शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

...म्हणून नरेंद्र मोदी हे शरद पवारांवर टीका करतात, जयंत पाटील यांचा निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 30, 2024 01:01 IST

सणसर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील बोलत होते.

यंदाची लाेकसभा निवडणुक वेगळी आहे. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांनी देशात साम दाम दंड भेदाची निती वापरुन सत्तेवर येण्याचे ठरविले आहे. मात्र, त्यांना ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा अडसर आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी पवारांवर टीका करतात, अशी टीका शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.

सणसर येथे महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पाटील बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले, शरद पवार यांना  अपशब्द वापरल्याशिवाय मोदींना बोलता येत नाही. पंडीत नेहरुंपासून अटलबिहारी वाजपेयीपर्यंत भाषणे एकली. पण विरोधकांवर एवढ्या टोकाची टीका होताना आपण प्रथमच पाहत आहे. मोदींनी दहा वर्षात काय केले हे सांगावे, पुढील नियोजनाबाबत चर्चा करावी. मात्र,ते यावर बोलत नाहीत. महाराष्ट्रातील जनता यांच्यावर प्रचंड चिडलेली आहे. कारण त्यांनी मराठी माणसांनी उभा केलेले दोन पक्ष फोडल्याची शिक्षा त्यांना द्यायची असल्याचे पाटील म्हणाले.

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी केलेल्या विकासामुळे तुमच्या आमच्या जीवनात बदल झाला. त्यामुळे पवारांनी काय केले हे त्यांनी विचारु नये. अमित शहांनी गुजरातसाठी काय केले हे सांगावे, त्यामुळे देशाच्या ज्ञानात भर पडेल, असा टोला पाटील यांनी शहा यांना लगावला.

जीएसटीच्या रुपात देशाने जाचक कर देशाने सहन केेला. देशात महागाइ,इंधनदरवाढ मोठ्या प्रमाणात झाली. त्यामुळे भाजपच्या धोरणांवर जनता प्रचंड नाराज असल्याचे दिसुन येते. देशातील बड्या प्रकल्पांचे काम उद्योगपतींना दिले जाते. मुठभर लोकांना श्रीमंत करण्यासाठी या सरकारने मेहनत घेतली. २२ लोकांकडे देशाची ७० टक्के संपत्ती गेली आहे. मनमोहन सिंग यांच्या काळापर्यंत देशावर ५६ लाख कोटींचे कर्ज होते. गेल्या १० वर्षात ते कर्ज २१० लाख कोटींवर पोहचले आहे. कर्जामुळे देशाचे उत्पन्न वाढविण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही. देशाची अर्थव्यवस`था अडचणीत आली आहे.प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर २ लाखांचे कर्ज आहे. ते वसूल करण्यासाठी लुट चालू असल्याची टीका पाटील यांनी केली.

यावेळी आप्पासाहेब जगदाळे, प्रदेश प्रवक्ते विकास लवांडे, जलतज्ञ प्रफुल कदम, भीमराव भोसले,आबासाहेब निंबाळकर, अॅड तेजसिंह पाटील,सागर मिसाळ आदी उपस`थित होते. प्रास्तविक अमोल भोइटे यांनी तर, आभार अनिकेत निंबाळकर यांनी मानले. 

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलSupriya Suleसुप्रिया सुळेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNarendra Modiनरेंद्र मोदी