शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
2
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
3
Career News : आयआयटीच नव्हे, आता एलपीयूचे विद्यार्थीही मिळवत आहेत कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस!
4
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
5
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
6
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
7
"५ सेकंद सर्व थांबले, हिरवी लाईट सुरु झाली अन्..."; रमेश विश्वासकुमारने सांगितले टेकऑफ नंतर काय घडलं
8
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?
9
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
10
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
11
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
12
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
13
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
14
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
15
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
16
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
17
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
18
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
19
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
20
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प बंधनकारक करणार : शिवाजीराव कचरे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 17:04 IST

सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करणार आहे, असे प्रतिपादन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले. सौर उर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देलक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिरात २३ किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पाचे उद्घाटनभारतामध्ये १७५ गिगावॅट अपारंपरिक उर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट : किशोर शिंदे

पुणे : धार्मिक स्थळांमध्ये अशा प्रकारचा सौर उर्जा प्रकल्प उभारणे, ही स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने नाविन्यपूर्ण बाब आहे. धर्मादाय आयुक्तालयाच्या माध्यमातून सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सौर उर्जा वापरण्याचे आम्ही ठरविले आहे. दत्तमंदिराने केलेला सौर उर्जा प्रकल्प इतर संस्थांकरिता मार्गदर्शक असून या विभागातील सार्वजनिक न्यासांना सौर उर्जा प्रकल्प राबविणे बंधनकारक करणार आहे, असे प्रतिपादन सहधर्मादाय आयुक्त शिवाजीराव कचरे यांनी केले.कै. श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टतर्फे दत्तमंदिरात २३ किलोवॅट सौर उर्जा प्रकल्पाचा उद्घाटन सोहळा दत्तमंदिरासमोरील उत्सव मंडपात आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमास यावेळी महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाचे (मेडा) अध्यक्ष किशोर शिंदे, व्यवस्थापक विकास रोडे, महाराष्ट्र राज्य विद्युत पुरवठा महामंडळ पुणेचे मुख्य अभियंता एम. जी. शिंदे, कार्यकारी अभियंता किशोर गोर्डे, प्रणव शहा, नितीन शहा, दत्तमंदिर ट्रस्टचे अध्यक्ष अंकुश काकडे, अ‍ॅड. शिवराज कदम जहागिरदार, बी. एम. गायकवाड, शिरीष मोहिते, चंद्रशेखर हलवाई, युवराज गाडवे, उल्हास कदम, अ‍ॅड. एन. डी.पाटील आदी उपस्थित होते. शिवाजीराव कचरे म्हणाले, महाराष्ट्रामध्ये मराठवाडा परिसरात सौर उर्जा मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. अनेक वर्षांपासून मराठवाड्यातील शेतकºयांची परिस्थिती वाईट आहे. तेथे सौर उर्जा शेती प्रकल्प राबविण्याची आवश्यकता आहे, असेही त्यांनी सांगितले. किशोर शिंदे म्हणाले, भारतामध्ये १७५ गिगावॅट अपारंपरिक उर्जा तयार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी ६० गेगावॅट वीजनिर्मिती आपण पूर्ण केली आहे. संपूर्ण उद्दिष्टापैकी तब्बल १०० गीगावॅट वीज सौरउर्जेच्या माध्यमातून आपण तयार करणार आहोत. सौर उर्जा प्रकल्पांच्या माध्यमातून मोठया प्रमाणात सौर उर्जेचा वापर व्हायला हवा.एम. जी. शिंदे म्हणाले, पुण्यामध्ये हा ७५वा सौर उर्जा प्रकल्प सुरु झाला आहे. पुणे विभागामध्ये १ हजार ५५१ किलोवॅट वीज निर्मिती होत अपारंपरिक उर्जा स्त्रोतातून होत असून प्रत्यक्षात १ हजार ५०० मेगावॅटची आवश्यकता आहे. अपारंपरिक उर्जा ही निसर्गावर अवलंबून असली, तरी क्लिन एनर्जी, ग्रीन एनर्जीकरीता याकडे वळायला हवे. महाराष्ट्राने २०२२पर्यंत १२ हजार मेगावॅट वीज तयार करण्याचे धोरण केले आहे. त्यापैकी ३ हजार ७८० मेगावॅट वीज सौर उर्जा, बायोगॅस आदींच्या माध्यमातून तयार झाली आहे, असेही त्यांनी सांगितले. अंकुश काकडे यांनी प्रास्ताविक केले. प्रिया निघोजकर यांनी सूत्रसंचालन केले. उल्हास कदम यांनी आभार मानले. 

टॅग्स :Puneपुणे