शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

गल्लीबोळांमध्ये महिलांची सुरक्षितता वाऱ्यावर

By admin | Updated: April 30, 2017 05:15 IST

वेळ रात्री १०.३०ची... नळस्टॉपच्या बँक आॅफ इंडियाच्या गल्लीमध्ये एक तरुणी तोंडाला रूमाल लावून चालली होती... अचानक एक मुलगा बाईकवर आला आणि मागे बस म्हणू लागला...

- नम्रता फडणीस,  पुणे

वेळ रात्री १०.३०ची... नळस्टॉपच्या बँक आॅफ इंडियाच्या गल्लीमध्ये एक तरुणी तोंडाला रूमाल लावून चालली होती... अचानक एक मुलगा बाईकवर आला आणि मागे बस म्हणू लागला... कोण आहे हा, असं काय बोलतोय... मुलगी प्रचंड घाबरलेली होती... तिचा हात पकडून तो गाडीवर बसण्याचा आग्रह करीत होता... तो ऐकत नाही म्हटल्यावर ती मुलगी त्याच्या हाताला चावली... तिच्या हाताला ओरखडून तो पसार झाला... त्याच घाबरलेल्या अवस्थेत ती पळत सुटली आणि बसस्टॉप गाठून घरी पोहोचली... या अनपेक्षित प्रसंगाचा तिला प्रचंड मानसिक धक्का बसला होता... हा अनुभवकथन करताना देखील तिच्या डोळ्यांत भीती जाणवत होती. गल्ल्यांमधून जाताना असभ्य वर्तन करणे, मुलींवर जबरदस्ती करणे असे प्रकार पुरुषांकडून होत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. यामधून शहरातल्या गल्ल्यांमधील महिलांची सुरक्षितता वाऱ्यावरच असल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध भागांमध्ये असे अनेक गल्लीबोळ आहेत, ज्याकडे कुणाचेच लक्ष नसते, अगदी पोलिसांचेदेखील! रात्री आठ वाजता अनेक क्लास सुटतात. मुलींना बसस्टॉपपर्यंत एकटे जावे लागते. जिथे रात्रीच्या वेळी लाईट नसल्यामुळे पुरुषांना दबा धरून बसण्यासाठी मोक्याच्या जागा मिळतात. एक जरी मुलगी तिथून रात्रीच्या वेळी गेली तर त्यांना आयतेच सावज सापडते. तिचा पाठलाग करणे, विनयभंग करणे, अश्लील वर्तन करणे असे प्रकार घडत आहेत. एकतर्फी प्रेमातून आमदाराच्या मुलीवर झालेला हल्ला ताजा असतानाच यांसारख्या अनेक प्रकारांमुळे दिवसागणिक महिलांच्या असुरक्षिततेमध्ये अधिकच भर पडत आहे. महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाकडून विविध स्तरावर उपाययोजना केल्या जात आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर किंवा कारमध्ये असे काही प्रसंग घडले तर पोलिसांना तत्काळ सूचित करण्यासाठी ‘प्रतिसाद’ अ‍ॅपपासून आयटी कंपनीमधील महिलांसाठी बडी कॉप सारखी यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु जेव्हा असे अनपेक्षित प्रसंग ओढवतात तेव्हा मुली आधीच खूप घाबरलेल्या असतात, त्यामधून त्या सावरू शकत नाहीत. अशा परिस्थितीत त्यांना या यंत्रणेचा वापर करणे पटकन सुचत नाही. त्यामुळे अशा घटनांमध्ये केवळ याच उपायांवर अवलंबून राहणे उपयोगाचे नाही. आज शहरांमधील प्रमुख रस्त्यांवर गस्त घातली जाते पण मध्यवस्तीतील गल्लीबोळांचे काय? त्या भागांमध्येही रात्री दहानंतर गस्त घालण्याची गरज आहे. पोलिसांकडून ती घातली जात असल्याचा दावा केला जात असला तरी मात्र ती घातली जात नसल्याचे मुलींच्या अनुभवावरून दिसून आले आहे. गल्लीबोळांमधून जाणे फारसे सुरक्षित वाटत नाही, कारण कोण कुठे दबा धरून बसले असेल हे सांगता येत नाही. मैत्रिणी बरोबर असतात तेव्हा आधार असल्यासारखा वाटतो, पण एकटीला गल्लीबोळांमधून जायला भीती वाटते. बऱ्याच वेळा लाईटही नसतात, त्यामुळे दबकत दबकतच जावे लागते.- तरुणीगल्लीबोळांमध्येच नव्हे तर बसस्टॉपवर एकट्या मुलीला उभे राहायचे म्हणजे टेन्शन येते. सकाळी ९.३0ची वेळ होती. परीक्षेला जाण्यासाठी बसस्टॉपवर उभी होते. बस ज्या बाजूने येणार आहे त्याच बाजूला एक माणूस बसला होता, तेव्हा लक्ष गेले तर तो माणूस पँटची चेन ओपन करून अश्लील कृती करीत होता. खूपच भीती वाटली आणि मी तिथून उठून दुसऱ्या बाजूला उभे राहिले.- तरुणीपोलिसांकडून महिलांच्या सुरक्षिततेला नेहमीच प्राधान्य दिले जाते. यासाठी दामिनी पथक, प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये कार्यान्वित करण्यात आलेले पुरुषांचे बीट मार्शल आणि पोलिसांच्या गाड्या या माध्यमातून रात्रीच्या वेळेसही गस्त घातली जाते. महिलांसाठी प्रतिसाद अ‍ॅप आणि हेल्पलाईनही सुरू करण्यात आली आहे, त्यामुळे महिलांवरील अत्याचाराच्या घटनांना काहीअंशी आळा बसला आहे. - पी. आर. पाटील, पोलीस उपायुक्त