शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
2
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
3
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
4
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
5
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
6
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
7
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
8
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
9
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
10
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
11
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
12
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
13
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
14
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
15
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
16
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
17
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
18
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
19
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
20
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल

शेतमालाची मातीमोल भावात विक्री, बळीराजा मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

फ्लॉवर, कोबीला बाजारभाव नसल्याने मालाची काढणी करून बाजारात नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे त्यावर शेतातच रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर ...

फ्लॉवर, कोबीला बाजारभाव नसल्याने मालाची काढणी करून बाजारात नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे त्यावर शेतातच रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटो, वांगी, दोडका, मिरची, घेवडा, भेंडी, शेवगा यांचीही अवस्था अशीच बिकट आहे. बाजारभाव मिळत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी येथील उपबाजारात विक्रीसाठी नेलेला माल पुन्हा घरी घेऊन जाणे किंवा तेथेच सोडून देऊन रिकाम्या हाताने घरी परतताना शेतकरी दिसत आहेत. भाजीपाल्याचीही अशीच अवस्था आहे. कोथिंबीर, मेथी, कांदापात, पालक, शेपू , कढीपत्ता, आळू, चवळई, चुका, चाकवत अशा भाजीपाला वर्गातील कोणत्याच भाज्यांना बाजारभाव नाही. त्याचप्रमाणे फळांची ही अवस्थाही बिकट बनली आहे. परिसरात सध्या पेरू आणि सीताफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. दर वर्षी आठशे ते बाराशे रुपयांच्या आसपास पंचवीस किलोच्या पेरूच्या कॅरेटला बाजारभाव मिळत असे. तसेच किलोवर पन्नास ते साठ रुपये प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून १०० ते ३०० रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. कधीकधी विक्री होत नसल्याने परत नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. सीताफळाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. एक हजार ते पंधराशे रुपये क्रेटला मिळणारा भाव आता तीनशे ते पाचशे रुपयांच्या आसपास आहे. या पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालात फायदा सोडाच, परंतु मुद्दलही हाती येत नसल्याने गेले दोन वर्षांपासून बळीराजा आर्थिक तोटा सहन करून शेती करत आहे. या उलट मोठी डिझेल दरवाढ झाल्याने शेती मशागतीचे दर गगनाला भिडले आहेत. खते पन्नास किलोच्या पिशवीचे दर मात्र फक्त युरिया सारखी एकदोन खते सोडली तर एक हजार ते दीड हजार रुपयांच्या पुढे, भाजीपाला बियाणे शंभर रुपये किलोच्या आसपास, भेंडी बियाणे पाच ते सहा हजार रुपये किलो, शेणखत, कोंबडीखत यांचे दर अनुक्रमे सात हजार ते पंधरा हजार रुपये ट्रेलर जोडी भरीस भर म्हणून औषधांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली, तर शेती व्यवसाय संपुष्टात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना कुटुंबाचा खर्च चालवणे मुश्कील बनले आहे. घर चालवण्याबरोबरच घरातील लाईटबिल विहिरींवरील, बोअरवेलवरील लाईटबिल भरणे कठीण होऊन बसले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी थकीत आहेत प्रामाणिकपणाने भरण्याची इच्छा असूनही भरता येत नसल्याने लाईट कनेक्शन तुटत आहेत. फक्त शेती व्यवसायच असा आहे की नाशवंत माल असताना हमीभाव मिळत नाही. परिणामी संपूर्ण शेती व्यवसाय तोट्यात सुरू आहे. हा शेतकऱ्यांवर सर्वांत मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. मुला-मुलींची लग्न, शिक्षण, अचानक येणारे आजारपण, कुटुंबासाठी लागणारा दैनंदिन खर्च, दर महिन्याला लागणारा गॅस सिलिंडर, लाईटबिल इत्यादी खर्च भागवायची कसा? या आर्थिक विवंचनेत शेतकरी सध्या आहेत. आणि त्याचबरोबर पुन्हा शेती उभी करण्यासाठी भांडवल आणावयाचे कोठून, तसेच काढलेले पीककर्ज भरावयाची कसे अशा एक ना अनेक चिंतानी बळीराजाला ग्रासले आहे. असे असताना कुटुंबातील एखादा मनुष्य आजारी पडला तर त्याचे बिल भरायचे कसे? कारण उत्पन्न नसल्याने शेतकऱी कुटुंबाचा आरोग्य विमा नसल्याची वस्तुस्थिती आहे.