शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शेतमालाची मातीमोल भावात विक्री, बळीराजा मेटाकुटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:14 IST

फ्लॉवर, कोबीला बाजारभाव नसल्याने मालाची काढणी करून बाजारात नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे त्यावर शेतातच रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर ...

फ्लॉवर, कोबीला बाजारभाव नसल्याने मालाची काढणी करून बाजारात नेण्याचा खर्च निघत नाही. त्यामुळे त्यावर शेतातच रोटाव्हेटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. टोमॅटो, वांगी, दोडका, मिरची, घेवडा, भेंडी, शेवगा यांचीही अवस्था अशीच बिकट आहे. बाजारभाव मिळत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी येथील उपबाजारात विक्रीसाठी नेलेला माल पुन्हा घरी घेऊन जाणे किंवा तेथेच सोडून देऊन रिकाम्या हाताने घरी परतताना शेतकरी दिसत आहेत. भाजीपाल्याचीही अशीच अवस्था आहे. कोथिंबीर, मेथी, कांदापात, पालक, शेपू , कढीपत्ता, आळू, चवळई, चुका, चाकवत अशा भाजीपाला वर्गातील कोणत्याच भाज्यांना बाजारभाव नाही. त्याचप्रमाणे फळांची ही अवस्थाही बिकट बनली आहे. परिसरात सध्या पेरू आणि सीताफळाचा हंगाम जोरात सुरू आहे. दर वर्षी आठशे ते बाराशे रुपयांच्या आसपास पंचवीस किलोच्या पेरूच्या कॅरेटला बाजारभाव मिळत असे. तसेच किलोवर पन्नास ते साठ रुपये प्रतवारीनुसार बाजारभाव मिळत होता. परंतु गेल्या दोन वर्षांपासून १०० ते ३०० रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. कधीकधी विक्री होत नसल्याने परत नेण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. सीताफळाची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. एक हजार ते पंधराशे रुपये क्रेटला मिळणारा भाव आता तीनशे ते पाचशे रुपयांच्या आसपास आहे. या पडलेल्या बाजारभावामुळे शेतकऱ्यांनी शेतीमध्ये दिवस-रात्र काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालात फायदा सोडाच, परंतु मुद्दलही हाती येत नसल्याने गेले दोन वर्षांपासून बळीराजा आर्थिक तोटा सहन करून शेती करत आहे. या उलट मोठी डिझेल दरवाढ झाल्याने शेती मशागतीचे दर गगनाला भिडले आहेत. खते पन्नास किलोच्या पिशवीचे दर मात्र फक्त युरिया सारखी एकदोन खते सोडली तर एक हजार ते दीड हजार रुपयांच्या पुढे, भाजीपाला बियाणे शंभर रुपये किलोच्या आसपास, भेंडी बियाणे पाच ते सहा हजार रुपये किलो, शेणखत, कोंबडीखत यांचे दर अनुक्रमे सात हजार ते पंधरा हजार रुपये ट्रेलर जोडी भरीस भर म्हणून औषधांच्या किमतीही गगनाला भिडल्या आहेत. अशीच परिस्थिती आणखी काही दिवस राहिली, तर शेती व्यवसाय संपुष्टात येण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकऱ्यांना कुटुंबाचा खर्च चालवणे मुश्कील बनले आहे. घर चालवण्याबरोबरच घरातील लाईटबिल विहिरींवरील, बोअरवेलवरील लाईटबिल भरणे कठीण होऊन बसले आहे. घरपट्टी, पाणीपट्टी थकीत आहेत प्रामाणिकपणाने भरण्याची इच्छा असूनही भरता येत नसल्याने लाईट कनेक्शन तुटत आहेत. फक्त शेती व्यवसायच असा आहे की नाशवंत माल असताना हमीभाव मिळत नाही. परिणामी संपूर्ण शेती व्यवसाय तोट्यात सुरू आहे. हा शेतकऱ्यांवर सर्वांत मोठा अन्याय असल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. मुला-मुलींची लग्न, शिक्षण, अचानक येणारे आजारपण, कुटुंबासाठी लागणारा दैनंदिन खर्च, दर महिन्याला लागणारा गॅस सिलिंडर, लाईटबिल इत्यादी खर्च भागवायची कसा? या आर्थिक विवंचनेत शेतकरी सध्या आहेत. आणि त्याचबरोबर पुन्हा शेती उभी करण्यासाठी भांडवल आणावयाचे कोठून, तसेच काढलेले पीककर्ज भरावयाची कसे अशा एक ना अनेक चिंतानी बळीराजाला ग्रासले आहे. असे असताना कुटुंबातील एखादा मनुष्य आजारी पडला तर त्याचे बिल भरायचे कसे? कारण उत्पन्न नसल्याने शेतकऱी कुटुंबाचा आरोग्य विमा नसल्याची वस्तुस्थिती आहे.