शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नदीत कोसळता कोसळता वाचला अन् अनर्थ टळला; भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2023 15:23 IST

प्रसंगावधान ट्रकच्या ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला, अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता

नीरा : पुणे आणि सातारा जिल्ह्याची सिमा असलेल्या नीरा नदीच्या पुलाचा कठड्यात अडकून अपघात झाला आहे. भरधाव ट्रक कठड्यावरुन फुटपाथवर आला. पण सुदैवाने नदीत कोसळला नाही.  या अपघाताने वारी काळातील अकरा वर्षांपूर्वीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. यामुळे पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील वाहन चालकांचा व वारकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

पुणे पंढरपूर पालखी मार्गावरील नीरा नदीच्या पुलावर ट्रकला अपघात झाला. रविवारी (दि.२८) दुपारी साडेबाराच्या सुमारास लोणंद (जिल्हा सातारा) बाजूकडून मालवाहतूक करणारा ट्रक नीरा शहराकडे चालला होता. अचानक महिला दुचाकीस्वाराने कट मारल्याने ट्रकचालकाने स्टेअरींग डाव्या बाजुला ओढले. या दरम्यान ट्रकचे पुढील बाजूचे डावेचाक रस्त्याचे कमी उंचीचे कठड्यावरुन फुटपाथवर गेले. ट्रकची डावी बाजू पुलाच्या मोठ्या कठड्याला टेकणार तोच ड्रायव्हरने ब्रेक मारल्याने अनर्थ टळला. अन्यथा ट्रक नदीत कोसळला असता. 

नीरा, पाडेगाव, निंबूत, वाघळवाडी, मळशी येथील युवकांनी ट्रकचालकाला आधार देत, शर्तीचे प्रयत्न करत कठड्यावरुन ट्रक पुन्हा रसत्यावर आणला. यादरम्यान सुमारे दिडतास वाहतूक कोंडी झाली होती. पालखी मार्गावर नीरा बस स्थानका पर्यंत तर पाडेगाव ऊस संशोधन केंद्रा पर्यंत व नगर मार्गावर बुवासाहेब चौका पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. स्थानिक युवकांनीच या वाहतूक कोंडीतून वाहनचालकांना वाट काढून देण्याचे प्रयत्न केले. 

 २० जून २०१२ रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा वाल्हे मुक्कमी असताना. पहाटेच्या वेळी वारकरी व त्यांचे साहित्य घेऊन निघालेला ट्रक याच ठिकाणी अशाच पद्धतीने नीरा नदीत कोसळला होता. त्यावेळी नऊ वारकऱ्यांचा मृत्यू तर सात जण जखमी झाले होता. पालखी सोहळ्या आधी प्रशासनाकडून विविध विभागाचे अधिकारी, पालखी सोहळा प्रमुख व मानकरी दौरे करत रस्ता सुरक्षितेची पाहणी करत असतात. मात्र धोकेदायक ठिकाणी काहीच उपाययोजना करताना दिसून येत नाहीत.

टॅग्स :Puneपुणेhighwayमहामार्गAccidentअपघातriverनदीPoliceपोलिस