शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

‘मुख्य सल्लागार’ म्हणूनची आमची नावे काढा; सुहास पळशीकर, योगेंद्र यादव यांचे NCERT च्या संचालकांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 21:29 IST

एनसीईआरटीने पुस्तकांमध्ये अनेक बदल केले आहेत आणि तर्कशुद्धीकरणाच्या निकषावर या बदलांचे समर्थन केले आहे

पुणे : राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने (एनसीईआरटी) शालेय पुस्तकांमधून काही विषय हटविल्याबद्दल मुख्य सल्लागारांनी आक्षेप नोंदविला आहे. २००६-२००७ मध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या राज्यशास्त्र विषयाच्या पुस्तकांसाठी मुख्य सल्लागार म्हणून काम केलेले सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी परिषदेच्या संचालकांना पत्र लिहून त्यांची नावे पुस्तकांमधून काढून टाकण्यास सांगितली आहेत.

एनसीईआरटीने पुस्तकांमध्ये अनेक बदल केले आहेत आणि तर्कशुद्धीकरणाच्या निकषावर या बदलांचे समर्थन केले आहे. इथे कुठल्याप्रकारचे अध्यापनशास्त्रीय तर्कावर आधारित काम पाहायला मिळत नाही. पुस्तकातून असंख्य अतार्किक गोष्टी वगळण्यात आल्या आहेत. आमच्याशी सल्लामसलत करणे किंवा बदलाबाबत कळविण्याचेदेखील सौजन्य दाखविण्यात आले नाही.

एनसीईआरटीने इतर तज्ज्ञांशी याबाबत सल्लामसलत करुन या गोष्टी वगळण्याचा निर्णय घेतला असेल तरीही आम्ही त्याच्याशी असहमत आहोत. प्रत्येक पुस्तक तर्कातून तयार होते. पण पुस्तकातील गोष्टी वगळल्याने त्या पुस्तकाच्या मूळ उद्देशाचे उल्लंघन केल्यासारखे आहे. शिक्षण हे पुस्तकाच्या आधारावरच मिळते. शैक्षणिक अकार्यक्षम अशा पुस्तकांवर आमची नावे नमूद असावीत ही आमच्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे. त्यामुळे ९ ते १२ वीच्या राज्यशास्त्रातील सर्व पुस्तकांमधून मुख्य सल्लागार म्हणून आमची नावे हटवावीत. आमच्या नावांचा पुस्तकांमध्येही वापर केला जाऊ नये, असे प्रा. सुहास पळशीकर आणि योगेंद्र यादव यांनी पत्रात नमूद केले आहे.

''एनसीईआरटीने पुस्तकांमधून काही विषय वगळल्याने मूळ पुस्तकाशी आता विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पुस्तकांचा काहीच ताळमेळ राहिलेला नाही. त्यामुळे आमची पुस्तकांमध्ये मुख्य सल्लागार म्हणून असलेली नावे काढून टाकावीत. या पुस्तकांमध्ये आम्ही केलेले काम कुठेच दिसत नाही. - सुहास पळशीकर, राजकीय विश्लेषक'' 

टॅग्स :PuneपुणेSocialसामाजिकcultureसांस्कृतिकartकलाPoliticsराजकारण