शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

इंदापुरात खरिपाच्या पेरण्या खोळंबल्या, खरिपाची १० टक्केच पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 3:23 AM

जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे.

वालचंदनगर : जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कमी-जास्त प्रमाणात पडत असला तरीही इंदापूर तालुक्यात अद्याप पावसाने दडी मारली आहे. जुलै महिन्यातही अद्याप पावसाचे थेंब नसल्याने खरिपाच्या पेरणीपासून शेतकरी वंचित राहिले आहेत. तालुक्यात या वर्षी सरासरी फक्त १० टक्केच खरिपाची पेरणी झालेली असून तेही मकाचे पिके घेण्यात आलेले असल्याने या वर्षी उडीद, मूग, सोयाबीन पेरणीआभावी गायब होण्याची भीती शेतकऱ्यांना भेडसावत आहे.तालुक्यात दर वर्षी पाऊस पाठ फिरवत असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी खालवली आहे. विहिरी, विंधनविहिरी जानेवारी फेब्रुवारी महिन्यातच तळ गाठत आहेत. अनेक गावांना पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होताना दिसत आहे. गेल्या वर्षी ९० टक्के वेळेवर खरीपाची पेरणी झालेली होती. त्यामुळे शेतकºयांत आनंदाचे वातावरण होते. या वर्षी हवामान खात्याने आवश्यकतेपेक्षा जास्तच पाऊस पडणार असल्याचे भाकीत करण्यात आलेले असल्याने एप्रिल, मे महिन्यात शेतकºयांनी शेतावर मशागत करून जमिनी पेरणीयोग्य करून ठेवण्यात आलेल्या आहेत. जून महिन्यात मृग नक्षत्रात जोरदार पावसाचे आगमन झालेले होते.त्यामुळे शेतकºयांच्या खरिपाच्या पेरणीच्या अपेक्षा पल्लवीत झालेल्या होत्या. परंतु जूननंतर पेरणीयोग्य पाऊस पडलाच नसल्याने शेतकरी चिंतातूर झालेला आहे. जुलै महिन्यात पिके खुरपणीला येत असतात. परंतु अजूनही पेरणीच झालेली नसल्याने शेतकरी हवालदिल झालेला आहे. विहिरीच्या जोरावर तालुक्यात १० टक्के जनावरांच्या चारापाण्यासाठी मका पिकाची पेरणी करण्यात आलेली आहे. अन्यथा खरिपाच्या पेरणीची तिफण चाललीच नसल्याने चिंता लागून राहिली आहे.दररोज डोक्यावर ढगांचे थैमान काळेकुट्ट ढग पाहावयास मिळत आहे. परंतु हुलकावणी देऊन निघून जात असल्याने शेतकºयाने अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत. तालुक्यातील कृषी अधिकारी सूर्यकांत जाधव यांच्याशी संपर्क साधला असता गेल्या वर्षी या महिन्यात संपूर्ण शंभर टक्के पेरणी करण्यात आलेली होती. उडीद, मूग, सोयाबीन, तूर पिके वंचित राहिली आहेत. 

टॅग्स :PuneपुणेRainपाऊस