शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
4
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
5
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
6
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
7
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
8
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
9
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
10
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
11
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
12
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
13
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
14
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
15
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
16
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
17
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
18
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
19
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
20
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले

राज्य सरकारने तात्काळ महाविद्यालये सुरू करावी; पुण्यात 'अभाविप'चं तीव्र आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2021 18:58 IST

विद्यार्थी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी केली अटक

पुणे : कोरोना महामारीमुळे संपूर्ण देशभरात लॉकडाऊनमध्ये सर्व विद्यापीठे व महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. मात्र आता सर्वत्र लॉकडाउन शिथिल करण्यात आले आहे. तसेच सर्व प्रकारचे दुकाने, मॉल, चित्रपट गृह सर्वत्र सुरु करण्यात आली असून फक्त विद्यापीठ व महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहे. परंतु, ऑनलाइन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता महाविद्यालये सुरू करावी यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे (अभाविप) ने मंगळवारी ( दि.२ ) शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये जोरदार घोषणाबाजी करत तीव्र आंदोलने केली. 

अभाविप च्या वतीने पुणे शहरातील विविध नामांकित महाविद्यालयात महाविद्यालय सुरू करावे यासाठी आंदोलन केली. दरम्यान स.प. महाविद्यालयात आंदोलन करत असताना पोलिसांकडून विद्यार्थी व अभाविप कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली. 

यावेळी उच्च तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत केवळ घोषणा करून विद्यार्थ्यांची फसवणूक करत आहे असा आरोप देखील अभाविपकडून करण्यात आला आहे. सामंत यांनी २९ जानेवारीपासून महाविद्यालये सुरु करण्याची घोषणा त्यांनी केली होती. परंतु आजतागायत महाविद्यालये सुरु करण्याबाबत राज्य सरकार गांभीर्य दाखवत नाही. यामुळे संतप्त झालेले विद्यार्थी आणि अभाविप कार्यकर्ते विविध महाविद्यालयात धडकले.

महाविद्यालये जर सुरु झाले नाही तर विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होणार आहे. शैक्षणिक वर्ष संपत आले तरी देखील अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे अजून प्रॅक्टिकल सुरु झालेले नाही. ही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अतिशय चिंतेची बाब आहे. मुळातच महाविद्यालयाबाबत कोणतेही निर्णय घेण्याचे अधिकार हे केवळ विद्यापीठाकडे असतात स्वायत्त संस्थेकडे असतात असे असताना या मध्ये हस्तक्षेप करून शासन अशा संस्थेच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याचे काम करत आहे, या शब्दात अभाविपच्या कार्यकर्त्यानी आंदोलनामागची भूमिका स्पष्ट केली.  

राज्य शासनाला विद्यार्थ्यांच्या भवितव्याची कोणतीच काळजी नाही. लाखो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळण्याचे काम हे शासन करत आहे महाविद्यालये सुरु करण्याबाबत लवकरात लवकर या शासनाने गांभीर्याने विचार करून सर्व महाविद्यालये पुढील २ दिवसात सुरु करावी अन्यथा अभाविप अधिक तीव्रपणे आंदोलन करेल असा इशारा प्रदेश मंत्री स्वप्नील बेगडे यांनी दिला. 

 

टॅग्स :PuneपुणेStudentविद्यार्थीcollegeमहाविद्यालयState Governmentराज्य सरकारEducationशिक्षणUday Samantउदय सामंत