शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
3
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
4
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
5
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
6
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
7
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
8
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
9
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
10
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
11
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
12
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
13
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
14
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
15
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
16
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
17
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
18
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
19
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
20
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार

पावसासाठी मिठाचा धूर अन् वरूणराजाची हजेरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2019 16:36 IST

बारामतीच्या जिरायती भागात गेल्यावर्षी बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला होता...

ठळक मुद्देमहिलांची केविलवाणी धडपड : रिमझिम पावसाचा शिडकावा

चंद्रकांत साळुंके काऱ्हाटी  : सततच्या दुष्काळामुळे बारामतीचा जिरायती भाग होरपळून निघाला आहे. पावसाळा संपत आला, तरी हा परिसर कोरडाच राहिला. घोटभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येथील जनतेवर आली आहे. आता तर पाऊस पाडण्यासाठी केविलवाणी धडपड देखील या भागात सुरू झाली आहे. काºहाटी येथील महिलांनी पाऊस पडावा म्हणून पालापाचोळ्याचा व मिठाचा धूर करीत वरूणराजाची याचना केली अन् काय ज्या भागात प्रयोग केला गेला, त्याठिकाणी ढग जमा झाले त्या ठिकाणी अचानक रिमझीम पावसाला देखील सुरुवात झाली.  बारामतीच्या जिरायती भागात गेल्यावर्षी बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग झाला होता. तशा दंतकथा इतिहासात प्रसिद्ध आहेत; मात्र या भागावर वरूणराजा कायम रुसलेला राहिला आहे.  सध्याच्या स्थितीत मराठवाडा परिसरात सध्या कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू आहे. मिठाच्या धुरामुळे पाऊस पडतो, असे येथील नागरिकांनी ऐकले होते.  दुष्काळाच्या दुष्टचक्रातून मुक्ती मिळावी अन् पाण्याची पायपीट थांबावी, यासाठी येथील महिलांनी एकत्र वरूणराजाला प्रसन्न करण्यासाठी   पालापाचोळा जाळून मिठाचा धूर करण्याचे ठरवले. जिरायती भागात पावसाळ्यामध्ये पाऊस नसल्यामुळे शेतातील कांदा, बाजरी, मका आदी पिके जळून चालली आहेत. यामुळे गणेशनगर येथील बचत गटातील फुलाबाई साळुंके, रुक्मिणी साळुंके, अलका साळुंके, साधना साळुंके, अर्चना साळुंके, शिल्पा साळुंके, विजया साळुंके, सुलोचना साळुंके, पूजा वाबळे, प्रिया साळुंके, राधिका साळुंके आदी महिलांनी एकत्र येऊन पावसासाठी परंपरागत प्रयोग करण्याचे ठरवले.  महिलांनी शेतातील काढलेले गवत, तसेच ओला पालापाचोळा मोठ्या प्रमाणात एकत्र केला व तो पालापाचोळा अवकाशात काळे ढग जमा झाल्यावर पेटवला. त्यात मिठाचा शिडकाव करण्यात आला. त्यामधून मोठ्या प्रमाणात निघालेला धूर उंच जाऊ लागला. वरूणराजानेही महिलांचा हा प्रयत्न बघत भरून येत या परिसरातील जळकेवाडी, भिलारवाडी परिसरात हलक्या स्वरूपात बरसला. काही वेळाने प्रयोग केलेल्या काºहाटी परिसरात देखील रिमझीम पावसाला सुरुवात झाली. हलक्या स्वरूपात का होईना पाऊस झाल्याने येथील नागरिक आनंदी होते. पाऊस-पाण्यासाठी करण्यात येणारा हा प्रयोग अगदी साधा सोपा आहे. पूर्वी लोक गावाबाहेर येत असे ढोल-लेझीमच्या आवाजामध्ये पावसाला आडवे जात; तसेच बासरी वाजून पाऊस पाडण्याचा प्रयोग देखील याच भागात केला गेला आहे. अशाच पद्धतीत मिठापासून धूर तयार करू मिठामध्ये असलेल्या सोडियम ढगांमध्ये गेल्यामुळे वाफेचे पाण्यात रूपांतर होते व पाणी जड असल्यामुळे पाऊस पडतो, अशी उदाहरणे आहेत असे माजी मुख्याध्यापक के. के. वाबळे यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसFarmerशेतकरीagricultureशेती