शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

पुणे विभागात पुण्याचीच बाजी; जिल्ह्याचा सर्वाधिक ९४.८७ टक्के निकाल, नगरचा निकाल ८६.३४ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2025 18:25 IST

राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे, गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते

पुणे: बारावीच्या निकालात पुणे विभागामध्ये पुणे जिल्ह्यानेच बाजी मारल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे. पुणे विभागाचा एकत्रित निकाल ९१.३२ टक्के लागला असून, यात पुणे जिल्हा सर्वाधिक ९४.८७ टक्के, तर त्याखालाेखाल सोलापूर जिल्हा ८८.६२ टक्के आणि सर्वात कमी अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ८६.३४ टक्के लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत पुणे विभागाच्या निकालात यंदा ३ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे.

पुणे विभागात एकूण २ लाख ४४ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली हाेती. यापैकी २ लाख ४२ हजार ६७१ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील २ लाख २१ हजार ६३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्यावर्षी विभागाचा निकाल ९४.४४ टक्के लागला होता. यंदाचा निकाल ९१.३२ टक्के लागला आहे. गतवर्षीही पुणे जिल्हा अव्वल स्थानी होता.

गतवर्षी पुणे जिल्ह्याचा निकाल ९५.१९ टक्के, अहिल्यानगर जिल्ह्याचा निकाल ९३.४० टक्के आणि सोलापूर जिल्ह्याचा निकाल ९३.८८ टक्के लागला होता. यावरून विभागातील तिन्ही जिल्ह्यांच्या निकालात घट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. गैरमार्ग प्रकरणांची संख्या घटल्याचेही आकडेवारीतून समोर आले आहे. गतवर्षी ९५ प्रकरणांची नोंद झाली हाेती, ती यंदा ६६ वर आली आहे.

राज्याच्या तुलनेत विभागाची घसरण 

राज्याच्या एकूण निकालाचा विभागनिहाय विचार करता पुणे विभाग सहाव्या स्थानी आहे. गतवर्षी पुणे विभागाने तिसरे स्थान पटकावले होते. दरवर्षीच्या निकालात कोकण विभाग प्रथम स्थानावर असतो. पुणे विभागात येणाऱ्या तिन्ही जिल्ह्याचा निकाल यंदा घटला आहे.

जिल्हानिहाय चित्र

१) पुणे : पुणे जिल्ह्यात यंदा बारावीसाठी १ लाख २७ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख २७ हजार ३८७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. त्यातील १ लाख २० हजार ८५४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ९४.८७ इतकी आहे.

२) अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यात ६१ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. यापैकी ६० हजार ९३१ विद्यार्थी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ५२ हजार ६०९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. निकालाची एकूण टक्केवारी ८६.३४ इतकी आहे.

३) साेलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा बारावी परीक्षेसाठी एकूण ५४ हजार ८७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली हाेती. त्यापैकी ५४ हजार ३५३ विद्यार्थी परीक्षेसाठी प्रविष्ट झाले हाेते. त्यातील ४८ हजार १६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची एकूण टक्केवारी ८८.३२ इतकी आहे.

मुला-मुलींचे प्रमाण काय?

- पुणे जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.७४ टक्के, तर मुलांचा निकाल ९३.१५ टक्के लागला.- अहिल्यानगर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९२.५१ टक्के, तर मुलांचा निकाल ८१.४० टक्के लागला.- सोलापूर जिल्ह्यात मुलींचा निकाल ९६.६२ टक्के, तर मुलांचा निकाल ८४.६४ टक्के लागला.

शाखानिहाय स्थिती

- विज्ञान शाखेचा सर्वाधिक ९७.०१ टक्के- वाणिज्य शाखेचा एकूण निकाल ९२.३२ टक्के- कला शाखेचा एकूण निकाल ७४.२४ टक्के- व्यावसायिक अभ्यासक्रम शाखेचा एकूण निकाल ८४.१५ टक्के- तंत्रविज्ञान शाखेचा निकाल ७२.०३ टक्के

टॅग्स :PuneपुणेHSC / 12th Exam12वी परीक्षाHSC Exam Resultबारावी निकालEducationशिक्षणStudentविद्यार्थीSolapurसोलापूरAhilyanagarअहिल्यानगर