शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
4
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
5
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
6
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
7
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
8
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
9
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
10
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
11
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
12
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
13
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
14
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
15
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
16
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
17
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
18
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
19
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
20
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन

पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:47 IST

निष्कर्ष काय निघणार अन् कारवाई काय होणार; अनुचित प्रकार करणाऱ्यांवर जरब बसणार की अभय मिळणार, याकडे लागले सर्वांचे लक्ष

पुणे : गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत आले. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या समितीने केलेल्या अहवालात 'दीनानाथ'ची चूक झाल्याचे स्पष्ट केले. त्याचा सविस्तर अहवालही सरकारला सादर केला. आता माता मृत्यू अन्वेषण समितीनेही त्यांचा अहवाल सरकारला सादर केला आहे. घटनेतील सत्य शोधण्यासाठी नेमलेल्या समित्यांनी अहवाल सादर केले खरे, पण त्यात नेमकं सत्य काय? आता काय कारवाई होणार? मृत तनिषासह आईच्या मायेला मुकलेल्या दोन चिमुकल्यांना व पीडित भिसे कुटुंबीयांना खरंच न्याय मिळणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माता मृत्यू अन्वेषणच्या चौकशी अहवालाबाबत 'तनिषा भिसे यांच्या मेंदूला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मेंदूच्या पेशींवर परिणाम झाला. त्यामुळे मेंदूचे कार्य बिघडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंद‌विण्यात आला आहे' असे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले. यासंदर्भात विचारणा केली असता 'लोकमत'शी बोलताना पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, चौकशी अहवाल गोपनीय आहे. तो शासनाच्या वेब पोर्टवलवर अपलोड केला आहे. त्यातील कोणतीच अधिकृत माहिती कोणासही दिली नाही. त्यावर अभ्यास करून शासनाकडूनच निष्कर्ष काढला जाईल.राज्याचा आरोग्य विभाग आणि धर्मादाय सहआयुक्त समितीने त्यांचा अहवाल या आधीच सरकारकडे सादर केला आहे. आता माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही सादर झाला आहे. दोन्ही अहवालात दीनानाथ रुग्णालयाच्या चुकांवर बोट ठेवण्यात आले आहे. गर्भवती तनिषा भिसे यांना तातडीच्या उपचारासाठी दाखल करून न घेतल्याची चूक असल्याचा ठपका रुग्णालयावर ठेवला आहे.

खाटा कागदावरचधर्मादाय रुग्णालयांनी गरीबांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. अलीकडील घटनांमुळे या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येते. यावर देखरेख ठेवणे ही सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.रुग्णालय प्रशासनाची कबुली; आता अहवालात काय ?पैशांची पूर्तता केली नाही म्हणून गर्भवती महिलेला उपचार देण्यास टाळाटाळ केल्याने गर्भवतीचा जीव धोक्यात आला आणि उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या धर्मादाय स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१ क नुसार, थर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवणे अनिवार्य आहे. मात्र रुग्णालय प्रशासन या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहे. दिनानाथ रुग्णालयातही असा प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला. घडलेल्या प्रकारात आमची चूक झाली, असे रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनीही कबूल केले आहे. आता अहवालातून निष्कर्ष काय काढला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दीनानाथ मंगेशकर या ट्रस्टवर सुरुवातीला विभागीय आयुक्त ट्रस्टी होते. नंतर यातून विभागीय आयुक्तांनाच वगळले गेले. हे घडले कसे? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच रुग्णालयात २० टक्के नव्हे, तर ६० टक्के खाटा गरिबांसाठी राखीव ठेवणे अपेक्षित असल्याचे कागदपत्रातून निदर्शनास येते. मात्र प्रत्यक्षात नाही. - विजय कुंभार, उपाध्यक्ष, आम आदमी पक्ष 

माता मृत्यू अन्वेषण ही विशेष चौकशी समिती नाही. ती माता मृत्यूचे तथ्य शोधते. माता मृत्यू दरम्यान महिलेचे वय, वैद्यकीय पार्श्वभूमी, वैवाहिक पार्श्वभूमी अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास समिती करते. हे समितीचे नियमित काम आहे. - डॉ. नीना बोराडे, आरोग्य अधिकारी

अनामत रक्कम भरल्याशिवाय उपचार सुरू करणार नाही, अशी भूमिका रुग्णालयांनी घेणे योग्य नाही. यापुढे कोणत्याही स्थितीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वच रुग्णालयांकरिता सरकारने ठोस आणि योग्य पावले उचलली पाहिजेत. - डॉ. अभय शुक्ला, जन आरोग्य अभियान

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याhospitalहॉस्पिटलPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला