शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

ऐन मार्चच्या शेवटी 'सोमेश्वर'च्या सभासदांना दिलासा; ३१ मार्च पूर्वी मिळणार ४५ कोटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 20:04 IST

चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत १२ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून अजून २० ते २५ हजार टन ऊस शिल्लक

सोमेश्वरनगर : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने चालू गाळप हंगामातील उसासाठी प्रतिटन ३१७३ रुपये एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. आत्तापर्यंत २८०० रुपये सभासदांच्या खात्यावर वर्ग केले असून उर्वरित ३७३ रुपये ३१ मार्चपूर्वी सर्व रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग करणार असल्याची माहिती सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.           एफआरपी मधील २८०० रुपये पहिला हप्ता अदा केल्यानंतर उर्वरित ३७३ रुपयांप्रमाणे ४५ कोटी रुपये सभासदांना मिळणार आहेत. त्यामुळे सभासदांना ऐन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात दिलासा मिळाला आहे. सोमेश्वर कारखान्याच्या संचालक मंडळाची बैठक मंगळवार (दि. २५) रोजी पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकरक्कमी एफआरपी देण्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून सोमेश्वरकडूनही यापुढे एकरकमी एफआरपी देण्यात येणार आहे.                जगताप पुढे म्हणाले की, चालू गाळप हंगामात सोमेश्वर कारखान्याने आत्तापर्यंत १२ लाख ऊस गाळपाचा टप्पा पूर्ण केला असून अजून २० ते २५ हजार टन ऊस शिल्लक आहे. मार्च अखेर पर्यंत हंगाम बंद होणार आहे. ऊस टंचाई असतानाही सोमेश्वर कारखान्याने सभासदांच्या सहकार्याने चांगले ऊस गाळप केले असल्याचे जगताप यांनी सांगितले. सोमेश्वर कारखान्याच्या टाईम ऑफिस मध्ये झालेल्या कथित गैरव्यवहार प्रकरणी दोन चौकशी समित्या नेमल्या आहेत. या महिना अखेरपर्यंत चौकशी अहवाल मिळणार आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पुरुषोत्तम जगताप यांनी दिला आहे.

नेहमी सत्याचाच विजय

सोमेश्वर कारखाना व मु सा काकडे महाविद्यालय यांच्यात गेली ३० वर्ष मालकी हक्कावरून मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल असून याबाबत बोलताना जगताप म्हणाले, सोमेश्वर कारखान्याच्या मालकीचे असलेले मु. सा. काकडे महाविद्यालय हा सभासदांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. गेल्या ३० वर्षांपासून महाविद्यालयाच्या बाबतीत उच्च न्यायालयात केस सुरु आहे. सर्व सभासदांनी कारखान्याचे मार्गदर्शक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर विश्वास ठेवावा. न्याय व्यवस्थेवर आमचा विश्वास असून विजय हा नेहमी सत्याचाच होतो. असे सूचक विधान जगताप यांनी केले आहे.

टॅग्स :PuneपुणेSugar factoryसाखर कारखानेsugarcaneऊसFarmerशेतकरीAjit Pawarअजित पवारMONEYपैसाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार