शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटापूर्वी रेकॉर्ड केलेला डॉ. उमरचा व्हिडिओ आला समोर; 'सुसाइड बॉम्बर'चा उल्लेख
2
श्रीकांत शिंदे यांना भाजपाचा मोठा धक्का; कल्याण डोंबिवलीत शिंदेसेनेच्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
"बिहारच्या निकालानंतर काँग्रेसनं स्वबळाचा निर्णय घेतलाच असेल तर..."; उद्धवसेनेचे शालजोडे
4
सुनेसोबत अनैतिक संबंध, मुलाला मार्गातून हटवण्यासाठी बाप झाला हैवान, मग रचलं असं नाटक
5
Stock Market: उघडताच शेअर बाजारात मोठी घसरण! सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरला; Nifty २६०००० च्या खाली, 'या' स्टॉक्सवर नजर
6
सारा तेंडुलकर काशी विश्वनाथ मंदिरात, भक्तीभावाने झाली नतमस्तक, साधेपणाने जिंकलं मन, PHOTOS
7
झोप येत नव्हती म्हणून जागेवरून उठला अन्...; सौदी बस अपघातात एकमेव बचावलेल्या 'शोएब'ची कहाणी
8
आजचे राशीभविष्य - १८ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी आर्थिक, सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टीने आजचा दिवस लाभदायी
9
Mumbai: घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील भ्रष्ट कारभाराची चौकशी सुरू; आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप
10
रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन भारत दौऱ्यावर येण्याआधी मंत्री जयशंकर मॉस्कोत, काय झाली चर्चा?
11
Raigad: रायगडमधील १० नगरपालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी झुंबड!
12
Mumbai: दहिसर-भाईंदर मेट्रो ९ च्या कामावर सुपरवायझरचा मृत्यू; कंत्राटदाराला ५० लाखांचा दंड!
13
CNG: मुंबई, ठाण्यात गॅसकोंडी, ४५ टक्के रिक्षा-टॅक्सी बंद; सीएनजीच्या तुटवड्याने प्रवाशांचे मोठे हाल!
14
Mumbai: बाळासाहेबांच्या स्मृतिदिनी शिवसैनिकांचा सागर; ठाकरे बंधूंनी वाहिली आदरांजली!
15
Bihar: एनडीए सरकारचा शपथविधी २० नोव्हेंबरला; कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री? वाचा
16
हेट स्पीच: राज ठाकरेंवर एफआयआरची मागणी करणारी याचिका, उच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला फटकारले
17
saudi arabia: सौदी अरेबियात भीषण अपघात! मक्केहून मदिनेला जाणाऱ्या बसची टँकरला धडक; ४२ भारतीयांचा मृत्यू
18
'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
19
Sheikh Hasina: बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मृत्युदंड!
20
धक्कादायक! ३४ वर्षांच्या प्रसिद्ध गायकाचं निधन, समोर आलं हादरवून सोडणारं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भामा आसखेड धरणात फक्त १५ टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 10:18 IST

उन्हाळी व पाहिले आवर्तन ३ मार्च २०२५ ते १३ मार्च २०२५ दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी आलेगावपागापर्यंत सुमारे १८ बंधारे भरले होते,

आसखेड : चार तालुक्यांसह पुणेपिंपरी-चिंचवड पालिकेसाठी महत्त्वाचे व वरदान ठरलेल्या खेड तालुक्यातील भामा आसखेड धरणात फक्त १५.०९ टक्के पाणीसाठा शिल्लक असून, परिसरातील नागरिकांसाठी ही चिंतेची बाब आहे. यावर्षी उन्हाळी हंगामातील दुसरे आवर्तन १० एप्रिल २०२५ रोजी सुरू करण्यात आले. त्यासाठी १ हजार २०० क्युसेक प्रति सेकंद वेगाने नदीपात्रात पाणी सोडण्यात आले आहे, अशी माहिती धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी दिली.

उन्हाळी व पाहिले आवर्तन ३ मार्च २०२५ ते १३ मार्च २०२५ दरम्यान सोडण्यात आले होते. त्यावेळी आलेगावपागापर्यंत सुमारे १८ बंधारे भरले होते, असेही त्यांनी सांगितले. तर दुसरे आवर्तन तब्बल ३३ दिवस १२०० क्युसेकने सोडण्यात आले होत. या पाण्यामुळे खेड तालुक्यातील १०, शिरूरमधील ४, हवेलीमधील ४ तर दौंडमधील ६ बंधारे (एकूण २४ बंधारे) भरण्यात आले. परंतु, त्यानंतर धरणात गतवर्षीच्या तुलनेत सुमारे पाच टक्के पाणीसाठा कमी राहिला. परंतु, गेले दोन ते तीन दिवस पावसाने दमदार हजेरी लावल्याने कित्येक बंधाऱ्यांतील पाणी किमान ७ ते ८ दिवस वापरले जाणार नाही. त्यामुळे १५ जूनपर्यंत पावसाने दडी मारली तरी पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार नाही, असा अंदाज धरण प्रशासनाचे नीलेश घारे यांनी व्यक्त केला आहे.

यंदा एकूण १२९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. भामा आसखेड हे ८.१४ टीएमसी क्षमतेचे आहे. उपयुक्त साठा ३२.७६६ दलघमी (१.१६ टीएमसी) आहे. धरणात एकूण पाणीसाठा ४२.२८८ दलघमी (१.६३ टीएमसी) इतका असून, धरणसाठा १५.०९ टक्के आहे तर गतवर्षी २०.१५ टक्के इतका होता.

भामा आसखेड हे मातीचे धरण असून, ते खेड, शिरूर ,दौंड तालुक्यांसाठी शेती व पिण्याचे पाणी यासाठी तर पिंपरी- चिंचवडसाठी पिण्याचे पाणी यासाठी वरदान ठरले आहे. या ३३ दिवस सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे २४ बंधारे भरले. त्यामुळे सध्या उन्हाची तीव्रता जाणवत असूनही सुमारे महिनाभर पिण्याच्या पाणी योजनेला अडचण येणार नाही.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड