शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

एक ते सात वर्गांना एकच शिक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2019 13:54 IST

पालकांना चिंता : खेडच्या आदिवासी भागातील स्थिती

ठळक मुद्देप्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण २४ मुलांचा पटआदिवासी भागातील शाळांमध्ये २२ पदवीधर शिक्षक कमी पडत असून उपशिक्षक कमी

खेड : मोरोशी (ता. खेड) येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवी असे सात वर्ग आहेत. मात्र, फक्त एकच शिक्षिका या शाळेत कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पंचायत समितीनेही याकडे दुर्लक्ष केल्याने पालक संताप व्यक्त करीत आहेत. आदिवासी भागातील मोरोशी येथील प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत एकूण २४ मुलांचा पट आहे.  जिल्हा परिषदेच्या नियमानुसार दोन पदवीधर व दोन उपशिक्षक असणे आवश्यक आहे. परंतु, येथे एकच शिक्षणसेवक म्हणून नव्याने रुजू झालेल्या शिक्षिका कार्यरत आहेत. दुसरी शिक्षिका गेली दोन वर्षे काही कारण न देता दोन वर्षांपासून रजेवर आहे. सातही वर्ग एकाच खोलीत भरत आहेत. त्या सर्व इयत्ता एकाच वर्गखोलीत शिक्षण घेत आहेत. अशीच स्थिती आदिवासी भागातील अनेक शाळांमध्ये आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक  गुणवत्तेबाबत पालक प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत.  विशेष बाब म्हणजे, शिक्षणसंस्थांमध्ये असलेले अनेक शिक्षक-शिक्षका कर्तव्य योग्यपणे बजावत असल्याचे दिसून येत नाही. अनेकदा शिक्षक रजेवर असल्याच्या घटना उघड झाल्या आहेत. शिक्षकांच्या याच वर्तनाचा दुष्परिणाम विद्यार्थ्यांना मिळणाºया शिक्षणावर होतो आहे. योग्य प्रकारे शिक्षण मिळत नसल्याने ते शिक्षणात कच्चेच राहतात. मात्र, शिक्षकांची कमतरता ही एकच चिंतेची बाब नाही, तर सर्व शिक्षा अभियान योजना, शिक्षण हक्क कायदा हे सर्व सरकारी योजना कायदे असूनही शेकडो आदिवासी, कातकरी मुले शिक्षणाच्या परिघाबाहेरच आहेत.  शिक्षणाची आवड, भविष्याचे कुतूहल विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणारा शिक्षक या दुर्गम भागात आवश्यक आहे. आज असलेल्या शिक्षकांमध्ये अपवाद शिक्षक या विचारांचे आहेत. या शिक्षकांनी सहकारी शिक्षकांचे उद्बोधन करून त्यांना या प्रवाहामध्ये, या कामासाठी सामील करून घेण्याची गरज आहे. त्यासाठी  प्रशासनाने प्राधान्याने शिक्षकांच्या संख्येचा आणि त्यांच्या प्रश्नांचा विचार करणे गरजेचे आहे.............आदिवासी भागातील शाळांमध्ये २२ पदवीधर शिक्षक कमी पडत असून उपशिक्षक कमी आहेत. न्यायालयीन प्रक्रिया चालू असल्याने जिल्हा परिषदेकडून शिक्षक उपलब्ध झाले नाहीत. आदिवासी भागातील या शाळांमध्ये शिक्षकांची केंद्रनिहाय उपलब्ध शिक्षकांमधून आवश्यक बदल व शिक्षकांची व्यवस्था केली जाईल. -  संजय नाईकडे, गटशिक्षणाधिकारी (पंचायत समिती, खेड)..........मोरोशी जिल्हा परिषद शाळेत जूनपासून एकच शिक्षक असल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. एक शिक्षक सात वर्ग कसा शिकवू शकतो? दोन दिवसांत शिक्षक उपलब्ध करून न दिल्यास आम्ही आमची मुले शाळेतून काढून सोईनुसार इतर शाळेत प्रवेश घेऊ.- महादेव खंडागळे,  पालक, मोरोशी

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणGovernmentसरकारTeacherशिक्षक