शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ 
2
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद
3
मुळशी पॅटर्न फेम 'पिट्या भाई' भाजपात जाणार? राज ठाकरेंनी सुनावल्यानंतर पुन्हा केली फेसबुक पोस्ट, म्हणाले...
4
Travel : भारताचे १०००० रुपये 'या' देशात जाऊन होतील २५ लाख! ४ दिवसांच्या ट्रिपसाठी बेस्ट आहे ऑप्शन
5
झटक्यात ₹3900 रुपयांनी आपटलं सोनं! चांदीही झाली स्वस्त; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
6
"हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर
7
लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... 
8
"शिंदे आणि अजित पवार यांच्या बाजूला बसून त्यांच्याच विरोधात ऑपरेशन कमळ..."; भाजपने डिवचताच काँग्रेसने काढली खपली
9
Tej Pratap Yadav : "आई-वडिलांचा मानसिक छळ...", तेज प्रताप यादव यांनी मोदी, शाह यांच्याकडे मागितली मदत
10
"एक बाटली रक्तावर ज्यांचे रक्त सुखते तेच उपदेश...", रोहिणी आचार्य यांनी तेजस्वी यादव यांच्यावर साधला निशाणा
11
"हो, एकनाथ शिंदेंसह CM फडणवीसांना भेटलो आणि आता निर्णय झालाय"; सरनाईकांनी सांगितलं नाराजी प्रकरणी काय घडलं?
12
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण
13
"मंत्र्यांच्या नाराजीसंदर्भात मला जाणवलंही नाही...!", शिवसेना मंत्र्यांच्या नाराजीनाट्यावर काय म्हणाले अजित दादा
14
'वापरा आणि फेकून द्या' हीच मंत्री मुश्रीफ यांची नीती, संजय मंडलिक यांची हसन मुश्रीफ यांच्यावर टीका
15
...तर युती बराचवेळ टीकेल', हसन मुश्रीफ अन् समरजित घाटगे एकत्र आले, नेमकं काय घडलं सगळंच सांगितलं
16
बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर...
17
BCCI नं टीम इंडियाची बांगलादेशविरुद्धची द्विपक्षीय मालिका केली स्थगित; कारण...
18
"एआय जे काही सांगतेय, त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका"; गुगलचे सीईओ सुंदर पिचाईंचा इशारा
19
चार लग्न, खात्यातून ८ कोटींचा व्यवहार, डॉक्टर अन् पोलिसांनाही अडकवलं; कानपुरची 'लुटारू वधू' अशी सापडली
Daily Top 2Weekly Top 5

नवले पूल परिसरात आरटीओने घेतले ‘झोपेचे सोंग’; ‘फिटनेस’ आणि ‘ओव्हरलोड’ तपासणी नाहीच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:09 IST

सर्व यंत्रणा एकमेकांवर ढकलत राहतील आणि आरटीओसारखे विभाग निवांत राहतील; पण पुणेकर मात्र या रस्त्यावर केवळ मृत्यूच्या भीतीने प्रवास करत राहतील

धायरी : पुणे-बंगळुरु महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरू असताना, प्रत्येक शासकीय विभाग दुसऱ्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळात एका यंत्रणेचा घोर आणि अक्षम्य निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे, तो म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय.

जीवित आणि वित्तहानी होत असतानाही आरटीओ विभाग जणू काही ही समस्या आपली नाही, अशा आविर्भावात ‘निवांत’ असल्याचे धक्कादायक चित्र आहे. या महामार्गावरील अपघातांचे मूळ कारण असलेल्या नादुरुस्त आणि ओव्हरलोडेड वाहनांवर कारवाई करण्याची ज्याची मुख्य जबाबदारी आहे, तो विभाग मात्र मैदानातून पूर्णपणे गायब झाला आहे. नवले पुलाकडे येणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी करण्यासाठी खेड-शिवापूर टोलनाका किंवा नवीन कात्रज बोगद्याच्या परिसरातील प्रवेशमार्ग ही अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर ‘आरटीओ’च्या वतीने तपासणी नाका उभारणे अत्यावश्यक आहे.

मात्र, या महत्त्वाच्या ठिकाणी आरटीओचे तपासणी पथक शोधूनही सापडत नाही. त्यामुळे ब्रेक निकामी झालेले, फिटनेस नसलेले आणि क्षमतेपेक्षा अनेक पटींनी ओव्हरलोड केलेले हेवी लोडेड ट्रक बिनधास्तपणे तीव्र उतारावर प्रवेश करतात आणि अपघातांचे ‘यमदूत’ बनतात.

केवळ ‘परमिट’ आणि ‘पेनल्टी’साठी?

नवले पुलावरील अपघातांचे मुख्य कारण वाहनांचा फिटनेस नसणे आणि अतिभार हे असताना, आरटीओ अधिकारी डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का? या वाहनांची तपासणी केल्यास अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीला तत्काळ आळा बसेल आणि अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल; पण आरटीओ विभाग ही साधी आणि प्रभावी उपाययोजना का करत नाही? त्यांना केवळ कागदोपत्री दंड आकारण्यात रस आहे की, रस्त्यावर प्रत्यक्ष काम करून जीव वाचवण्यात?

जनतेचा सवाल; आरटीओ आपली जबाबदारी कधी स्वीकारणार?

एका बाजूला प्रशासन वेगमर्यादा ३० किमी करण्याची घोषणा करत आहे आणि दंड आकारण्याची तयारी करत आहे; पण अपघाताचे मूळ कारण असलेल्या नादुरुस्त वाहनांना रस्त्यावर सोडण्याची जबाबदारी कोणाची? नवले पुलावर निर्दोष नागरिकांचा रक्तपात थांबवण्यासाठी आरटीओ विभागाला आणखी किती मोठ्या अपघाताची वाट पाहायची आहे? आरटीओने त्वरित आपली ‘आरामशीर’ भूमिका सोडून, खेड-शिवापूर आणि बोगद्याच्या परिसरात तातडीने तपासणी केंद्रे उभी करावीत आणि ओव्हरलोडेड वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्यास कायमस्वरूपी मनाई करावी! अन्यथा, सर्व यंत्रणा एकमेकांवर ढकलत राहतील आणि आरटीओसारखे विभाग निवांत राहतील; पण पुणेकर मात्र या रस्त्यावर केवळ मृत्यूच्या भीतीने प्रवास करत राहतील!

 

English
हिंदी सारांश
Web Title : RTO Negligence at Navale Bridge: Ignoring Fitness and Overload Checks

Web Summary : Accidents plague Navale Bridge, Pune. The RTO is criticized for neglecting its duty to check unfit, overloaded vehicles entering the area. Checkpoints at key entry points are missing, endangering commuters. Citizens demand immediate action to prevent further tragedies.
टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDhayariधायरीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारPoliceपोलिसRto officeआरटीओ ऑफीस