शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

समाजवाद धर्मनिरपेक्षतेवरचा संघाचा आरोप म्हणजे कृतघ्नताच; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:55 IST

- देशाची सामाजिक वीण विस्कटणारे तत्त्वज्ञान सोडण्याचा सल्ला

पुणे : राज्यघटनेतील समाजवाद व धर्मनिरपेक्षता या शब्दांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरकत घेणे म्हणजे देशाची हजारो वर्षांची सामाजिक वीण विस्कटून टाकणेच आहे, अशी टीका काँग्रेसने केली. देशाला धर्मांधतेचा दावणीला बांधणारे हे छुपे विचार सोडा किंवा ते उघडपणे देशवासीयांसमोर आणून त्यांना सामाेरे जा असा सल्लाही काँग्रेसने दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी राज्यघटनेतील या दोन शब्दांवर हरकत घेतली होती व ते राज्यघटनेत नंतर टाकण्यात आले, त्याचा विचार व्हायला हवा असे मत व्यक्त केले होते. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी यावर बोलताना सांगितले की काँग्रेसच्या व्यासपीठावर याबाबत चर्चा झाली. हा संघाचा कृतघ्नपणा असल्याचेच मत बहुसंख्य नेत्यांनी व्यक्त केले. संघाची विचारसरणी देशात सत्तेवर आली ती देशातील विविध धर्मियांची मते घेऊनच आली आहे. असे असताना देश एका विशिष्ट धर्माचा असल्याचे बोलणे म्हणजे देशातील हिंदू सोडून अन्य धर्मियांबाबत कृतघ्नता दाखवणेच आहे. किंवा मग या संकुचित विचारसरणीतून आलेले न्यूनगंडही त्यामागे असू शकतो.या आधीही देशात काँग्रेसेतर सरकारे आली आहेत, मात्र त्यांच्याकडून कधीही या दोन शब्दांवर हरकत घेतली गेली नाही किंवा ते काढण्याची मागणीही झाली नाही. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत सुस्पष्ट शब्दांमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. तरीही वारंवार या दोन शब्दांबाबत भाष्य करून संघ परिवार विनाकारण देशात सामाजिक, धार्मिक तणाव निर्माण करत आहे, धार्मिक ध्रुवीकरण करून मते मिळवण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आता भारतीय जनतेच्या चांगलेच लक्षात येत चालले आहे, अशी टीका तिवारी यांनी केली. असे करण्यापेक्षा संघाने व त्यांची विचारसरणी मानणाऱ्या केंद्र सरकारने संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, शेतकरी व उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असे सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेस