शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
2
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
3
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
4
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
5
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
6
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
7
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
8
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
9
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
10
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
11
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
12
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
13
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?
14
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी 'रेड अलर्ट'! 'ही' आहेत ३ मोठी कारणे; घसरणीतही 'या' शेअर्सने मारली बाजी
15
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर शिवलिंग का आहे? अनेकांना माहीत नाही कारण!
16
"डच्चू दिला, अहंकार, चॅनेलने बाहेर काढलं...", राशीचक्रकार शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेनं सोडलं मौन, म्हणाला...
17
दोन भाऊ का एकत्र येऊ शकत नाहीत? महेश मांजरेकर म्हणाले, "आपल्याकडे महाभारतापासून..."
18
इंग्लंडच्या बालेकिल्ल्यात जड्डूची 'तलवारबाजी'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय
19
"मराठी विरुद्ध कितीही मोर्चे काढा, आमचं..."; मनसे विरोधात आंदोलन करणाऱ्यांना राजू पाटलांचा इशारा
20
Himachal Flood : हिमाचलमध्ये मुसळधार पावसामुळे विध्वंस! ६३ जणांचा मृत्यू, १०९ जखमी; ४०७ कोटींचं नुकसान

समाजवाद धर्मनिरपेक्षतेवरचा संघाचा आरोप म्हणजे कृतघ्नताच; काँग्रेसची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 17:55 IST

- देशाची सामाजिक वीण विस्कटणारे तत्त्वज्ञान सोडण्याचा सल्ला

पुणे : राज्यघटनेतील समाजवाद व धर्मनिरपेक्षता या शब्दांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे हरकत घेणे म्हणजे देशाची हजारो वर्षांची सामाजिक वीण विस्कटून टाकणेच आहे, अशी टीका काँग्रेसने केली. देशाला धर्मांधतेचा दावणीला बांधणारे हे छुपे विचार सोडा किंवा ते उघडपणे देशवासीयांसमोर आणून त्यांना सामाेरे जा असा सल्लाही काँग्रेसने दिला.राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी राज्यघटनेतील या दोन शब्दांवर हरकत घेतली होती व ते राज्यघटनेत नंतर टाकण्यात आले, त्याचा विचार व्हायला हवा असे मत व्यक्त केले होते. काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी यावर बोलताना सांगितले की काँग्रेसच्या व्यासपीठावर याबाबत चर्चा झाली. हा संघाचा कृतघ्नपणा असल्याचेच मत बहुसंख्य नेत्यांनी व्यक्त केले. संघाची विचारसरणी देशात सत्तेवर आली ती देशातील विविध धर्मियांची मते घेऊनच आली आहे. असे असताना देश एका विशिष्ट धर्माचा असल्याचे बोलणे म्हणजे देशातील हिंदू सोडून अन्य धर्मियांबाबत कृतघ्नता दाखवणेच आहे. किंवा मग या संकुचित विचारसरणीतून आलेले न्यूनगंडही त्यामागे असू शकतो.या आधीही देशात काँग्रेसेतर सरकारे आली आहेत, मात्र त्यांच्याकडून कधीही या दोन शब्दांवर हरकत घेतली गेली नाही किंवा ते काढण्याची मागणीही झाली नाही. सर्वोच्च न्यायालयानेच याबाबत सुस्पष्ट शब्दांमध्ये आपले मत व्यक्त केले आहे. तरीही वारंवार या दोन शब्दांबाबत भाष्य करून संघ परिवार विनाकारण देशात सामाजिक, धार्मिक तणाव निर्माण करत आहे, धार्मिक ध्रुवीकरण करून मते मिळवण्याचे त्यांचे धोरण असल्याचे आता भारतीय जनतेच्या चांगलेच लक्षात येत चालले आहे, अशी टीका तिवारी यांनी केली. असे करण्यापेक्षा संघाने व त्यांची विचारसरणी मानणाऱ्या केंद्र सरकारने संरक्षण, अंतर्गत सुरक्षा, वाढती बेरोजगारी, भ्रष्टाचार, महागाई, शेतकरी व उद्योजकांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असे सल्लाही त्यांनी दिला.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडcongressकाँग्रेस