शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

अबब! दोन हजार कोटींच्या पुणे- मुंबई ‘एक्स्प्रेस वे’साठी २० वर्षे २० हजार कोटींची वसूली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 10:31 IST

दीपक कुलकर्णी-  पुणे : सन १९९८-९९ मध्ये बांधलेल्या पुणे - मुंबई ‘एक्स्प्रेस वे’साठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च आला. ...

दीपक कुलकर्णी- 

पुणे : सन १९९८-९९ मध्ये बांधलेल्या पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’साठी दोन हजार कोटी रुपयांचा खर्च आला. या खर्चाची रक्कम पूर्णपणे वसूल झाली नसल्याचे महाराष्ट्र राज्य महामार्ग विकास मंडळा (एमएसआरडीसी)च्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. ‘एमएसआरडीसी’ला अद्यापही २२ हजार ३७० कोटी रुपयांची रक्कम वसूल करणे शिल्लक असल्याचे सांगितले जाते. कोणत्याही बँकेत ठेवले असते तरी २२ हजार कोटी एवढी रक्कम झाली नसती. एवढी प्रचंड वाढ फक्त सावकारी, चक्रवाढ व्याजानेच होऊ शकते, अशी टीका माहिती अधिकार कार्यकर्ते आणि सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर यांनी केली आहे.

वेलणकर म्हणाले, ‘थोडक्यात काय तर पूर्वीच्या सावकारी पद्धतीत जसे कितीही कर्ज फेडले तरी तुझे कर्ज शिल्लकच आहे,’ असे सांगितले जात असे, जवळपास त्याचप्रमाणे हे सुरू असल्याचे दिसत आहे. गेल्या २० वर्षांपासून टोल वसुली सुरूच आहे. मात्र, मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीचे ‘कॅग’मार्फत सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. यातून सत्य बाहेर येईल. 

यावेळी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाचा खर्च अद्यापही वसूल झाला नसल्याबद्दल न्यायालयाने आश्चर्यदेखील व्यक्त केले आहे. कॅगच्या चौकशीत टोल वसुलीबाबतचे सत्य समोर आले तर आणखी काही प्रमुख रस्त्यावरील टोल वसुलीचाही मुद्दा मार्गी लागेल, अशी आशा वेलणकर यांनी व्यक्त केली.

मुंबई उच्च न्यायालयात सामाजिक कार्यकर्ते प्रवीण वाटेगावकर यांनी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसुली बंद करण्यासाठी जनहित याचिका दाखल केली होती. कंत्राटदाराने या द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीतून निर्धारित रकमेपेक्षा अधिक टोल वसुली केली असल्याने टोल वसूली बंद करण्यात यावी, अशी मागणी या याचिकेद्वारे करण्यात आली.

दरम्यान, एमएसआरडीसीने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गासाठी किती खर्च आला याचा उल्लेखदेखील केला नसल्याचे न्यायालयाने निदर्शनास आणून दिले आहे. तसेच आतापर्यंत ही रक्कम वसूल झाली नाही यावर विश्वास ठेवणे कठीण असल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

 

राज्य सरकारचा वेळकाढूपणा

वेलणकर म्हणाले की, ज्या प्रकारे द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत त्याचप्रमाणे राज्यातील इतर प्रमुख महामार्गांवरील टोल वसुलीबाबतही चौकशी व्हावी, अशी आमची अपेक्षा आहे. राज्य सरकारकडे प्रतिज्ञापत्र मागितल्यावर त्यांनीही परत वेळ मागितला आहे. खरे तर यात वेळ घेण्यासारखे आहेच काय? असा प्रश्न पडतो. कारण मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हाती असताना सर्व कागदपत्रे व माहिती गोळा करून एक दिवसात त्यांनी प्रतिज्ञापत्र सादर करायला हवे होते. मात्र, यानिमित्ताने सगळे सत्य समोर येईल. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचे आमच्याकडून स्वागतच आहे.

 

एमएसआरडीसी’ची थातूरमातूर उत्तरे

विवेक वेलणकर म्हणाले की, पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील टोल वसुलीबाबत आम्ही २०१८ साली याचिका दाखल केली होती. न्यायालयाने आमच्या याचिकेवर हा निर्णय दिला आहे. २००४ साली जो करार केला त्याच्यावरही कॅगने आक्षेप नोंदवला. मात्र त्यावर अगदी थातूरमातूर उत्तरे मिळाली. मात्र, आम्ही अतिशय सखोल पद्धतीने अभ्यास करून हे आक्षेप नोंदवले होते. ते आम्ही उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले पण त्यावर एमएसआरडीसीने आक्षेपार्ह काही नाही, आम्ही सविस्तर उत्तर दिले आहे. आमच्यासाठी हा विषय सर्वार्थाने संपला असल्याचे सांगितले होते.

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईtollplazaटोलनाकाHigh Courtउच्च न्यायालयhighwayमहामार्गState Governmentराज्य सरकार