शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

साखर कारखान्यांचे गाळप आजपासून; राज्यात १०६ कारखान्यांना परवान्याचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 01, 2017 11:46 AM

राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत १०६ कारखान्यांना परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (दि. १) गाळप हंगामास सुरुवात होणार असून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहेत. 

ठळक मुद्दे१९१ कारखान्यांचे आॅनलाईन परवान्यासाठी अर्ज, त्यातील १०६ कारखान्यांना परवाने वितरितविविध कारणांमुळे बंद अवस्थेत असलेले ५ कारखाने पुन्हा होणार सुरू

पुणे : राज्यातील साखर कारखाने सुरू करण्याबाबत राज्य शासनाकडून देण्यात आलेल्या आदेशानुसार ३१ सप्टेंबर अखेरपर्यंत १९१ कारखान्यांनी आॅनलाईन परवान्यासाठी अर्ज केले आहेत. त्यातील १०६ कारखान्यांना परवाने वितरित करण्यात आले आहेत. त्यामुळे आजपासून (दि. १) गाळप हंगामास सुरुवात होणार असून कारखान्याचे बॉयलर पेटणार आहेत. राज्य शासनाने गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखान्यांना आॅनलाईन नोंदणी करण्याचे आदेश दिले होते. गेल्या वर्षाची किमान आधारभूत रक्कम थकविल्यामुळे (एफआरपी) १४ कारखान्यांना परवाने नाकारण्यात आले. त्यामुळे हे कारखाने बंद राहणार आहेत. कृषी आयुक्त संभाजी कडू-पाटील म्हणाले, ‘‘यंदा १ नोव्हेंबरपासून सुरू होणार्‍या गळीत हंगामासाठी राज्यभरातून १९१ कारखान्यांनी आॅनलाइन अर्ज केले. त्यापैकी त्रुटीपूर्तता केलेल्या १०६ कारखान्यांना परवाने वितरित केले असून आणखी काही कारखान्यांना परवाने देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गेल्या वर्षी ५ नोव्हेंबर रोजी गळीत हंगाम सुरू झाला होता. तसेच, ५० कारखाने सुरू झाले होते. मात्र, यंदा पहिल्या दिवशी १०६ कारखाने  सुरू होत आहेत.’’‘एफआरपी’नुसार पैसे न दिलेल्या कारखान्यांना यंदा गाळपाची परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच, यंदा दोन नवीन साखर कारखाने सुरू होत आहेत. तसेच, यंदा काही बंद पडलेले कारखानेही सुरू होत आहेत. 

 

बंद कारखाने पुन्हा सुरू होणारविविध कारणांमुळे बंद अवस्थेत असलेले ५ कारखाने पुन्हा सुरू होणार आहेत. त्यात बीडच्या अंबाजोगाई आणि जयभवानी साखर कारखान्याचा तसेच नगर येथील बाबा तनपुरे कारखाना, नाशिकमधील के. के. वाघ कारखाना, तर औरंगाबाद येथील घृष्णेश्वर साखर कारखाना यांचा समावेश आहे. यंदाच्या गळीत हंगामामध्ये शिरूर येथील ‘पराग अ‍ॅग्रो’ कारखाना सुरू होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीonlineऑनलाइन