अपहरणकर्ते किती आहेत, प्रथमदर्शनी स्वर्णवला पळवून घेऊन जाणाऱ्या एकाचेच सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे त्याचे अन्य साथीदार आहेत का?

चार वर्षांचा मुलगा इतके दिवस त्यांच्याबरोबर कसा राहिला?

सुटका झाल्यानंतर स्वर्णवकडे पाहिले असता तो व्यवस्थित दिसून येत आहे. त्याअर्थी या चार वर्षाच्या मुलाचा अपहरणकर्त्यांनी व्यवस्थित सांभाळ केलेला दिसून येत आहे. त्याला खाणे-पिणे व्यवस्थित दिलेले दिसून येत होते. त्यामुळेही अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. स्वर्णव हा अपहरणकर्त्याला ओळखत होता का? चार वर्षांचा मुलगा इतके दिवस त्यांच्याबरोबर कसा राहिला?

 अजूनही अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचण्यात पोलीस अयशस्वी 

पुणे पोलिसांनी यापूर्वी अशाच लहान मुलांच्या अपहरणाच्या घटनेत मुलाची सुटका करण्यात अल्पावधीत यश मिळविले होते. त्याचबरोबर अपहरणकर्ते जेरबंद झाले होते. मात्र, त्या प्रकरणात अजूनही अपहरणकर्त्यांपर्यंत पोहचण्यात पोलिसांना यश आलेले नाही.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसKidnappingअपहरणMONEYपैसाBalewadiबालेवाडी