शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
2
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
3
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
4
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
5
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
6
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
7
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
8
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
9
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
10
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
11
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
12
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
13
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
14
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
15
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
16
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
17
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
18
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
19
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट

टंचाईच्या तीव्र झळा; १० दिवसांनी एकदा होतोय पाणीपुरवठा, भोर तालुक्यातील चिंताजनक परिस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 15:54 IST

भोर पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल करूनही टँकर मंजूर झाला नाही, सध्या खासगी टँकरने विकत पाणी घ्यावे लागते

भोर : करंदी खे. बा गावच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या विहिरीला पाणीच नसल्यामुळे तब्बल १० दिवसांनी एकदा पाणीपुरवठा केला जात आहे. भोर पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी प्रस्ताव दाखल केला आहे. मात्र, अद्याप टँकर मंजूर झालेला नाही सध्या खासगी टँकरने विकत पाणी घ्यावे लागत असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहे.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या करंदी खे.बा गावची लोकसंख्या १६९८ आहे. सन २०२०/२१ साली गावाशेजारी विहिर काढुन नळपाणी पुरवठा योजना झाली होती. मात्र, विहिराला पाणी कमी पडत गेले आणी दिवसेंदिवस लोकसंख्या वाढत गेली. सध्या विहिरीला पाणीच नसल्यामुळे तब्बल दहा दिवसांतून एकदाच पाणीपुरवठा होत आहे. शिवाय ओढे-नाले आटले असून, जनावरांनाही पाणी नाही. त्यामुळे नागरिकांचे पाण्या वाचून हाल सुरू आहेत. भोर पंचायत समितीकडे टँकरने पाणीपुरवठा करावा, म्हणून प्रस्ताव सादर केलेला आहे. मात्र, सदरचा प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे पाठवला जाणार, त्यानंतर स्थळ पाहणी करून टँकरला मंजुरी मिळणार, त्याला अजून किती दिवस जातील सांगता येत नाही. तोपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

दरम्यान जलजीवन मिशन योजनेतून सुमारे दोन कोटी रुपयांची नळ पाणीपुरवठा योजना मंजूर आहे. पुरंधर तालुक्यातील देवडी गावाजवळ असलेल्या एमआय टँकजवळ विहीर काढून पाइपलाइनने पाणीपुरवठा होणार आहे. त्याला पाटबंधारे विभागाने मंजुरी दिली आहे, मात्र सदर योजनेची विहीर ते टाकीदरम्यान पाइपलाइन वन विभागाच्या हद्दीतून जात असल्यामुळे सदरच्या योजनेचे काम थांबले आहे. ग्रामपंचायतीचा ना हरकत प्रमाणात घेऊन सदरचा प्रस्ताव वन विभागाला पाठवणार असल्याचे पंचायत समितीच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

वन विभागाकडून मंजुरी कधी मिळणार आणि काम पूर्ण होऊन गावात पाणी कधी येणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. गावात झालेल्या पूर्वीच्या नळपाणी पुरवठा योजनेला २५ वर्षे झाली असून, लोकसंख्या वाढली आहे. विहिरीला पाणी कमी पडल्यामुळे सध्या गावाला दहा दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे. यामुळे भोर पंचायत समितीकडे टँकर मागणीचा प्रस्ताव दिला आहे, मात्र शासनाचाही टँकर मंजूर झालेला नाही. त्यामुळे एका खासगी कंपनीचा टँकर घेऊन त्यात डिझेलचा आणि पाणी भरण्याचा खर्च स्वत: करत असून, दररोज दोन टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, हा पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने पंचायत समितीने टँकर सुरू करावा.  - नवनाथ गायकवाड, सरपंच करंदी खे.बा

करंदी खे. बा गावात पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई असून, भोर पंचायत समितीने त्वरीत टँकरने पाणीपुरवठा सुरू करावा. यंदा नेहमीपेक्षा जास्त उन्हाळा जाणवत आहे. त्यामुळे पाणी बचत करून पिण्यासाठी वापरण्यासाठी गरज आहे. नाही तर यावेळी दुष्काळ अधिक प्रमाणात असणार आहे. नागरिकांनी पाण्याची बचत करावी. भाटघर व निरादेवघर धरणातून खाली सोडलेले पाणी हे येथील नागरिकांना पिण्यासाठी राहील, अशा पद्धतीने सोडण्यात यावे. - अमोल पांगारे, सदस्य जिल्हा नियोजन समिती पुणे

 

टॅग्स :PuneपुणेriverनदीWaterपाणीDamधरणFarmerशेतकरीTemperatureतापमानMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार