शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

पीडित कुटुंबाला न्याय मिळणार का? 'दीनानाथ'चौकशीप्रकरणी तीनही समित्यांनी केले अहवाल सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2025 12:47 IST

निष्कर्ष काय निघणार अन् कारवाई काय होणार; अनुचित प्रकार करणाऱ्यांवर जरब बसणार की अभय मिळणार, याकडे लागले सर्वांचे लक्ष

पुणे : गर्भवती तनिषा भिसे हिच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय अडचणीत आले. याप्रकरणी आरोग्य विभागाच्या समितीने केलेल्या अहवालात 'दीनानाथ'ची चूक झाल्याचे स्पष्ट केले. त्याचा सविस्तर अहवालही सरकारला सादर केला. आता माता मृत्यू अन्वेषण समितीनेही त्यांचा अहवाल सरकारला सादर केला आहे. घटनेतील सत्य शोधण्यासाठी नेमलेल्या समित्यांनी अहवाल सादर केले खरे, पण त्यात नेमकं सत्य काय? आता काय कारवाई होणार? मृत तनिषासह आईच्या मायेला मुकलेल्या दोन चिमुकल्यांना व पीडित भिसे कुटुंबीयांना खरंच न्याय मिळणार का, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

माता मृत्यू अन्वेषणच्या चौकशी अहवालाबाबत 'तनिषा भिसे यांच्या मेंदूला प्राणवायूचा पुरेसा पुरवठा न झाल्याने मेंदूच्या पेशींवर परिणाम झाला. त्यामुळे मेंदूचे कार्य बिघडले. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा निष्कर्ष नोंद‌विण्यात आला आहे' असे वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झाले. यासंदर्भात विचारणा केली असता 'लोकमत'शी बोलताना पुणे महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. नीना बोराडे म्हणाल्या की, चौकशी अहवाल गोपनीय आहे. तो शासनाच्या वेब पोर्टवलवर अपलोड केला आहे. त्यातील कोणतीच अधिकृत माहिती कोणासही दिली नाही. त्यावर अभ्यास करून शासनाकडूनच निष्कर्ष काढला जाईल.राज्याचा आरोग्य विभाग आणि धर्मादाय सहआयुक्त समितीने त्यांचा अहवाल या आधीच सरकारकडे सादर केला आहे. आता माता मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही सादर झाला आहे. दोन्ही अहवालात दीनानाथ रुग्णालयाच्या चुकांवर बोट ठेवण्यात आले आहे. गर्भवती तनिषा भिसे यांना तातडीच्या उपचारासाठी दाखल करून न घेतल्याची चूक असल्याचा ठपका रुग्णालयावर ठेवला आहे.

खाटा कागदावरचधर्मादाय रुग्णालयांनी गरीबांसाठी राखीव खाटा उपलब्ध करून देणे बंधनकारक आहे. अलीकडील घटनांमुळे या नियमांचे पालन होत नसल्याचे निदर्शनास येते. यावर देखरेख ठेवणे ही सरकारी अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.रुग्णालय प्रशासनाची कबुली; आता अहवालात काय ?पैशांची पूर्तता केली नाही म्हणून गर्भवती महिलेला उपचार देण्यास टाळाटाळ केल्याने गर्भवतीचा जीव धोक्यात आला आणि उपचारादरम्यान तिने अखेरचा श्वास घेतला. या प्रकरणामुळे रुग्णालयाच्या धर्मादाय स्वरूपावरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० च्या कलम ४१ क नुसार, थर्मादाय रुग्णालयांनी गरीब रुग्णांसाठी खाटा राखीव ठेवणे अनिवार्य आहे. मात्र रुग्णालय प्रशासन या नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहे. दिनानाथ रुग्णालयातही असा प्रकार घडला. याप्रकरणी डॉ. सुश्रुत घैसास यांनी राजीनामा दिला. घडलेल्या प्रकारात आमची चूक झाली, असे रुग्णालयाचे डीन डॉ. धनंजय केळकर यांनीही कबूल केले आहे. आता अहवालातून निष्कर्ष काय काढला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दीनानाथ मंगेशकर या ट्रस्टवर सुरुवातीला विभागीय आयुक्त ट्रस्टी होते. नंतर यातून विभागीय आयुक्तांनाच वगळले गेले. हे घडले कसे? याची चौकशी झाली पाहिजे. तसेच रुग्णालयात २० टक्के नव्हे, तर ६० टक्के खाटा गरिबांसाठी राखीव ठेवणे अपेक्षित असल्याचे कागदपत्रातून निदर्शनास येते. मात्र प्रत्यक्षात नाही. - विजय कुंभार, उपाध्यक्ष, आम आदमी पक्ष 

माता मृत्यू अन्वेषण ही विशेष चौकशी समिती नाही. ती माता मृत्यूचे तथ्य शोधते. माता मृत्यू दरम्यान महिलेचे वय, वैद्यकीय पार्श्वभूमी, वैवाहिक पार्श्वभूमी अशा विविध मुद्द्यांचा अभ्यास समिती करते. हे समितीचे नियमित काम आहे. - डॉ. नीना बोराडे, आरोग्य अधिकारी

अनामत रक्कम भरल्याशिवाय उपचार सुरू करणार नाही, अशी भूमिका रुग्णालयांनी घेणे योग्य नाही. यापुढे कोणत्याही स्थितीत अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्वच रुग्णालयांकरिता सरकारने ठोस आणि योग्य पावले उचलली पाहिजेत. - डॉ. अभय शुक्ला, जन आरोग्य अभियान

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPune Crimeपुणे क्राईम बातम्याhospitalहॉस्पिटलPregnancyप्रेग्नंसीpregnant womanगर्भवती महिला