शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

ऐन मार्चच्या शेवटी 'सोमेश्वर'च्या सभासदांना दिलासा; ३१ मार्च पूर्वी मिळणार ४५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 20:04 IST

चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत १२ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून अजून २० ते २५ हजार टन ऊस शिल्लक

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील उसासाठी प्रतिटन ३१७३ रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत २८०० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असून उर्वरित ३७३ रुपये ३१ मार्चपूर्वी सर्व रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.           एफआरपी मधील २८०० रुपये पहिला हप्ता अदा केल्यानंतर उर्वरित ३७३ रुपयांप्रमाणे ४५ कोटी रुपये सभासदांना मिळणार आहेत. त्यामुळे सभासदांना ऐन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिलासा मिळाला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार (दि. २५) रोजी पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सोमेश्वरकडूनही यापुढे एकरकमी एफआरपी देण्यात येणार आहे.                जगताप पुढे म्हणाले की, चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत १२ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून अजून २० ते २५ हजार टन ऊस शिल्लक आहे. मार्च अखेर पर्यंत हंगाम बंद होणार आहे. ऊस टंचाई असतानाही सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या सहकार्याने चांगले ऊस गाळप केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याच्या टाईम ऑफिस मध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दोन चौकशी समित्या नेमल्या आहेत. या महिना अखेरपर्यंत चौकशी अहवाल मिळणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुरुषोत्तम जगताप यांनी दिला आहे.

नेहमी सत्याचाच विजय

सोमेश्वर कारखाना व मु सा काकडे महाविद्यालय यांच्यात गेली ३० वर्ष मालकी हक्कावरून मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल असून याबाबत बोलताना जगताप म्हणाले, सोमेश्वर कारखान्याच्या मालकीचे असलेले मु. सा. काकडे महाविद्यालय हा सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या ३० वर्षांपासून महाविद्यालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयात केस सुरु आहे. सर्व सभासदांनी कारखान्याचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवावा. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असून विजय हा नेहमी सत्याचाच होतो. असे सूचक विधान जगताप यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवारMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार