शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

पुणे विभागात पुण्याचीच बाजी; जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल, नगरचा निकाल ८६.३४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:25 IST

राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे, गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते

पुणे: बारावीच्या निकालात पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यानेच बाजी मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला असून, यात पुणे जिल्हा सर्वाधिक ९४.८७ टक्के, तर त्याखालाेखाल सोलापूर जिल्हा ८८.६२ टक्के आणि सर्वात कमी अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

पुणे विभागात एकूण २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गतवर्षीही पुणे जिल्हा अव्वल स्थानी होता.

गतवर्षी पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गैरमार्ग प्रकरणांची संख्या घटल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. गतवर्षी ९५ प्रकरणांची नोंद झाली हाेती, ती यंदा ६६ वर आली आहे.

राज्याच्या तुलनेत विभागाची घसरण 

राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे. गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते. दरवर्षीच्या निकालात कोकण विभाग प्रथम स्थानावर असतो. पुणे विभागात येणाऱ्या तिन्ही जिल्ह्याचा निकाल यंदा घटला आहे.

जिल्हानिहाय चित्र

१) पुणे : पुणे जिल्ह्यात यंदा बारावीसाठी १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे.

२) अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे.

३) साेलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा बारावी परीक्षेसाठी एकूण ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती. त्यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.

मुला-मुलींचे प्रमाण काय?

- पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के, तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला.- अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के, तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला.- सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के, तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला.

शाखानिहाय स्थिती

- विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.०१ टक्के- वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के- कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के- व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के- तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणStudentविद्यार्थीSolapurसोलापूरAhilyanagarअहिल्यानगर