शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
6
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
7
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
8
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
9
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
10
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
11
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
12
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
13
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
14
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
15
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
16
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
17
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
18
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
19
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
20
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
Daily Top 2Weekly Top 5

चाकणमध्ये प्लॅस्टिकबंदीला हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:10 IST

चाकण : दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. त्याप्रमाणे चाकण नगर परिषदने कडक अंमलबजावणी करत शहरात प्लॅस्टिक ...

चाकण : दोन वर्षांपूर्वी राज्य सरकारने प्लॅस्टिक बंदी जाहीर केली. त्याप्रमाणे चाकण नगर परिषदने कडक अंमलबजावणी करत शहरात प्लॅस्टिक बंदी केली होती. शहरातील अनेक मोठ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. यामुळे छोट्या व्यावसायिकांनीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केला होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून नगर परिषदचे दुर्लक्ष होत असल्याने शहरात प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

चाकण शहरात प्लॅस्टिकबंदीच्या काळात नगर परिषद प्रशासनाने कडक अंमलबजावणी करून अनेक छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. तसेच शहरातील आठवडे बाजारात जनजागृती करून प्लॅस्टिक पिशव्या न वापरण्याचे आवाहन केल्याने सर्वच स्तरावरील व्यावसायिकांनी प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर बंद केला होता. परंतु हा कारवाईचा बागुलबुवा फुटला असून पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर सुरू झाला आहे. या प्लॅस्टिक कॅरिबॅग बाजारात येतात कशा हे प्रशासनाला दिसत नाही का? असा सवाल नागरिक करत आहेत. प्लॅस्टिकमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. १०० वर्षे तरी प्लॅस्टिक कुजत नाही. प्लॅस्टिक जाळल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होऊन प्रदूषण वाढत आहे. तसेच कचऱ्यात जास्त कचरा प्लॅस्टिक कॅरिबॅगच जास्त प्रमाणात असतात. यामुळे कचरा पेटवल्यास त्यातून निघणाऱ्या धुरातून परिसरात हवा प्रदूषण होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. तरी बाजारात येणाऱ्या या पिशव्या रोखणे आवश्यक आहे. प्लॅस्टिक कॅरिबॅग तयार करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करणे आवश्यक आहे. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या बंदी आहे.

नगर परिषद प्रशासनाकडून प्लॅस्टिक विक्रेत्यांवर कारवाई होते नसल्याने कमी मायक्रॉनच्या प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर भाजी मंडई, फळ, मिठाई आणि फूलविक्रेत्यांकडून वापर वाढला आहे. तसेच समारंभामध्येही जेवणावळी व कार्यक्रमांमध्ये प्लॅस्टिक द्रोण,ग्लास, कप, वाट्या, चमच्यांचा वापर केला जात आहेत. त्यामुळे सर्वच पातळ्यांवर प्लॅस्टिकबंदीचा फज्जा उडालेला असताना संबधित यंत्रणा डोळेझाक करत आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे पर्यावरणसह मानवी आरोग्याला हा फटका बसत आहे. राज्य सरकारने कायदे व नियम बनविले असले तरी याची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

कोट

कोरोनाच्या काळात याकडे दुर्लक्ष झाले होते. परंतु पुन्हा एकदा शहरातील प्लॅस्टिक कॅरिबॅग विकणाऱ्या होलसेल व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. लोकांनीही प्लॅस्टिक पिशव्यांचा वापर टाळून आपले शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी मदत करावी. प्लॅस्टिकमुक्त चाकण शहरासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करण्याची गरज आहे. - नानासाहेब कामठे,मुख्याधिकारी, चाकण नगरपरिषद.

प्लॅस्टिकच्या वाढत्या भस्मासुराचा परिणाम.

पावसाळ्य़ात गटारे तुंबतात.

- जनावरांच्या पोटात प्लॅस्टिक गेल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येते.

- नाले तुंबतात, पूरस्थिती निर्माण होते.

- प्लॅस्टिकचे विघटन होत नसल्याने भूप्रदषणात वाढ.

* काय उपाययोजना कराव्यात...

- हॉटेल, फेरीवाले, हातगाडय़ा आणि दुकानविक्रेत्यांवर फौजदारी कारवाई करावी.

- प्लॅस्टिक वापरणारे विक्रेत्यांचा परवाना रद्द करवा.

- प्लॅस्टिक पिशव्यांऐवजी तागाच्या, कापडाच्या व कागदाच्या पिशव्यांचा वापर वाढावा.

- प्लॅस्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करावी.

- प्लॅस्टिक मुक्त परिसर अभियान राबविणे.

-