शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

केवळ जबाबदारी नको, पुरुषांच्या तक्रारींनाही न्याय द्यावा, सेव्ह इंडिया फॅमिली फाउंडेशनची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 09:30 IST

अपयशी विवाह, खोट्या तक्रारी आणि कायद्यांच्या दुरुपयोगामुळे अनेक पुरुष मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करत आहेत

पुणे: अलीकडेच अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारखी दुर्दैवी घटना घडली. या पार्श्वभूमीवर सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशनने संसदीय चौकशी समितीची स्थापना करण्यात यावी, न्यायिक प्रणालीत सुधारणा करावी, खोट्या खटल्यांवर कठोर कारवाई करणे, पुरुषांच्या आरोग्य आणि आर्थिक सुरक्षेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात अशा विविध मागण्या केल्या आहेत.

पुरुषांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यातून मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण होत असल्याने न्यायव्यवस्थेत सुधारणा आणि पुरुषांच्या हक्कांसाठी नागरिक आणि 'सेव्ह इंडियन फॅमिली फाउंडेशन'चे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत मागणी केली. कार्यकर्त्यांनी भारताचे सरन्यायाधीश आणि जिल्हा न्यायालयांचे प्रमुख न्यायाधीश यांना २५० हून अधिक पत्रे आणि फुलांचे संच पाठवले आहे. त्यामध्ये त्यांनी न्यायव्यवस्थेने निष्क्रियता संपवून सक्रियतेने काम करावे, अशी विनंती केली आहे. पुरुषांच्या समस्या यामध्ये कौटुंबिक वादांमध्ये भेडसावणाऱ्या अन्यायाकडे न्यायालयाने संवेदनशीलतेने पाहावे, अशीही मागणी करण्यात आली.

भारतीय समाजात पुरुषांना कुटुंबातील तणावपूर्ण घटनांमध्ये भेडसावणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो. अपयशी विवाह, खोट्या तक्रारी आणि कायद्यांच्या दुरुपयोगामुळे अनेक पुरुष मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रास सहन करतात. अलीकडे, अतुल सुभाष यांच्या आत्महत्येसारख्या घटना या समस्यांचे गांभीर्य अधोरेखित करते. त्यामुळे फाउंडेशनने न्यायव्यवस्थेत सुधारणा आणि पुरुषांच्या हक्कांसाठी काही महत्त्वपूर्ण मागण्या केल्या आहेत.

पुरुषांना केवळ जबाबदारीसाठी वापरण्याऐवजी त्यांना आयुष्यात पुढे जाण्याची संधी मिळायला हवी, तसेच न्यायव्यवस्थेने पुरुषांच्या बाजू समजून घेणे आवश्यक आहेत. केवळ त्यांना प्रत्येक गोष्टीत देषी ठरवणे चुकीचे आहे.- पांडुरंग कट्टी, सह-संस्थापक, एसआयएफएफ

टॅग्स :Puneपुणेmarriageलग्नWomenमहिलाCourtन्यायालयFamilyपरिवारHomeसुंदर गृहनियोजनEducationशिक्षण