शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

मुळशीतील आगीच्या दुर्घटनेतील सतरा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, आठ मृतदेहांवरती पुण्यात अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:37 IST

अजित पवारांच्या आश्वासनानंतर नातेवाईकांनी मृतदेह घेतले ताब्यात

ठळक मुद्देसर्व मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यत आमच्या कुटुंबियांचे मृतदेह आम्ही ताब्यात घेणार नाही. असे सांगत ससून येथे आंदोलन सुरू केले होते.

पिरंगुट: मुळशी तालुक्यात पिरंगुट उरवडे येथील एसव्हीएस कंपनी मध्ये झालेल्या आग दुर्घटमध्ये १७ नागरिक मृत्युमुखी पडले. त्यांचे मृतदेह नातेवाइकांनी ससून हॉस्पिटलमधून ताब्यात घेतले असून या सतरा पैकी आठ मृतदेहांवरती पुणे येथील वैकुंठ स्मशान भूमी मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आलेले आहेत. तर उर्वरित नऊ मृतदेह हे सोलापूर येथे तीन, अहमदनगर येथे दोन, उस्मानाबाद येथे एक, तुळजापूर येथे एक, संगमनेर येथे एक तर वैराग येथे एक हे त्या त्या गावातील त्यांचे नातेवाईक घेऊन गेले आहेत.

या सर्व प्रकरणांमध्ये अजित पवार यांनी मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना त्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्याने हे मृतदेह नातेवाईकांनी ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणामध्ये मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी विविध मागण्यासाठी ससून रुग्णालया बाहेर आंदोलन सुरू केले होते. परंतु या सर्व प्रकरणामधील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांच्या असणाऱ्या मुख्य चार मागण्यांवर पवार यांनी तातडीने आदेश काढण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे ससून रुग्णालयासमोर सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेत नातेवाईकांनी हे सर्व मृतदेह ताब्यात घेतले. 

या होत्या नातेवाईकांच्या मुख्य मागण्या

मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन प्रत्येक मृतांच्या कुटुंबातील वारसांना पंचवीस लाख रुपये मिळावेत. तसेच त्यांच्या मुलांची आजीवन शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारावी. प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबातील एका नातेवाईकास कायमस्वरुपी नोकरी मिळावी. कंपनीला कायद्याचे उल्लंघन करून ज्या अधिकाऱ्यांनी विविध परवानग्या दिल्या आहेत त्या सर्वांना या प्रकरणात सहआरोपी करावे. या मुख्य मागण्या केल्या होत्या

यावेळी अजित पवार म्हणाले , कंपनीने मृतांच्या नातेवाईकांना जाहीर केलेली पाच लाखांची मदत कमी आहे. कंपनी व्यवस्थापन,  जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि नातेवाईक यांची तातडीने बैठक घेऊन या विषयावर तोडगा काढावा.  व या आठवड्यामध्येच त्याचा अहवाल मला सादर करावा. या आदेशानंतर मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतले.

 

टॅग्स :PuneपुणेpirangutपिरंगुटfireआगPoliceपोलिसDeathमृत्यू