शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

गल्लीबोळांमध्ये महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर

By admin | Updated: April 30, 2017 05:15 IST

वेळ रात्री १०.३०ची... नळस्टॉपच्या बँक आॅफ इंडियाच्या गल्लीमध्ये एक तरुणी तोंडाला रूमाल लावून चालली होती... अचानक एक मुलगा बाईकवर आला आणि मागे बस म्हणू लागला...

- नम्रता फडणीस,  पुणे

वेळ रात्री १०.३०ची... नळस्टॉपच्या बँक आॅफ इंडियाच्या गल्लीमध्ये एक तरुणी तोंडाला रूमाल लावून चालली होती... अचानक एक मुलगा बाईकवर आला आणि मागे बस म्हणू लागला... कोण आहे हा, असं काय बोलतोय... मुलगी प्रचंड घाबरलेली होती... तिचा हात पकडून तो गाडीवर बसण्याचा आग्रह करीत होता... तो ऐकत नाही म्हटल्यावर ती मुलगी त्याच्या हाताला चावली... तिच्या हाताला ओरखडून तो पसार झाला... त्याच घाबरलेल्या अवस्थेत ती पळत सुटली आणि बसस्टॉप गाठून घरी पोहोचली... या अनपेक्षित प्रसंगाचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता... हा अनुभवकथन करताना देखील तिच्या डोळ्यांत भीती जाणवत होती. गल्ल्यांमधून जाताना असभ्य वर्तन करणे, मुलींवर जबरदस्ती करणे असे प्रकार पुरुषांकडून होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामधून शहरातल्या गल्ल्यांमधील महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरच असल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये असे अनेक गल्लीबोळ आहेत, ज्याकडे कुणाचेच लक्ष नसते, अगदी पोलिसांचेदेखील! रात्री आठ वाजता अनेक क्लास सुटतात. मुलींना बसस्टॉपपर्यंत एकटे जावे लागते. जिथे रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे पुरुषांना दबा धरून बसण्यासाठी मोक्याच्या जागा मिळतात. एक जरी मुलगी तिथून रात्रीच्या वेळी गेली तर त्यांना आयतेच सावज सापडते. तिचा पाठलाग करणे, विनयभंग करणे, अश्लील वर्तन करणे असे प्रकार घडत आहेत. एकतर्फी प्रेमातून आमदाराच्या मुलीवर झालेला हल्ला ताजा असतानाच यांसारख्या अनेक प्रकारांमुळे दिवसागणिक महिलांच्या असुरक्षिततेमध्ये अधिकच भर पडत आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर किंवा कारमध्ये असे काही प्रसंग घडले तर पोलिसांना तत्काळ सूचित करण्यासाठी ‘प्रतिसाद’ अ‍ॅपपासून आयटी कंपनीमधील महिलांसाठी बडी कॉप सारखी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु जेव्हा असे अनपेक्षित प्रसंग ओढवतात तेव्हा मुली आधीच खूप घाबरलेल्या असतात, त्यामधून त्या सावरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना या यंत्रणेचा वापर करणे पटकन सुचत नाही. त्यामुळे अशा घटनांमध्ये केवळ याच उपायांवर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही. आज शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर गस्त घातली जाते पण मध्यवस्तीतील गल्लीबोळांचे काय? त्या भागांमध्येही रात्री दहानंतर गस्त घालण्याची गरज आहे. पोलिसांकडून ती घातली जात असल्याचा दावा केला जात असला तरी मात्र ती घातली जात नसल्याचे मुलींच्या अनुभवावरून दिसून आले आहे. गल्लीबोळांमधून जाणे फारसे सुरक्षित वाटत नाही, कारण कोण कुठे दबा धरून बसले असेल हे सांगता येत नाही. मैत्रिणी बरोबर असतात तेव्हा आधार असल्यासारखा वाटतो, पण एकटीला गल्लीबोळांमधून जायला भीती वाटते. बऱ्याच वेळा लाईटही नसतात, त्यामुळे दबकत दबकतच जावे लागते.- तरुणीगल्लीबोळांमध्येच नव्हे तर बसस्टॉपवर एकट्या मुलीला उभे राहायचे म्हणजे टेन्शन येते. सकाळी ९.३0ची वेळ होती. परीक्षेला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होते. बस ज्या बाजूने येणार आहे त्याच बाजूला एक माणूस बसला होता, तेव्हा लक्ष गेले तर तो माणूस पँटची चेन ओपन करून अश्लील कृती करीत होता. खूपच भीती वाटली आणि मी तिथून उठून दुसऱ्या बाजूला उभे राहिले.- तरुणीपोलिसांकडून महिलांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. यासाठी दामिनी पथक, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले पुरुषांचे बीट मार्शल आणि पोलिसांच्या गाड्या या माध्यमातून रात्रीच्या वेळेसही गस्त घातली जाते. महिलांसाठी प्रतिसाद अ‍ॅप आणि हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना काहीअंशी आळा बसला आहे. - पी. आर. पाटील, पोलीस उपायुक्त