शहरं
Join us  
Trending Stories
1
बँक चौकात रात्रीतून उभा केला सावित्रीबाई फुलेंचा पुतळा; जयंतीच्या पूर्वसंध्येलाच रंगले नाट्य!
2
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
3
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
4
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
5
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
6
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
7
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
8
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
9
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
10
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
11
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
12
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
13
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
14
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
15
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
16
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
17
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
18
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
19
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
20
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

नवले पूल परिसरात आरटीओने घेतले ‘झोपेचे सोंग’; ‘फिटनेस’ आणि ‘ओव्हरलोड’ तपासणी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:09 IST

सर्व यंत्रणा एकमेकांवर ढकलत राहतील आणि आरटीओसारखे विभाग निवांत राहतील; पण पुणेकर मात्र या रस्त्यावर केवळ मृत्यूच्या भीतीने प्रवास करत राहतील

धायरी : पुणे-बंगळुरु महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरू असताना, प्रत्येक शासकीय विभाग दुसऱ्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळात एका यंत्रणेचा घोर आणि अक्षम्य निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे, तो म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय.

जीवित आणि वित्तहानी होत असतानाही आरटीओ विभाग जणू काही ही समस्या आपली नाही, अशा आविर्भावात ‘निवांत’ असल्याचे धक्कादायक चित्र आहे. या महामार्गावरील अपघातांचे मूळ कारण असलेल्या नादुरुस्त आणि ओव्हरलोडेड वाहनांवर कारवाई करण्याची ज्याची मुख्य जबाबदारी आहे, तो विभाग मात्र मैदानातून पूर्णपणे गायब झाला आहे. नवले पुलाकडे येणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी करण्यासाठी खेड-शिवापूर टोलनाका किंवा नवीन कात्रज बोगद्याच्या परिसरातील प्रवेशमार्ग ही अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर ‘आरटीओ’च्या वतीने तपासणी नाका उभारणे अत्यावश्यक आहे.

मात्र, या महत्त्वाच्या ठिकाणी आरटीओचे तपासणी पथक शोधूनही सापडत नाही. त्यामुळे ब्रेक निकामी झालेले, फिटनेस नसलेले आणि क्षमतेपेक्षा अनेक पटींनी ओव्हरलोड केलेले हेवी लोडेड ट्रक बिनधास्तपणे तीव्र उतारावर प्रवेश करतात आणि अपघातांचे ‘यमदूत’ बनतात.

केवळ ‘परमिट’ आणि ‘पेनल्टी’साठी?

नवले पुलावरील अपघातांचे मुख्य कारण वाहनांचा फिटनेस नसणे आणि अतिभार हे असताना, आरटीओ अधिकारी डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का? या वाहनांची तपासणी केल्यास अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीला तत्काळ आळा बसेल आणि अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल; पण आरटीओ विभाग ही साधी आणि प्रभावी उपाययोजना का करत नाही? त्यांना केवळ कागदोपत्री दंड आकारण्यात रस आहे की, रस्त्यावर प्रत्यक्ष काम करून जीव वाचवण्यात?

जनतेचा सवाल; आरटीओ आपली जबाबदारी कधी स्वीकारणार?

एका बाजूला प्रशासन वेगमर्यादा ३० किमी करण्याची घोषणा करत आहे आणि दंड आकारण्याची तयारी करत आहे; पण अपघाताचे मूळ कारण असलेल्या नादुरुस्त वाहनांना रस्त्यावर सोडण्याची जबाबदारी कोणाची? नवले पुलावर निर्दोष नागरिकांचा रक्तपात थांबवण्यासाठी आरटीओ विभागाला आणखी किती मोठ्या अपघाताची वाट पाहायची आहे? आरटीओने त्वरित आपली ‘आरामशीर’ भूमिका सोडून, खेड-शिवापूर आणि बोगद्याच्या परिसरात तातडीने तपासणी केंद्रे उभी करावीत आणि ओव्हरलोडेड वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्यास कायमस्वरूपी मनाई करावी! अन्यथा, सर्व यंत्रणा एकमेकांवर ढकलत राहतील आणि आरटीओसारखे विभाग निवांत राहतील; पण पुणेकर मात्र या रस्त्यावर केवळ मृत्यूच्या भीतीने प्रवास करत राहतील!

 

English
हिंदी सारांश
Web Title : RTO Negligence at Navale Bridge: Ignoring Fitness and Overload Checks

Web Summary : Accidents plague Navale Bridge, Pune. The RTO is criticized for neglecting its duty to check unfit, overloaded vehicles entering the area. Checkpoints at key entry points are missing, endangering commuters. Citizens demand immediate action to prevent further tragedies.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDhayariधायरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस