शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे काय होणार? आज ‘सर्वोच्च’ फैसला
2
आजचे राशीभविष्य, २८ नोव्हेंबर २०२५: संयम राखा आणि विचारपूर्वक व्यवहार करा!
3
२ मोठे नेते, २ दावे...राज्यात २ डिसेंबरनंतर राजकीय भूकंप?; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क सुरू
4
पहाटे ५ वाजता शिंदेसेनेच्या आमदाराच्या घरी १०० पोलिसांची धाड; घराची झाडाझडती, भाजपावर आरोप
5
महाराष्ट्रासह १० राज्यांतील मेडिकल कॉलेजांवर ईडीचे छापे; ३६ जणांवर गुन्हा दाखल, काय आहे प्रकरण?
6
राज-उद्धव ठाकरे भेट, ‘शिवतीर्थ’वर बंद दाराआड २ तास चर्चा; एकजुटीने महायुतीला थोपवण्याचा निर्णय?
7
इमारतींच्या छतांवर आणि महामार्गावर आता ‘नो होर्डिंग्ज; मुंबई महापालिकेचे जाहिरात धोरण जाहीर
8
दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी हायकोर्टाचा पोलिसांना सवाल; "मृत्यूला ५ वर्ष झाली, आणखी किती..."
9
सिंधुदुर्गनंतर बदलापूरात पैसे वाटताना रंगेहाथ पकडले; महायुतीत शिंदेसेना-अजित पवार गटात जुंपली
10
श्रेयवाद, आरोप प्रत्यारोप अन् ‘अरे’ला ‘कारे’ने उत्तर; सत्ताधारी भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष वाढला
11
खराब हवेचे खापर इथिओपियातील ज्वालामुखीवर फोडू नका; प्रदूषणावरून हायकोर्टाने सरकारला सुनावले
12
गर्जेच्या शरीरावरही जखमा, संवादाचे रेकॉर्डिंग पोलिसांकडे; दाेन डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी 
13
ठाण्याची झणझणीत मिसळ की पुण्याचे श्रीखंड; शंभराव्या मराठी साहित्य संमेलनासाठी रस्सीखेच?
14
१०० वर्षांनी पंचग्रही योग, २०२६ला ७ राशींची मनासारखी कमाई; पद-पैसा-प्रतिष्ठा, शुभ-लाभ भरभराट!
15
ट्रेनमध्ये प्रवास करताना नेटवर्क का जाते? इंटरनेट का होते स्लो? जाणून घ्या 'या' समस्येवरचा उपाय
16
एकपेक्षा जास्त लग्न करणे गुन्हा...'या' राज्यात विधेयक मंजूर; दंडासह कठोर शिक्षेची तरतूद
17
ॲपल अडकली? भारतात ₹३.२० लाख कोटी दंडाची टांगती तलवार; कायदा बदलला अन्...
18
३०० सीट वाढणार, ४ कोच कायमस्वरुपी जोडले जाणार; वंदे भारत ट्रेनला प्रवाशांचा प्रचंड प्रतिसाद
19
मन हेलावून टाकणारी घटना...! पती, पत्‍नी, प्रियकर अन् एक अजब करार...! सर्वत्र होतेय चर्चा 
20
टाटा सिएरा खरेच ₹११.४९ लाखांना मिळणार? नेक्सॉन, हॅरिअरलाच खाऊन टाकणार..., हो, नाही...
Daily Top 2Weekly Top 5

समाजवाद धर्मनिरपेक्षतेवरचा संघाचा आरोप म्हणजे कृतघ्नताच; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:55 IST

- देशाची सामाजिक वीण विस्कटणारे तत्त्वज्ञान सोडण्याचा सल्ला

पुणे : राज्यघटनेतील समाजवाद व धर्मनिरपेक्षता या शब्दांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरकत घेणे म्हणजे देशाची हजारो वर्षांची सामाजिक वीण विस्कटून टाकणेच आहे, अशी टीका काँग्रेसने केली. देशाला धर्मांधतेचा दावणीला बांधणारे हे छुपे विचार सोडा किंवा ते उघडपणे देशवासीयांसमोर आणून त्यांना सामाेरे जा असा सल्लाही काँग्रेसने दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी राज्यघटनेतील या दोन शब्दांवर हरकत घेतली होती व ते राज्यघटनेत नंतर टाकण्यात आले, त्याचा विचार व्हायला हवा असे मत व्यक्त केले होते. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी यावर बोलताना सांगितले की काँग्रेसच्या व्यासपीठावर याबाबत चर्चा झाली. हा संघाचा कृतघ्नपणा असल्याचेच मत बहुसंख्य नेत्यांनी व्यक्त केले. संघाची विचारसरणी देशात सत्तेवर आली ती देशातील विविध धर्मियांची मते घेऊनच आली आहे. असे असताना देश एका विशिष्ट धर्माचा असल्याचे बोलणे म्हणजे देशातील हिंदू सोडून अन्य धर्मियांबाबत कृतघ्नता दाखवणेच आहे. किंवा मग या संकुचित विचारसरणीतून आलेले न्यूनगंडही त्यामागे असू शकतो.या आधीही देशात काँग्रेसेतर सरकारे आली आहेत, मात्र त्यांच्याकडून कधीही या दोन शब्दांवर हरकत घेतली गेली नाही किंवा ते काढण्याची मागणीही झाली नाही. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत सुस्पष्ट शब्दांमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. तरीही वारंवार या दोन शब्दांबाबत भाष्य करून संघ परिवार विनाकारण देशात सामाजिक, धार्मिक तणाव निर्माण करत आहे, धार्मिक ध्रुवीकरण करून मते मिळवण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आता भारतीय जनतेच्या चांगलेच लक्षात येत चालले आहे, अशी टीका तिवारी यांनी केली. असे करण्यापेक्षा संघाने व त्यांची विचारसरणी मानणाऱ्या केंद्र सरकारने संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, शेतकरी व उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असे सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेस