शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

‘स्मार्ट सिटी’ बैठकीत राजकीय शेरेबाजी

By admin | Updated: October 25, 2015 03:43 IST

केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या

पुणे : केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या खासदार, आमदार व पक्षनेत्यांच्या बैठकीत मतभेद झाले. त्यावरून बरीच राजकीय उणीदुणी काढण्यात आली. अखेरीस यासंदर्भात सोमवारी निर्णय घेण्याचे ठरले.महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतील चर्चेला अनेक फाटे फुटत असल्याचे लक्षात घेऊन एरिया डेव्हलपमेंटसाठी कोणता परिसर निवडायचा यावर सोमवारी दुपारपर्यंत एकमताने निर्णय देऊ, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासनाला सांगितले. बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, तसेच मेधा कुलकर्णी, दीप्ती चवधरी, नीलम गोऱ्हे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, पालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे, गणेश बीडकर, राजेंद्र वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे आदी बैठकीला उपस्थित होते.आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वांना ‘स्मार्ट सिटी’ योजनेत प्रशासनाने आतापर्यंत पार पाडलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. सध्या तिसरा टप्पा सुरू असून त्यात एरिया डेव्हलपमेंटसाठी शहरातील एखाद्या परिसराची निवड करायची आहे असे सांगितले. प्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे. शहरातील एक आदर्श भाग होईल, अशी कामे या परिसरात प्रस्तावित करायची आहेत, त्यासाठी योजनेत स्वतंत्र निधी मिळेल असे ते म्हणाले. अंतिम प्रस्ताव पाठवण्यासाठी कमी कालावधी असल्याने या परिसराला संमती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार शिरोळे यांनी केंद्र सरकारच्या योजनांबाबत महापालिका, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात समन्वय हवा, असे मत व्यक्त केले. महापालिकेने स्वत:चा फंड तयार होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, त्यामुळे सरकार बदलले, योजनेत काही बदल झाले,निधीचा प्रश्न उभा राहिला तरी त्यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले. ‘स्मार्ट सिटी’ बैठकीत राजकीय शेरेबाजीपुणे : केंद्र सरकारच्या बहुचर्चित ‘स्मार्ट सिटी’ योजनेच्या प्रस्तावातील एरिया डेव्हलपमेंट या उपयोजनेसाठी शहराचा कोणता भाग निवडायचा यावरून आयुक्तांसमवेत आज झालेल्या खासदार, आमदार व पक्षनेत्यांच्या बैठकीत मतभेद झाले. त्यावरून बरीच राजकीय उणीदुणी काढण्यात आली. अखेरीस यासंदर्भात सोमवारी निर्णय घेण्याचे ठरले.महापालिकेत आयुक्त कार्यालयात झालेल्या या बैठकीतील चर्चेला अनेक फाटे फुटत असल्याचे लक्षात घेऊन एरिया डेव्हलपमेंटसाठी कोणता परिसर निवडायचा यावर सोमवारी दुपारपर्यंत एकमताने निर्णय देऊ, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी प्रशासनाला सांगितले. बापट यांच्यासह खासदार अनिल शिरोळे, आमदार अनिल भोसले, जयदेव गायकवाड, विजय काळे, जगदीश मुळीक, भीमराव तापकीर, तसेच मेधा कुलकर्णी, दीप्ती चवधरी, नीलम गोऱ्हे, महापौर दत्तात्रय धनकवडे, उपमहापौर आबा बागूल, पालिकेतील पक्षनेते अरविंद शिंदे, गणेश बीडकर, राजेंद्र वागस्कर, सभागृह नेते बंडू केमसे आदी बैठकीला उपस्थित होते.आयुक्त कुणाल कुमार यांनी सर्वांना ‘स्मार्ट सिटी’ योजनेत प्रशासनाने आतापर्यंत पार पाडलेल्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्याची माहिती दिली. सध्या तिसरा टप्पा सुरू असून त्यात एरिया डेव्हलपमेंटसाठी शहरातील एखाद्या परिसराची निवड करायची आहे असे सांगितले. प्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे. शहरातील एक आदर्श भाग होईल, अशी कामे या परिसरात प्रस्तावित करायची आहेत, त्यासाठी योजनेत स्वतंत्र निधी मिळेल असे ते म्हणाले. अंतिम प्रस्ताव पाठवण्यासाठी कमी कालावधी असल्याने या परिसराला संमती मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. खासदार शिरोळे यांनी केंद्र सरकारच्या योजनांबाबत महापालिका, केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात समन्वय हवा, असे मत व्यक्त केले. महापालिकेने स्वत:चा फंड तयार होण्यासाठीही प्रयत्न करायला हवेत, त्यामुळे सरकार बदलले, योजनेत काही बदल झाले,निधीचा प्रश्न उभा राहिला तरी त्यातून मार्ग निघेल असे ते म्हणाले. स्मार्ट सिटीसाठी सर्वपक्षीय खासदार, आमदार असे प्रथमच एकत्र आले होते. बापट यांनी या कामात कसलाही पक्षीय अभिनवेश नाही असे स्पष्ट केले, तरीही राष्ट्रवादी व काँग्रेस एका बाजूला, भाजप एकीकडे व मनसे, सेना वेगवेगळे असे चर्चेतून स्पष्ट दिसत होते. खासदार वंदना चव्हाण या बैठकीला उपस्थित नव्हत्या.स्थानिक कंपन्यांच्या समावेशाचा मुद्दा सेनेच्या गोऱ्हे यांनी उपस्थित करताच मनसेच्या राजेंद्र वागस्कर यांनी मनसेचे २८ नगरसेवकांना सोडून कोणालाच पुुढे जाता येणार नाही असे सांगितले. त्यावर बापट यांनी मोठा भाऊ, मोठा भाऊ अशी टिप्पणी करताच गोऱ्हे यांनी यावर वेगळी चर्चा होऊ शकते’ असे उत्तर दिले.एरिया डेव्हलमेंटच्या मुद्द्यावर सर्वांचे एकमत व्हावे अशी बापट यांची अपेक्षा होती. मात्र आमदार गोऱ्हे तसेच काँग्रेसचे पक्षनेते अरविंद शिंदे यांनी त्याला विरोध केला. याबाबत पक्षाचे पदाधिकारी नगरसेवक यांच्याशी चर्चा करण्याची गरज आहे, त्यामुळे थोडा कालावधी द्यावा असे ते म्हणाले. संमती द्यावी यासाठी पालक मंत्री गिरीश बापट सुरूवातीला आग्रही होते, मात्र गोऱ्हे यांनी वेळ द्यावाच लागेल, अशी आग्रही भूमिका घेतल्यानंतर याबाबत सोमवारी निर्णय देऊ, असे आयुक्तांना सांगितले. सध्या तिसरा टप्पा सुरू असून एरिया डेव्हलपमेंटसाठी एखाद्या परिसराची निवड करायची आहेप्रशासनाने औंध-बाणेर हा ५०० एकर परिसराचा विभाग निश्चित केला आहे.