शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम ग्राहकांना लुटणारी टोळी जेरबंद

By admin | Updated: August 14, 2015 03:20 IST

एटीएम ग्राहकांना लुटणारी पाच जणांची आंतरराज्यीय टोळी शिक्रापूर पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केली असून, त्यांच्याकडून एक लाख एक हजार रुपये व कार जप्त केली आहे़

कोरेगाव भीमा : एटीएम ग्राहकांना लुटणारी पाच जणांची आंतरराज्यीय टोळी शिक्रापूर पोलिसांनी दोन तासांत जेरबंद केली असून, त्यांच्याकडून एक लाख एक हजार रुपये व कार जप्त केली आहे़ या टोळीच्या मागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली. त्यांनी पुणे, नगर, शिर्डी, नाशिक येथे एटीएम ग्राहकांची फसवणूक केल्याची कबुली दिली आहे़ मनीष दत्तू सोनवणे (वय २७), सनी विष्णू पळघने (२०, दोघे रा. उल्हासनगर नं. ३, कल्याण वेस्ट), महेश पांडुरंग धनगर (२५, शांतिनगर ब्राह्मणपाडा, कल्याण वेस्ट), गणेश भालचंद्र लोडते (१९, उल्हासनगर, कल्याण वेस्ट), सोनू रामशीस राजभर (२०, हनुमाननगर, उल्हासनगर नं. ३, कल्याण वेस्ट) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़या प्रकरणी बासुदेव सुबल दलई यांनी फिर्यादी दिली आहे़ बुधवारी (दि. १२) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास बासुदेव दलई हे कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील भारतीय स्टेट बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी रांगेत उभे असताना त्यांच्याजवळ टी शर्ट घातलेला २० ते २१ वर्षांचा मुलगा येऊन त्यांना म्हणाला, की ‘नातेवाइकांना पैसे पाठवायचे असून, माझे या बँकेत खाते नसल्याने माझ्याजवळील १ लाख २५ हजार रुपये तुम्ही तुमच्या खात्यात भरा.’ परंतु, त्यांनी त्याला नकार दिला. दरम्यान, बासुदेव यांच्या पुढे रांगेत उभ्या असणाऱ्या इसमाने बासुदेव यांना बाजूला बोलावून घेऊन सांगितले, की ‘तुझ्या खात्यावरून पैसे पाठवून देऊ व त्यामोबदल्यात या मुलाकडून पैसे घेऊ.’ त्या मुलाला त्याने बोलावून पैसे खात्यातून पाठवण्याच्या मोबदल्यात त्यांना १० हजार रुपये देण्याचे ठरले; परंतु याला बासुदेव यांनी नकार दिला. दरम्यान, या ठिकाणी आणखी एक मुलगा बासुदेव यांच्याजवळ येऊन त्यांची समजूत काढू लागल्यानंतर बासुदेव पैसे खात्यातून पाठवण्यास तयार झाले. त्यानंतर मुलाने बासुदेव याच्याकडे रुमालात बांधलेले एक लाख रुपये दिले व बासुदेव याच्याकडील २४ हजार ९०० रुपये रुपये स्वत:कडे घेतले. रांगेत उभा असणारा व नंतर त्या ठिकाणी आलेला मुलगा या दोघांनी बासुदेव यांना एक लाख रुपये दिलेल्या मुलाला सोडवून येतो, असे सांगून ते तिघे एका ग्रे रंगाच्या कारजवळ गेले. हे तिघे व त्या वाहनाजवळ असणारे इतर दोघे गाडीमध्ये बसून जोरात गाडी नगर बाजूकडे निघून गेल्याने बासुदेव यांना संशय आल्याने त्यांच्या दिलेल्या रुमालाची गाठ सोडून पाहिले असता, त्यामध्ये कागदाचा बंडल असल्याचे दिसल्यावर व्हॅगनर गाडीतील ५ जणांनी आपली फसवणूक केल्याचे लक्षात आले. त्यानंतर बासयदेव दलई यांनी रात्री ११ वाजता शिक्रापूर पोलीस ठाण्यामध्ये फसवणूक झाल्याची तक्रार दिली व ५ जणांचे वर्णन सांगितले़ शिक्रापूर पोलिसांनी सर्व मार्गांची नाकेबंदी करून फसवणूक केलेल्या टोळीला पकडण्यास पोलीस पथक रवाना झाले. दरम्यान, फिर्यादी बासुदेव याने दिलेल्या वर्णनाचे तरुण सणसवाडीतील हॉटेल गोल्ड कॅसल या हॉटेलामध्ये दोन दिवसांपासून राहण्यास असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजल्यानंतर पोलीस निरिक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शानाखाली पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले, पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे, सुरेश कांबळे, पोलीस नाईक विलास आंबेकर, पोलीस कॉन्स्टेबल संदीप जगदाळे, अनिल जगताप, विष्णू फटांगडे यांच्या पथकाने गोल्ड कॅसल हॉटेलामधून या ५ आरोपींना दोन तासांत जेरबंद केले असून, त्यांच्याकडील १ लाख १ हजार रुपये व कारही जप्त केली आहे. टोळीला अधिक तपासासाठी दि. १९ आॅगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश शिरूर न्यायालयाने दिले आहे़